शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

मराठी टिकवायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:11 AM

मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. गेल्या काही दिवसांत फेरीवाले आणि मनसे यांच्यात झटापट पाहायला मिळाली. काँग्रेसने उघडउघड फेरीवाल्यांची बाजू घेतली अधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने आपणही असल्याचा देखावा शिवसेनेला निर्माण करावा लागला. या सगळ्या घडामोडींचे मूळ अर्थातच मराठी विरुद्ध परप्रांतीय असे असल्याने मराठी भाषकांच्या अस्मितेचा वादही पेटला. मुंबई परिसरात मराठी भाषकांचे प्रमाण कमी होताना दिसते. त्यावर फार कोणी विचार करताना दिसत नाही. केवळ मुंबई महाराष्टÑाची म्हणून मराठी असल्याचे जे बनावट चित्र निर्माण केले जाते, त्यावर चर्चा होण्याची गरज आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवरच मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलनही मुंबईत भरणार आहे. यात प्रामुख्याने बंद पडणाºया मराठी शाळांचा विचार होणार आहे. तसेच त्यात सरकारी धोरणातील धरसोड वृत्ती आणि मातृभाषेतून शिक्षणाबाबतचा पालकांच्या दृष्टीकोनावरही चर्चा अपेक्षित आहे. राजभाषा असलेली मराठी ज्ञानभाषा म्हणून पुरेशी नसल्याचा ग्रह बदलत नाही आणि मराठीतून शिक्षणाबद्दल पालकांना विश्वास वाटत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. मराठीचा विचार हा फक्त शालेय शिक्षणापुरता मर्यादित नाही; तर मातृभाषेतून होणारे व्यवहार; बोलणे, वाचणे, लिखाण करणे, त्या भाषेतून तयार होणारे साहित्य, त्याचा दर्जा, पारिभाषिक शब्द, नव्या शब्दांची निर्मिती, तिचा वापर, अन्य भाषक शब्द स्वीकारण्याबाबतची मानसिकता या साºयाचा ऊहापोह होण्याची गरज आहे. मराठीतून शिक्षणातच पुढचा मराठी वाचक, लेखक दडलेला आहे; ती केवळ संवादभाषा नाही, याचे भान आल्याखेरीज या प्रश्नांची चर्चा सफळ संपूर्ण होणारी नाही. केवळ सरकारी धोरणांना दोष देण्याचा उपचार पार पाडून हा प्रश्न सुटणारा नाही. मातृभाषा म्हणून आपल्याला मराठीबद्दल आत्मीयता वाटते का? नसेल, तर त्याची कारणे काय? याचेही आत्मपरीक्षण एकदा करायला हवे. त्यातच भाषाव्यवहाराच्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. मराठी साहित्य व्यवहारासाठी सरकार देत असलेल्या रकमेची कानडीशी तुलना केल्यावर ती तुटपुंजी आहे हे जसे समोर आले; तसेच मिळालेल्या रकमेचा वापर करून जे संमेलन पार पडते त्यातील खुजेपणाचे आत्मपरीक्षण करण्याचे धारिष्ट्य आपण दाखवत नाही. आपल्या या परस्परविरोधी भूमिका हेही मराठीचे दुखणे आहे. त्यामुळेच त्यावरील इलाज कठीण आहे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस