शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

‘गांधीमुक्त काँग्रेस’ ते ‘काँग्रेसमुक्त भारत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 08:40 IST

खरगे यांच्यासमोर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे कठीण आव्हान आहे.

- हरीष गुप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही मोहीम अथकपणे चालवली. त्यानंतर आठ वर्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘गांधीमुक्त काँग्रेस’ मोहीम काहीशी यशस्वी झाली, असे म्हणता येईल; परंतु अजूनही ‘काँग्रेसमुक्त भारत’ मात्र दृष्टिपथात नाही. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी याच आहेत आणि ४७ सदस्यांच्या सुकाणू समितीमध्ये सोनियांसह राहुल, प्रियंकाही आहेत.

खरगे यांच्यासमोर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे कठीण आव्हान आहे. तेथे पक्षाची यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. सत्ताधारी भाजपा विरुद्धच्या जनभावनेचा फायदा घ्यावा लागेल. राजस्थानमधली एकंदर परिस्थिती हाताळण्याचे कामही खरगे यांना करावे लागेल. ८० वर्षांचे खरगे तरुण मतदारांना प्रेरणादायी ठरू शकणार नाहीत; परंतु ते तसे भाग्यवान!  सोनिया गांधी यांनी त्यांना राजकीय विजनवासातून बाहेर काढले आणि राज्यसभेतील पक्षाच्या नेतेपदी नेमले. आता तर ते पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत.

पक्षातले ज्येष्ठ नेते आणि पन्नाशीच्या आतले तरुण यांच्यातला ताळमेळ ते कसा सांभाळतात, हे पाहावे लागेल. नरेंद्र मोदी-अमित शहा ही जोडी  अटल-अडवाणी काळापेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे, हे खरगे यांना जाणून घ्यावे लागेल. अटल-अडवाणी विरोधकांच्या, (विशेषत: गांधींच्या) बाबतीत एका मर्यादेपलीकडे जात नसत. पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी राहुल गांधी यांना अमेरिकेतल्या बोस्टन विमानतळावर घडलेल्या प्रसंगाच्या वेळी मदतच केली होती. मात्र, मोदी-शहा यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. भाजपने अत्यंत हुशारीने गांधी आणि सरदार पटेल यांचा वापर केला आणि नेहरू यांना नेस्तनाबूत करण्यावर भर दिला. देशाला आज ज्या प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे, त्या सर्व दुखण्यांचे मूळ नेहरू आहेत, हे दाखवण्यासाठी भाजपची मंडळी इतिहास उकरून काढण्यात गर्क आहेत.

भाजपची मोठी चिंता

भाजप नेते सध्या खूपच चिंतेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत असलेल्या घसरणीचे परिणाम काय होतील, हे पक्ष नेतृत्वाने बहुधा ओळखले नसावे. पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व सध्या आम आदमी पक्षाला लगाम घालण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहे. पक्षाने घेतलेल्या सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव वाढत असल्याचे समोर आले आहे. आम आदमी पक्षाच्या मोहिमांनी सर्वसामान्य लोकांना विशेषतः तरुणांना आकर्षित केले आहे. अगदी २०२४ च्या नव्हे, तरी २०२९ सालच्या निवडणुकीत आप भाजपपुढे सर्वात मोठे आव्हान निर्माण करू शकेल, असा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा अंदाज आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याच्या बाबतीत होत असलेला विलंब परिस्थिती चिघळवायला कारणीभूत ठरतो आहे. नवनियुक्त नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरुद्ध रोज एक तोफगोळा डागत आहेत. धक्कादायक गोष्ट ही की मुख्य सचिवांसह नोकरशहा लोकनियुक्त प्रतिनिधींचे मुळीच ऐकत नाहीत. एक प्रकारे नायब राज्यपाल आणि मुख्य सचिव आपविरुद्धच्या लढाईत जे भाजपाला जमले नाही ते करण्याच्या उद्योगात आहेत.

अमित शहा यांनी अलीकडेच दिल्ली भाजपच्या नेत्यांना त्यांच्या अपयशाबद्दल फैलावर घेतले. पुढच्या लोकसभा निवडणुकीत चार विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा ‘आप’च्या मागे आहेच. केजरीवाल यांचा गुजरातेत प्रवेश झाला आहे. तेथे त्यांना रोखण्यासाठी संघटित प्रयत्न केले जात आहेत.

ममता यांना दिलासा

पश्चिम बंगालमधील भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी आणि इतर अनेकांवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रामध्ये १६ जणांची नावे घेण्यात आली असून, पार्थ चॅटर्जी हे सगळ्या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत, असे म्हटले आहे. अंमलबजावणी संचालनालयानेही आधीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. यापैकी कोणत्याही तपास यंत्रणेने भरती घोटाळ्यात वरिष्ठ नेत्यांचे नाव घेतलेले नाही. या घोटाळ्यात ५० कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम यंत्रणांच्या हाती लागली होती. कोणत्याच यंत्रणेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते यांचे नाव यात गोवलेले नाही. हा घोटाळा तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचतो, असे तपास यंत्रणांनी सुरुवातीला सूचित केले होते; परंतु वरिष्ठ नेत्यांविरुद्ध त्यांच्या हाती काहीही लागले नाही, असे दिसते. येत्या काही महिन्यांत  आणखी काही बाजू पुढे येतील. त्याकडे लक्ष ठेवले पाहिजे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे