शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तारणहार शेतीला तडाखा! हवामानाने अनाकलनीय वळण घेतल्याचा मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 02:21 IST

कोरोनाच्या महामारीत कृषी हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तारणहार ठरणार असे वातावरण होते; पण हवामान खात्याचा अंदाज सरासरीपुरता खरा ठरत असला तरी पाऊस कसा-कसा पडत राहील याचा अंदाज देण्यात पुन्हा एकदा हे खाते नापास झाले.

कोरोना महामारीमुळे पृथ्वीच्या इतिहासात २०२० हे दुर्दैवी वर्ष म्हणून नोंदविले जात असताना निसर्गाच्या आगळ्या-वेगळ्या अवतारानेही लक्षात राहणार आहे. संपूर्ण पृथ्वीवरील मानवी समूहाच्या व्यवहारावर आणि जगण्याच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या या घटनांचा फटका सर्वच क्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. उद्योग, व्यापार, रोजगार, सेवा क्षेत्र, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहे. अनेकांना मानसिकदृष्ट्याही भयावह त्रास सहन करावा लागतो आहे. शेतावर काम करणारा शेतकरी, असंघटित मजूर, रोजंदारीवरील कामगार ते आयटी क्षेत्रातील अभियंते, तंत्रज्ञ, संशोधकांना जगण्यासाठी नव्या कल्पना आणि संधीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्या देशातील हवामानाने अनाकलनीय वळण याच महामारीच्या काळात घेतल्याचा मोठा फटका शेती-शेतकरी यांना बसला आहे.

कोरोनाचा सर्वच क्षेत्राला नकारात्मक फटका बसला असताना केवळ अन् केवळ कृषी हे एकच क्षेत्र असे होते की, चालू वर्षातील हंगामात तुलनेने उत्तम पाऊस झाल्याने भारतीय जनतेला तारणहारच्या रूपात मदतीला येणार होते. भारत हा विविध संस्कृती, धर्म, भाषांचा देश आहे. तसाच तो विविध प्रकारच्या हवामानाचे स्तर असलेला आहे. परिणामी खरीप आणि रब्बी तसेच बारमाही पद्धतीच्या पिकांचा प्रदेश आहे. पिकांची विविधता खूप आहे. त्यानुसार विकसित झालेल्या खाद्यसंस्कृतीचाही जगण्याशी संबंध आहे. यासाठी कृषिक्षेत्राचे उत्पादन चांगले होणे महत्त्वाचे असते. पावसाळा चांगला झाला की, भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी येते. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही चालू हंगाम उत्तम जाणार, सरासरीपेक्षा थोडा अधिकच पाऊस होणार हा अंदाज होता. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली तेव्हाच मान्सून वेळेवर आहे, अशी हाकाटी हवामान खात्याने दिली. शेतकऱ्यांनी गडबडीने पेरण्या केल्या आणि जुलै महिना कोरडा जाताच दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी बनावट बियाणांचा फटका बसला.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आणि कृषिक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा तारणहार ठरणार असे वातावरण होते; पण हवामान खात्याचा अंदाज सरासरीपुरता खरा ठरत गेला असला तरी पाऊस कसा-कसा पडत राहील याचा अंदाज देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात पुन्हा एकदा हे खाते नापास झाले. १२ नोव्हेंबर १९७७ रोजीचा इतिहासाचा दाखला देत ‘लोकमत’ने वृत्तांत दिला, तोच खरा ठरला. तब्बल ४३ वर्षांनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. मागील दोन महिन्यांत उत्तम पाऊस झाल्याने ऑक्टोबर हिटने भरपूर बाष्प तयार झाले होते. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्याने निर्माण झालेल्या वादळाचे घोंगावणे सुरू झाले. त्याचवेळी पश्चिमेच्या अरबी समुद्रात कमी दाब तयार होताच तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात असा प्रवास करीत चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत राहिले. त्यातून गेल्या चार दिवसांत दररोज ठिकठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होत राहिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम पिकणाऱ्या शेतीचे पार वाटोळे झाले. उभी पिके पाण्यावर तरंगू लागली.

सोयाबीन कुजू लागले, कापणीला आलेला भात झडू लागला. भाजीपाला, फळबागा कोसळू लागल्या. उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागला नाही. तारणहारच संकटात आला. अद्याप दोन दिवस हा पूर्व-पश्चिमेच्या दिशेने धावणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा कायम राहाणार, असा अंदाज आहे. हैदराबाद या ऐतिहासिक शहराच्या परिसरात केवळ दोन तासांत दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. असा पाऊस गेल्या शंभर वर्षांत झाला नव्हता. मनुष्यहानीबरोबरच कृषिक्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. आता तरी केंद्र सरकारने हवामान खात्याकडील तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करून पावसाचा अंदाज अचूक वर्तविला पाहिजे. असे झाले असते तर हैदराबाद शहरातील संपत्तीचे मोठे नुकसान टाळण्यास मदत झाली असती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसलेला हा तडाखाही एक दुर्दैवी घटना म्हणून नमूद करावे लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामानcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी