शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:52 IST

गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़.

ठळक मुद्देपुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजीभारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार

- विवेक भुसे- 

एका बाजूला गुन्हे उघडकीस आणण्याचे टेन्शन तर दुसरीकडे हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांशी सामना करण्याचे आव्हान या कात्रीत अडकलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा जीवावर उदार होऊन गुन्हेगारांना पकडायला जातात़. अनेकदा त्यात त्यांना यशही येते़ त्यावेळी त्यांनी किती धोका पत्करला होता, याची चर्चा होत नाही़. पण, एखाद्या प्रकरणात गुन्हेगारही जीवावर उदार झालेला असतो़. एक खुन केला तरी इतकीच शिक्षा आणि दोन खुन केले तरी तितकीच शिक्षा. ते मग पोलिसांच्या हाताला लागण्यापेक्षा त्यांच्यावर गोळीबार करुन सुटण्याचा प्रयत्न करतात़. अशातून एखादा पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जेव्हा जखमी होतो, तेव्हा पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी अगोदर घेण्याची गरज नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतो़ पुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणे पोलीस दल हादरुन गेले आहे़. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे़. मात्र, त्याचवेळी अशा हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजी घेतली पाहिजे की नाही़. अनेकदा गुन्हेगार शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळते़ ते वरिष्ठांना सांगून त्या ठिकाणी जातात़. पण, गुन्हेगाराजवळ पिस्तुल आहे, तो उलट हल्ला करु शकतो, याची शक्यता खूप असते़. अनेकदा अतिशय जोखीम पत्करुन पोलीस त्याला पकडतात़. त्यात त्यांना यशही येते़. त्यामुळे त्यांनी स्वत:चा जीव किती धोक्यात घातला आहे, याची कोठेही चर्चा होत नाही़. पण कधी तरी गुन्हेगारही स्वत:च्या जीवावर उदार झालेला असतो़ त्यातून तो पोलिसांवर फायरिंग करतो़ त्यात एखादा पोलीस जखमी झाला तर, त्याचा संपूर्ण पोलीस दलावर परिणाम होतो़ पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही, असे विचारले जाऊ लागते़. याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी वसंतराव कोरेगावकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, कोणतीही नोकरी म्हटले की त्यात रिस्क असते़. जवान जेव्हा सीमेवर जातो तेव्हा कोठूनही गोळीबार होईल व आपल्या प्राण घेतले जाऊ शकते याची त्याला जाणीव असते़. तसेच एखादा गुन्हेगार आपल्यावर हल्ला करु शकतो, हेही पोलिसांनी नोकरी प्रवेश केला तेव्हापासूनच त्याला माहिती असते़. हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी जेव्हा पोलीस जातात, तेव्हा ते आपल्यापरीने काळजी घेत असतात़. परंतु, अनेकदा प्रत्यक्ष स्पॉटवरील परिस्थिती वेगळी असते़. त्यावेळी संबंधित अधिकारी त्या क्षणाला सुचेल तसा निर्णय घेतो़. त्यातून अशा अनपेक्षित घटना घडू शकते़. त्यामुळे अशा घटनांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून जास्तीत जास्त खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे़. निवृत्त पोलीस अधिकारी शरद अवस्थी म्हणाले, पोलिसांना ना कायद्याचे सरंक्षण, ना समाजाचे त्यामुळे आता ते अनाथ झाले आहेत़. मानवाधिकार आयोगाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याचा फायदा फक्त गुन्हेगारांना झाला आहे़. एखाद्या चकमकीत गुन्हेगाराचा मृत्यु झाला तर त्याची लगेच चौकशी होते़. त्याच्या कारवाईवर संशय निर्माण केला जातो़. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणवून घेणारे त्या गुन्हेगारासाठी सरसावतात़. पण एखादा पोलीस अधिकारी, कर्मचारी गुन्हेगारांच्या गोळीबाराने मृत्यु पावला अथवा गंभीर जखमी झाला तर हेच मानवाधिकार कार्यकर्ते म्हणविणारे पुढे येत नाही़. भारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार आहे़. मात्र, हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना कायमच नाकारला जातो़. त्यामुळे तो दुसरीकडे गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा व्हावी, याचे दडपण असते़ आणि त्यात पुन्हा इन्काऊंटर झाला तर पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात केले जाते. ते वेगळेच़ त्यामुळे आता पोलीस इन्काऊंटर करायला धजावत नाही़. त्यामुळे गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़. जर गुन्हेगारांचा वाढता धुडगूस रोखायचा असेल तर पोलिसांना खुलेपणाने कारवाई करायला पाठिंबा दिला पाहिजे़ नाहीतर आता पोलीस प्रोटेक्शन फोर्स काढायची वेळ आली आहे़. 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार