शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘पूर्ण’हास्य मावळले

By admin | Updated: March 5, 2016 03:23 IST

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा.

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील स्नायूंची ठेवणच अशी असते की जिच्यापायी अशा व्यक्ती सदा हसतमुखच असतात किंवा दिसतात तरी तशा. अकराव्या लोकसभेचे सभापती पूर्णो अजिटोक संगमा हे याचे ठळक उदाहरण. मेघालयासारख्या दुर्गम भागात जनप्रतिनिधित्व करीत नऊ वेळा लोकसभेत दाखल होण्याचा आणि त्याच्या आगेमागे मेघालयाचे मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आणि केन्द्रात मंत्री अशी विविध पदे धारण करण्याचा मान त्यांच्या नावावर आजही रूजू आहे. नव्वदच्या दशकात स्थायी स्वरुपातील लोकसभा दिवास्वप्न वाटावे अशी चमत्कारिक स्थिती देशात निर्माण झालेली असताना संगमा यांना लोकसभेचे सभापतीपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली खरी पण उणेपुरे दोन वर्षांचाच काळ त्यांना मिळाला. परंतु तरीही त्यांची या अल्प काळातील कारकीर्दही संस्मरणीय ठरली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बलाबलात फारच थोडा फरक असतो तेव्हां सभागृह चालविणे अधिकच कठीण असते. पण संगमा यांनी ते करुन दाखविले, ते त्यांच्या मिठ्ठास वाणीच्या मदतीने. ते मूलत: काँग्रेस कार्यकर्ते. युवक काँग्रेसपासून त्यांचा काँग्रेस प्रवास सुरु झाला. दुर्गम भागातील एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून असेल वा अन्य कारणांनी असेल काँग्रेसनेदेखील त्यांना भरभरुन दिले. परंतु केन्द्रातील रालोआची याआधीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर आणि काँग्रेसला अन्य पक्षांसोबत आघाडी करुन का होईना सत्ता स्थापन करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील असे गृहीत धरुन काँग्रेसमधील जी मंडळी अस्वस्थ झाली होती, त्यांचे म्होरकेपण करणाऱ्या शरद पवार, आणि तारीक अन्वर यांच्यासोबत पूर्णो संगमाही होते. तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तिघा नेत्यांच्या मनात बहुधा त्यावेळी स्वत:च्या लोकप्रियतेविषयी अफाट कल्पना असाव्यात. या कल्पनेपायीच मग संगमा यांनी भाजपातर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणब मुखर्जी यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी पुढे रेटली. ही बाब शरद पवारांना रुचली नाही कारण काळाची पावले ओळखून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सावरुन धरण्यासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती. तितकी राजकीय चतुराई संंगमांपाशी नसावी. परिणामी पवारांनी संगमांना पक्षातून डच्चू दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संगमा पराभूत होणारच होते व तसे ते झालेदेखील. तेथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची गाडी उताराला लागली. काही काळ त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये एक फेरी मारुन नंतर स्वत:चा वेगळा पक्षदेखील काढून पाहिला, पण त्यांचे राजकीय पुनर्वसन काही होऊ शकले नाही. संपुआच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची कन्या अगाथा संगमा केन्द्रात राज्यमंत्री झाली व तितकेच समाधान पित्याला मिळू शकले. पण आता संगमा यांच्या निधनाने हे सारे इतिहासजमा झाले आहे.