शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे वाजायला लागली घराघरातली भांडी; जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:29 IST

महिला आणि मुलांना होतोय त्रास

ब्राझील/जर्मनी/चीन/पाकिस्तान

पूर्वी घरं कशी शांत होती.. घराघरात मुलाबाळांचा गोंगाट असला, नवरा-बायकोची भांडणं तेव्हाही होत असली, घराघरांतली भांडी एकमेकांवर वाजत असली तरी त्यांचा आवाज कर्णकर्कश नव्हता. थोड्या वेळानं ही भांडणं, हे मतभेद मिटून किंवा ते टाळून पुन्हा प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागत होता. संसाराची गोडी त्यात दिसून येत होती. पण कोरोनानं आता घराघरातलं हे चित्रही बदललं आहे. घराघरातली भांडणं आणि वाद आता हमरीतुमरीवर येऊ लागले आहेत. आणि अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही ते जाऊन पोहोचताहेत. बरं, एखाद्याच ठिकाणची ही परिस्थिती नाही, अगदी जगभरात घराघरांतल्या भांडणांची संख्या वाढते आहे. जगभरातल्या तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बरं या भांडणांचं कारण तरी काय? भांडणांची कारणंही तशी नवीन नाहीत. बऱ्याचदा अगदी किरकोळच, पण घरातली सगळीच माणसं आता चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात असल्यानं, एकमेकांच्या जवळ असल्यानं त्यांच्यातल्या उणिवा जोडीदारांना आता प्रकर्षानं जाणवायला लागल्या. भांडणांचं मूळ कारण हेच.पण यातली चिंतेची प्रमुख गोष्ट म्हणजे ही भांडणं आता हिंसाचारावर गेलीत आणि या घरगुती हिंसाचाराला जगभर सर्वाधिक बळी पडताहेत त्या स्त्रिया आणि मुलंच. ब्राझीलपासून ते जर्मनीपर्यंत, इटलीपासून ते चायनापर्यंत आणि अगदी भारतापासून ते पाकिस्तानपर्यंत. जगभरात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे.

चीनमध्ये ज्या ठिकाणी सर्वप्रथम कोरोनाचा उद्रेक झाला, त्या वुहानच्या हुबेई प्रांतातही घरगुती हिंसाचाराचा आकडा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तिथल्या पोलिसांच्या माहितीनुसार, या हुबेई प्रांतातील घरगुती हिंसाचारात पूर्वीच्या तुलनेत अल्पावधीतच तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे.

हाच ‘पॅटर्न’ जगभरात सगळीकडे वाढतो आहे. ब्राझीलमध्येही घरगुती हिंसाचारात वाढ झाली असून महिला आणि लहान मुलं त्याचा बळी ठरताहेत. तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, सध्याचा लॉकडाऊनचा काळ आणि लोकांना सक्तीनं स्वत:ला होम क्वारंटाइन करावं लागत असल्यामुळे सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, पण हा लॉकडाऊनचा काळ नसता तर दाम्पत्यांमधलं घटस्फोटांचं प्रमाण निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं असतं.

जर्मनीचा रिपोर्ट सांगतो, तिथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कुटुंबांना सक्तीनं एकत्र राहावं लागतंय, नाहीतर ते कधीच विभक्त झाले असते. लॉकडाऊनचा काळ संपल्यावर कदाचित दाम्पत्य एकमेकांना कायमचा बायबाय करतील. जगातल्या या सगळ्याच ठिकाणी एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते म्हणजे केवळ कोरोनामुळे या घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे आणि त्याचं प्रमाण तब्बल ९० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक आहे.

घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत अनेक देशांत लोकल हेल्पलाईन्सही चालवल्या जातात. त्या सगळ्याच हेल्पलाईन्सही सध्या तक्रारींनी भरभरून वाहताहेत. या हेल्पलाईन कर्मचाºयांचं तर म्हणणं आहे, यापूर्वी इतके बिझी आम्ही कधीच नव्हतो. नवरा-बायकोतली भांडणं सोडवताना आणि त्यांना शांत करताना आमच्या नाकी नऊ येतंय. ‘शांत बसा, समजून घ्या, चिडचीड करू नका, हीच वेळ आहे एकमेकांना साथ देण्याची’ असं सांगण्याशिवाय आम्हालाही दुसरा पर्याय कुठे आहे?..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत