शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल? ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 22:16 IST

टिळक नगर आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल हे ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

- विनायक पात्रुडकर

मोठ मोठ्या गिरण्या व गिरण्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, एकेकाळी अशी मुंबईची ओळख होती़ ही ओळख इतिहासात नोंद झाली़ गिरण्यांच्या जागी मॉल उभे राहिले़ खासगी कंपन्यांची कार्यालये उभी राहिली. कमला मिलच्या जागेचाही व्यावसायिक वापर झाला. कधी काळी भोंग्याचा आवाज घुमणाऱ्या या जागेत पाश्चात्य संस्कृतीची अनेक हॉटेल थाटली गेली. नवीन जमाना नवीन ओळख, अशाप्रकारे या जागेला कॉर्पोरेट लुक आला. सर्व नियम धाब्यावर बसवून येथे हॉटेल्स्, बार व पब सुरू झाले़ या बेकायदा कृत्याला आगीने भस्मसात केले. आगीने अनेकांचे बळी घेतले़ गेल्यावर्षी २९ डिसेंबरला घडलेल्या या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करणा-यांना ही घटना धसका देऊन गेली़ अशा या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले़ या वर्षभरात महापालिकेने बेजबाबदार अधिका-यांवर निलंबनाची कारवाई केली़ बेकायदा बांधकाम करणा-या हॉटेल्स्वर किरकोळ कारवाई झाली. या आगीला जबाबदार असणा-या आरोपींना अटक झाली. हॉटेल्स्साठी नवीन नियमावली जाहीर झाली. कारवाईची ही यादी दिसायला र्तूत तरी समाधानकारक असली तरी प्रत्यक्षात आजही ठिकठिकाणी नियम धाब्यावर बसवून हॉटेल्स्, पब सुरू आहेत. भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांना हाताशी घेऊन सर्वसामान्यांच्या जीवाशी सहजपणे खेळले जात आहे. कमला मिल घटनेनंतर प्रशासन केवळ कागदावरच कठोर झाले. तसे न होता, प्रत्यक्षात अधिकारी वर्गाने कारवाईचा बडगा अधिक तीव्र करणे अपेक्षित होते. बेकायदा कृत्याला पळवाट मिळणार नाही, अशी आखणी प्रशासनाने करायला हवी होती. वर्षभरात तसे झालेले दिसत नाही़ कारण बेकायदा हॉटेल्स्, पब, बारवर वर्षभरात केलेल्या कारवाईचा कोणताचा तपशील पालिकेने जाहीर केलेला नाही. पोलिसांनीदेखील हे प्रकरण सुरूवातीच्या दिवसांत तत्परतेने हाताळले़ पुढे जाऊन पोलीस कारवाईचा जोर ओसरला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याचा खटला तातडीने कसा सुरू होईल, याची काळजी घ्यायला हवी होता. वर्षभरात किमान या खटल्याचे कामकाज पूर्ण होणे अपेक्षित होते़ तसे झाले नाही़ उलट आरोपी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि पोलीस केवळ त्याला विरोध करत बसले. साक्षीपुरावे गोळा करून याचा खटला सुरू करणे पोलिसांना शक्य होते. या दिरंगाईचा फायदा सरतेशेवटी आरोपींनाच होणार आहे. याआधीची अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये पोलीस तपास दिरंगाईचा फायदा आरोपींना मिळाला आहे़ एकंदरीतच या वर्षभरात केवळ कागदावरच कारवाई झाल्याचे दिसते आहे. वर्षभरात आगीच्या अनेक घटना मुंबईत घडल्या़ अगदी २७ डिसेंबरला टिळक नगर येथे लागल्या आगीने पाच जणांचा बळी घेतला. त्यात तीनजण ज्येष्ठ नागरिक होते़ पीडितांच्या कुटुंबियांनी न्यायासाठी पोलीस स्थानक गाठले़ वर्षभरापूर्वी आगीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही़. त्यामुळे टिळक नगर आगीतील पीडितांना कधीपर्यंत न्याय मिळेल हे ना पोलीस सांगू शकतील ना महापालिका...

 

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवMumbaiमुंबई