शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल? ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 22:16 IST

टिळक नगर आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल हे ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

- विनायक पात्रुडकर

मोठ मोठ्या गिरण्या व गिरण्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, एकेकाळी अशी मुंबईची ओळख होती़ ही ओळख इतिहासात नोंद झाली़ गिरण्यांच्या जागी मॉल उभे राहिले़ खासगी कंपन्यांची कार्यालये उभी राहिली. कमला मिलच्या जागेचाही व्यावसायिक वापर झाला. कधी काळी भोंग्याचा आवाज घुमणाऱ्या या जागेत पाश्चात्य संस्कृतीची अनेक हॉटेल थाटली गेली. नवीन जमाना नवीन ओळख, अशाप्रकारे या जागेला कॉर्पोरेट लुक आला. सर्व नियम धाब्यावर बसवून येथे हॉटेल्स्, बार व पब सुरू झाले़ या बेकायदा कृत्याला आगीने भस्मसात केले. आगीने अनेकांचे बळी घेतले़ गेल्यावर्षी २९ डिसेंबरला घडलेल्या या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करणा-यांना ही घटना धसका देऊन गेली़ अशा या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले़ या वर्षभरात महापालिकेने बेजबाबदार अधिका-यांवर निलंबनाची कारवाई केली़ बेकायदा बांधकाम करणा-या हॉटेल्स्वर किरकोळ कारवाई झाली. या आगीला जबाबदार असणा-या आरोपींना अटक झाली. हॉटेल्स्साठी नवीन नियमावली जाहीर झाली. कारवाईची ही यादी दिसायला र्तूत तरी समाधानकारक असली तरी प्रत्यक्षात आजही ठिकठिकाणी नियम धाब्यावर बसवून हॉटेल्स्, पब सुरू आहेत. भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांना हाताशी घेऊन सर्वसामान्यांच्या जीवाशी सहजपणे खेळले जात आहे. कमला मिल घटनेनंतर प्रशासन केवळ कागदावरच कठोर झाले. तसे न होता, प्रत्यक्षात अधिकारी वर्गाने कारवाईचा बडगा अधिक तीव्र करणे अपेक्षित होते. बेकायदा कृत्याला पळवाट मिळणार नाही, अशी आखणी प्रशासनाने करायला हवी होती. वर्षभरात तसे झालेले दिसत नाही़ कारण बेकायदा हॉटेल्स्, पब, बारवर वर्षभरात केलेल्या कारवाईचा कोणताचा तपशील पालिकेने जाहीर केलेला नाही. पोलिसांनीदेखील हे प्रकरण सुरूवातीच्या दिवसांत तत्परतेने हाताळले़ पुढे जाऊन पोलीस कारवाईचा जोर ओसरला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याचा खटला तातडीने कसा सुरू होईल, याची काळजी घ्यायला हवी होता. वर्षभरात किमान या खटल्याचे कामकाज पूर्ण होणे अपेक्षित होते़ तसे झाले नाही़ उलट आरोपी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि पोलीस केवळ त्याला विरोध करत बसले. साक्षीपुरावे गोळा करून याचा खटला सुरू करणे पोलिसांना शक्य होते. या दिरंगाईचा फायदा सरतेशेवटी आरोपींनाच होणार आहे. याआधीची अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये पोलीस तपास दिरंगाईचा फायदा आरोपींना मिळाला आहे़ एकंदरीतच या वर्षभरात केवळ कागदावरच कारवाई झाल्याचे दिसते आहे. वर्षभरात आगीच्या अनेक घटना मुंबईत घडल्या़ अगदी २७ डिसेंबरला टिळक नगर येथे लागल्या आगीने पाच जणांचा बळी घेतला. त्यात तीनजण ज्येष्ठ नागरिक होते़ पीडितांच्या कुटुंबियांनी न्यायासाठी पोलीस स्थानक गाठले़ वर्षभरापूर्वी आगीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही़. त्यामुळे टिळक नगर आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल हे ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

 

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवMumbaiमुंबई