शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वाढ स्वागतार्ह पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:09 IST

देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याला दहा महिने पूर्ण झाले असून एप्रिल महिन्यात प्रथमच या करवसुलीने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याला दहा महिने पूर्ण झाले असून एप्रिल महिन्यात प्रथमच या करवसुलीने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे. मात्र यामुळे सरकारने फुशारून जाण्यासारखी परिस्थिती नाही. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेगवान होऊ लागल्याचे हे सुचिन्ह मानणे घाईचे ठरणारे आहे. याबाबत कोणतेही भाष्य करण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल. एप्रिल महिन्यात जमा झालेल्या जीएसटीची आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे. या महिन्यात एकूण १ लाख ३ हजार ४५८ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला. सरकारने यासाठी काही प्रमाणात प्रयत्न केले, हे नक्कीच. याआधीच्या नऊ महिन्यांचा विचार केला असता त्यामधील वसुली ही दरमहा सरासरी ९० हजार कोटींच्या जवळपास आहे. मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने अनेक व्यापारी आपल्याकडील थकबाकी भरीत असतात. त्याचप्रमाणे तिमाही रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली असावी. त्यामुळेच जीएसटीच्या महसुलात झालेली ही वाढ तात्कालिक असण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू झाल्यापासून सरकारने यामध्ये अनेक बदल केले असल्याने त्याबाबत अद्यापही गोंधळाची स्थिती आहे. आता मालाच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी ई वे बिल अत्यावश्यक केल्याने या माध्यमातून होणाºया कर चुकवेगिरीला आळा घातला गेला, हे अभिनंदनीय आहे. मात्र सर्वसामान्य वाहतूकदारांना यंत्रणेकडून त्रासच सहन करावा लागतो अशा तक्रारी आहेत. महाराष्टÑातही लवकरच राज्यामधील मालवाहतुकीसाठी ई वे बिल असणे बंधनकारक होणार असल्याने त्यामधून राज्याच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सरकार सर्व प्रकारांनी जीएसटीची वसुली परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करीत आहे. कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे वसुलीचे प्रमाणही काहीसे वाढलेले आहे. देशातील उद्योग क्षेत्राकडे बघितले तर तेथे फारशी आशादायक स्थिती दिसून येत नाही. आजही रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होताना दिसत नाहीत. उद्योग क्षेत्रावर असलेले मंदीचे मळभ पूर्णपणे दूर झालेले नाही. एखाद्या महिन्यात वाढलेले उत्पादन दुसºया महिन्यात कमी होते. यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कमी होतो. अनेक कारखाने बंद असून तेथील रोजगाराच्या संधी थांबलेल्या आहेत. सेवा क्षेत्राकडून असलेली वाढीची अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये कराची वसुली वाढवून विविध विकास कामांना वेग देण्याचे आणि त्यामधून रोजगार निर्मिती करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न होत आहेत, मात्र औद्योगिक उत्पादन वाढीकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. जीएसटी लागू करताना सरकारने ‘एक देश एक कर’ अशी घोषणा दिली होती. दहा महिन्यांनंतरही ही घोषणा प्रत्यक्षामध्ये आलेली नाही. पेट्रोलियम पदार्थही जीएसटीखाली आणण्याच्या होत असलेल्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. कारण त्यामुळे राज्यांचा महसूल कमी होणार आहे. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीखाली आणल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. त्यामुळे महागाई कमी होऊन विविध विकास कामांसाठी सरकारला पैसा उपलब्ध होऊ शकतो. मात्र आज देशातील बहुसंख्य राज्यात भाजपाची सत्ता असल्याने तेथील उत्पन्नाचा स्रोत आटू देण्यास सत्ताधारी भाजपा तयार नाही. कॉँग्रेस सरकारच्या कार्यकाळात भाजपाने राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून जनतेची महागाईच्या चटक्यांमधून काही प्रमाणात सुटका करण्याची मागणी केली होती. आज अनेक राज्यांसह केंद्रामध्येही सत्ताधारी असलेल्या भाजपाला आपल्याच मागणीचा सोयिस्करपणे विसर पडला आहे. केंद्र सरकारने राज्यांच्या दबावाला बळी न पडता पेट्रोलियम पदार्थ जीएसटीखाली आणावेत. यामुळे राज्यांचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी त्यांना अनुदान द्यावे. मोदी सरकार ही अपेक्षा पूर्ण करणार का, हाच मोठा प्रश्न आहे. उद्यापासून होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत काय होते हे बघणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे.