शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वृक्षवल्ली आम्हा सोयरे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:46 IST

मिलिंद कुलकर्णी जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा ...

मिलिंद कुलकर्णीजागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा संकल्प सोडला. एका वृक्षाभोवती पाच-पंचवीस माणसे उभे राहून छायाचित्रे काढली गेली. सेल्फी काढली गेली. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमांवर ती प्रसारीत झाली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे अशा ठिकाणी वृक्षारोपणाचे सोहळे साजरे झाले. आकडेवारी नोंदवली गेली. फोटोंसह ‘वर’पाठविली गेली. आमची इतिकर्तव्यता संपली. प्रामाणिकपणे आपण स्वत:ला विचारुन बघूया, की या १५ दिवसात आपण लावलेल्या रोपाकडे आपण फिरकलो तरी का? किती दिवस आपण त्या रोपाला पाणी घातलं? पाणी घालणं शक्य नसलं तरी त्याला पाणी दिलं जातंय की नाही, हे आम्ही बघितले का? बहुसंख्य मंडळींचं उत्तर हे नाही, असेच येणार.गंमत बघा, हे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येईल. कार्यालय, बाजारपेठ याठिकाणी एखाद्या मोठ्या कडूनिंब, वड, पिंपळ या झाडाच्या सावलीखाली बहुसंख्य वाहने लावलेली आढळून येतात. सावलीच्या आकारानुसार वाहने कोंबून लावली जातात. वाहनांच्या काळजीसाठी हे होत नाही, तर आपल्याला चटका बसू नये म्हणून सावलीत वाहने लावली जातात. अशी सावली देणारी झाडे किती आहेत, याचा विचार कधी केला का आम्ही? ज्याने कुणी हे झाड लावले असेल, जगवले असेल त्याचे नावसुध्दा आपल्याला ठाऊक नसेल. पण त्या सावलीचा लाभ आम्ही जन्मसिध्द अधिकार असल्याप्रमाणे घेत आहोत. प्रसंगी भांडत असतो दुसऱ्या वाहनधारकाशी. तुझे झाड आहे का? मालकी तुझी आहे का? अशी विचारणा करीत असतो. पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय वारसा ठेवणार आहोत, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.काहींना पर्यावरणाची खरंच तळमळ, कळकळ असते. प्रयत्नपूर्वक ती झाडे लावतदेखील असतात. त्यासाठी पदरमोड करीत असतात. पण त्यांना असंख्य अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागते. सावली आम्हाला हवी असते, पण झाड आपल्या अंगणात नको. दाराशेजारी तर नकोच नको. त्यासाठी कारणांची मोठी जंत्री सादर केली झाले. झाड मोठे झाले की, मुळे आमच्या भिंतीला तडा पाडतील, जमिनीखालची टाकी फोडेल, अंगणातील फरशा उचकवेल, वर्षातून दोनदा पानगळती होईल, तर ती गळलेली पाने आवरण्याचा त्रास होईल, पक्षी येऊन बसतील आणि घाण करतील. एक ना अनेक कारणे सांगितली जातात. त्यात आपल्या प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराचा फटकादेखील वृक्षारोपण मोहिमेला बसत असतो. वृक्षारोपण करा, असे आवाहन तर केले जाते पण ते कुठे करायचे? संवर्धनातील अडचणींवर मार्ग कुणी काढायचा. ६ आणि ९ मीटरच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली तर गटारी उघड्या असल्याने मुळे जाऊन गटारी तुटतात आणि पाणी शेजारी प्लॉटमध्ये वा रस्त्यावर येते. म्हणून घरमालक आधी झाड लावायला अनुत्सुक असतो, आणि शक्य असेल तेव्हा मोठ्या झाड्यावर कुºहाड चालवितो. झाड मोठे झाडे की, वीज महामंडळांची माणसे फांद्या छाटून दरवर्षी त्याला बोडके करुन टाकतात. चारचाकीसाठी घरासमोर जागा हवी म्हणून झाड छाटले जाते. रस्ता रुंदीकरणात तर हमखास झाडाचा बळी जातो. खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण होते, झाडे लावली जातात आणि नंतर या जागेत बांधकाम करताना त्याच झाडांवर कुºहाड चालवली जाते. भूमिगत गटारी, वीज आणि दूरध्वनी वाहिनीची व्यवस्था का होऊ शकत नाही, याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करायला हवा.समाज आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे होणारे वृक्षारोपण आणि नैसर्गिक परागीकरणाने होणारे वृक्षारोपण यात फार काही अंतर असेल असे वाटत नाही. आम्ही दिखावा करतो, निसर्ग नित्यनेमाने त्याचे काम करीत असतो. तरीही आम्ही वृक्षवल्लींना ‘सोयरे’ म्हणत असू तर हा कृतघ्नपणा नाही का? एखाद्यावेळी ती वृक्षहल्ली आमचे ‘सोयरेपण’ नाकारेल, आणि तो दिवस फार दूर नसेल, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव