शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 06:04 IST

काहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली.

- अभिजित केळकरकाहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली. स्वतंत्र भारतात एखाद्या प्रभारी अर्थमंत्र्यानी अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एखादा चार्टर्ड अकाउंटंट ज्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीसमोर प्रोजेक्ट रिपोर्ट मांडतो आणि तो किती फायदेशीर आहे, हे समजावून सांगतो; त्याप्रमाणे गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प कसा असावा, मग तो हंगामी का असेना, तो कसा असावा याचे उत्तम उदाहरण या मांडणीतून पाहायला मिळाले.गेल्या चार वर्षांत सरकारने केलेल्या कामाचे प्रगतिपुस्तक व्यवस्थित अभ्यास करून मांडण्यात आले होते. संपूर्ण भाषण ऐकताना देश किती प्रगती करतो आहे हे ऐकून जनता खरंच धन्य झाली असेल. एक मात्र खरे की, या संकल्पामुळे एक आशावादी वातावरण नक्कीच तयार झाले. आपला देश अधोगतीला चालला आहे आणि अच्छे दिन येणारच नाहीत, ही मानसिक भीती दूर होण्यात या अर्थसंकल्पाची, त्यातून तयार झालेल्या वातावरणाची थोडी मदत नक्कीच झाली. हीच या वेळच्या अर्थसंकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू मानायला हवी.पाच लाखांपर्यंतचे करपात्र उत्पन्न करमुक्त करणे, बँकेतील ठेवींवरील व्याजावरील सवलतीची मर्यादा वाढविणे आदी घोषणा नि:संदेह स्वागतार्ह आहेत. मध्यमवर्गीय महिला तसेच ठेवींवरील व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या या निर्णयाचा खूप फायदा होईल. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लेखानुदान मांडण्याची वेळ आल्याने सरकार जास्त काही करू शकत नव्हते. त्या स्थितीत हात बांधलेले असतानाही अशा घोषणा करून सरकारने बॉम्बगोळा टाकला आहे.करमाफी, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे आणि सवलत देणाºया इतर घोषणा यांचा मेळ केला तर हे लक्षात येते की, या सवलतींमुळे सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसणार आहे. मात्र ही तूट कुठून भरण्यात येईल, हे गुलदस्त्यात आहे.या अर्थसंकल्पाने एक मोठी गमतीदार परिस्थिती निर्माण केली आहे. जर हेच सरकार हवे असेल तर यांनाच निवडावे लागेल, नाहीतर ही दाखवलेली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत आणि समजा, मतदारांनी दुसरे सरकार निवडले आणि त्यांनी सत्तेवर येताच या घोषणा रद्द केल्या तर बघा, आम्ही तर लोकाभिमुख आणि शेतकºयांसाठी किती चांगल्या योजना केल्या होत्या़ मात्र यांनी त्या रद्द केल्या, अशी ओरड करायला विरोधी पक्ष म्हणून भाजपाला आयती संधी मिळणार. म्हणजेच धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये नक्कीच फोफावणार. ती निर्माण करण्याचे काम या लोकप्रिय घोषणांनी केले आहे. एक गोष्ट मात्र नक्की की, या अर्थसंकल्पी भाषणामुळे लोकांच्या मनात असलेली भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची भीती काही प्रमाणात कमी झाली आणि पीयूष गोयल नावाचा एक दमदार अर्थमंत्री भविष्यात जोरदार फटकेबाजी करू शकेल, याबाबत कुठलीही शंका आता उरली नाही. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा खराच होता, पण त्यातील अर्थ हा स्वप्नवत होता. वास्तववादी नव्हता, असे म्हणायला हरकत नाही़

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Indiaभारत