शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते.

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा यात पणास लावली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ग्रामीण भागातील मतदार विशेषत: तरुण वर्ग कमालीचा खूश असल्याने तो आपल्यालाच मतदान करेल व या निमित्ताने ग्रामीण भागातील आपले स्थान अधिक बळकट करता येईल, हा राज्यातील फडणवीस सरकारचा होरा होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमागील गणित हेच होते. मुख्यमंत्री फडणवीस यात बºयाचअंशी यशस्वीदेखील ठरले. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आता ग्रामीण भागातही अधिक मजबूत झाला आहे. या पक्षाचा मतदार वर्ग वाढला आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. पण, त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून गर्भगळीत अवस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे, किंबहुना गमावलेला जनाधार या राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे हे वास्तवही या निवडणुकीतून समोर आले. पण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबद्दलचे ठोकताळे बांधणे धाडसाचे असते. या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच अधिक लढल्या जातात. जातीपेक्षा पोटजाती आणि गणगोतांच्या मतांचा आधार महत्त्वाचा असतो. हे गणगोत राजकीय पक्षांच्या भिंती तोडून मतदान करीत असतात. या निवडणुकीच्या निकालातून आपला पक्ष मजबूत झाला आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाने समजू नये. याचे कारण असे की ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची कधी चर्चा होत नाही. इथे देवाच्या आणि धर्माचेही वाद-विवाद रंगविले जात नाहीत. धार्मिक दंगली उफाळल्या तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असे कटकारस्थान कुणाला रचताही येत नाही. फार काय तर ज्या गावात ही निवडणूक होते त्या गावातील नागरी समस्यांचीही चर्चा सबंध निवडणुकीच्या काळात होताना दिसत नाही. गटातटाच्या राजकारणातून निर्माण झालेल्या स्थानिक आघाड्यांपुरता हा रागरंग असतो. निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्ष आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी पक्ष गावाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून पुढचे राजकारण खेळू शकतात. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दावे म्हणूनच हास्यास्पद ठरतात. कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून हे समजून घेता येईल. पण, दीर्घ राजकारणाच्या दृष्टीने या गोष्टी या पक्षांसाठीच घातक ठरू शकतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक