शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

कर्जबुडव्यांना सरकारी संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:42 AM

बड्या उद्योगपतींच्या कर्जबुडव्या प्रवृत्तीमुळे देशातील सर्वच राष्ट्रीय बँका डबघाईला आल्या आहेत. एकेका बँकेच्या बुडीत कर्जाची रक्कम काही हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. ही कर्जे या कर्जदारांनी त्यांच्या बेजबाबदार वृत्तीने किंवा सरकार कधीतरी आपली कर्जे माफ करीलच या विश्वासाने बुडविली वा परत करण्याची टाळाटाळ चालविली आहे.

बड्या उद्योगपतींच्या कर्जबुडव्या प्रवृत्तीमुळे देशातील सर्वच राष्ट्रीय बँका डबघाईला आल्या आहेत. एकेका बँकेच्या बुडीत कर्जाची रक्कम काही हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. ही कर्जे या कर्जदारांनी त्यांच्या बेजबाबदार वृत्तीने किंवा सरकार कधीतरी आपली कर्जे माफ करीलच या विश्वासाने बुडविली वा परत करण्याची टाळाटाळ चालविली आहे. या प्रकाराचा देशाच्या एकूृणच अर्थव्यवस्थेवरील परिणाम मोठा व विपरीत आहे. ही अवस्था दूर करायची तर या लबाड उद्योगपतींकडून सक्तीने कर्जे वसूल करावी लागणार आणि ते जमणार नसेल तर या बुडीत बँकांच्या खात्यात बुडालेली रक्कम जमा करून त्यांना त्यांच्या पायावर स्थिर करावे लागणार. आपले सरकार धनवंतांबाबत आणि उद्योगपतींबाबत जास्तीचे उदार असल्यामुळे त्यांच्यावर सक्ती करणे त्याला जमणारे नाही. त्यापेक्षा सरकारी तिजोरीतील पैसा या बँकांना देऊन त्यांना त्यांच्या पायावर नीट उभे करणे हे अर्थमंत्रालयाला एका आदेशान्वये करता येणे सोपे आहे. सरकारनेही तोच पर्याय निवडलेला आहे. त्यानुसार सरकारच्या तिजोरीत सामान्य नागरिकांनी कराच्या रूपाने भरलेली ८८ हजार कोटी रुपयांएवढी प्रचंड रक्कम या बँकांमध्ये वाटून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तशा वाटपाला सुरुवातही झाली आहे. आपण कराच्या रूपाने आपली प्रामाणिक मिळकत सरकारच्या स्वाधीन करतो आणि सरकार मात्र ती या लबाड व कर्जबुडव्या धनवंतांना आणि त्यांना त्याही स्थितीत जपत राहिलेल्या बँकांना देते, हा प्रकार जनतेच्या संतापाचा विषय होणारा आहे. सामान्य माणसांनी बँकांची कर्जे परत करण्यात जरा हयगय केली की त्यांच्याविरुद्ध जप्तींपासूनच्या सर्व कारवाया करायला सोकावलेले बँकांचे अधिकारी आणि संचालक या बड्या कर्जबुडव्यांपुढे नांगी टाकतात. कारण उघड आहे. त्यांनी बुडविलेल्या कर्जात या वर्गाचीही भागीदारी असते. बँकांची कर्जे उगाच बुडत नाहीत आणि जनतेच्या पैशाबाबत जागरूक असणारी अधिकारी माणसे तो बुडणार नाहीत याची सावधगिरीही बाळगणारी असतात. बँकांचे संचालक आणि उद्योगपती यांच्यातच साटेलोटे असेल तर तो पैसा बुडविण्यात सारेच सहभागी होतात. सरकार कर्जबुडव्यांना शिक्षा करीत नाही आणि ते बुडविण्यात त्यांना मदत करणाºया बँकांच्या अधिकाºयांनाही हात लावीत नाही. आताची मोठी रक्कम या बँकांना देताना सरकारने त्यांना सावधगिरीच्या काही सूचना दिल्या आहेत. यापुढे दिली जाणारी कर्जे बुडणार नाहीत, त्यांचा योग्य वापर होईल आणि बँकेचा पैसा वेळच्या वेळी परत दिला जाईल याविषयीची खबरदारी बँकांनी घेतली पाहिजे असे अर्थमंत्रालयाने त्यांना सांगितले आहे. मात्र अशा सूचनाही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. तुमच्या पैशाबाबत तुम्ही सावध राहिले पाहिजे असा उपदेश बँकांना करावा लागणे हाच मुळी आपल्या अर्थव्यवस्थेतील दुबळेपणाचा व गलथानपणाचा पुरावा आहे. या सूचनांचा बँकांमधील निर्ढावलेल्या संचालकांवर व अधिकाºयांवर फारसा परिणाम होणार नाही आणि कर्जबुडवे उद्योगपतीही त्याकडे दुर्लक्ष करतानाच दिसतील. सरकारने दिलेल्या नव्या रकमेमुळे या बुडव्यांना जास्तीची कर्जे यापुढेही मिळतील आणि ती वसूल करण्याची क्षमता आताच्या बँकांमध्ये कधी येणारही नाही. गरिबांना वा मध्यमवर्गीयांना असलेला बँकांचा धाक या उद्योगपतींना नाही. या बँकांचे अधिकारी त्यांच्यापुढे कसा लाळघोटेपणा करतात हे सामान्य नागरिकांनाही आता ठाऊकही झाले आहे. भ्रष्ट पुढाºयांना तुरुंगात डांबले जाते तसेच या कर्जबुडव्या उद्योगपतींबाबतही आता होणे त्याचमुळे गरजेचे आहे. नाहीतर जनतेने पैसा घ्यायचा आणि तो बँकांनी या उद्योगपतींना बुडवायला देऊन त्या व्यवहारात आपलेही उखळ पांढरे करून घ्यायचे हा प्रकार कधी थांबणार नाही. अर्थकारण शिस्तबद्ध व दुरुस्त झाले असल्याच्या गर्जना सरकार व त्याचे अर्थमंत्रालय नेहमी करते. ही शिस्तबद्धता राखायची तर अशा गुन्हेगारीसाठी कठोर शिक्षेचीच कायद्यात तरतूद होणे गरजेचे आहे.

टॅग्स :bankबँकIndiaभारतGovernmentसरकार