शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दुष्काळाचा नवा अर्थ शोधावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:23 IST

दिवसागणिक आता दुष्काळाची दाहकता वाढत जाणार आहे. अन्नधान्याचा प्रश्न नाही. समस्या आहे ती पाण्याची. पाणीसाठे आटत चालले आणि भूगर्भातील पाणीही आटले. पाचशे फुटांपर्यंत पाणी सापडत नाही, अशी भयावह स्थिती आहे.

दिवसागणिक आता दुष्काळाची दाहकता वाढत जाणार आहे. अन्नधान्याचा प्रश्न नाही. समस्या आहे ती पाण्याची. पाणीसाठे आटत चालले आणि भूगर्भातील पाणीही आटले. पाचशे फुटांपर्यंत पाणी सापडत नाही, अशी भयावह स्थिती आहे. भयावह यासाठी की, जमिनीतच पाणी नसेल, तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते. कारण आपण या पाणीसाठ्यांचा बेसुमार उपसा केला. त्याचे हे परिणाम आहेत. ते आपण सध्या भोगतोय. पाणीटंचाई नाही, अशा गाव-शहरांची संख्या अगदीच कमी आहे. कालच सरकारने ९३१ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली. त्यापूर्वी १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांत दुष्काळाची दाहकता अधिक आहे. प. महाराष्ट्रातील सोलापूर त्यातच येते. सांगली, साताऱ्यातील काही तालुके म्हणजे माणदेश हा तर कायम दुष्काळी, एका अर्थाने फारच थोडा प्रदेश या नैसर्गिक आपत्तीतून सुटला आहे. तसा दुष्काळ महाराष्ट्राला नवा नाही. याचा पहिला परिणाम ग्रामीण जीवनावर होतो आणि लोकांचे शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. यापैकी फारच कमी लोक पुन्हा गावाकडे परततात. एका अर्थाने हे स्थलांतर ग्रामीण महाराष्ट्राचे ‘ब्रेनड्रेन’ आहे. शेती व्यवसायाचे कौशल्य गावाबाहेर कायमचे जाते, हा त्याचा अदृश्य परिणाम म्हणावा लागेल. सरकारने यानिमित्ताने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. एक तर पाणीटंचाई हाताळण्यासाठी टँकर सुरू केले. रोजगारासाठी रोजगार हमीची कामे सुरू केली. पुन्हा दुष्काळी गावातील पाणीपट्टी, वीज बिल वसुली थांबवली, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले. दुष्काळाला तोंड देताना या काही उपाययोजना केल्या जातात. त्या चाळीस वर्षे जुन्या आहेत. आजचे चित्र वेगळे आहे. रोजगार हमीची कामे हाती घेतली; पण तेथे काम करायलाच कोणी जात नाही. सरकारची योजना आहे, दुसरीकडे लोकांना रोजगारही पाहिजे; पण सरकारच्या या कामावर कोणी जात नाही. अशा परिस्थितीत कारणे शोधली पाहिजेत. ही योजना सुरू झाली त्या वेळी शिक्षणाचे प्रमाण अल्प होते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये कौशल्याचा अभाव होता. अशा वेळी रस्ते, नालाबंदिस्ती अशा कामांवर लोक जायचे आणि सरकारची योजना पूर्ण व्हायची. आता साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. शिवाय डिजिटल क्रांती खेड्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पारंपरिक मातीकामाला प्रतिष्ठा उरली नाही. अशा कामावर जाण्याचा कल कमी झाला. दुसरीकडे अशा कामासाठी यंत्रे आली. आता शेतीची नांगरटसुद्धा ट्रॅक्टरद्वारे होते. बैलाने शेती नांगरणारा किंवा शेतीची मशागत करणारा शेतकरी शोधावा लागतो. अशा परिस्थितीत रोजगार हमीच्या कामावर जाणार कोण? या रिकाम्या हातांना काम देण्यासाठी वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागेल. जे कौशल्य उपलब्ध आहे, त्यानुसार कामाची उपलब्धता करावी लागणार आहे. खेड्यातसुद्धा आता पारंपरिक बलुतेदारी लुप्त झाली; पण इलेक्ट्रिशियन, ट्रॅक्टरचालक, मळणीयंत्र चालविणारे असे नवे बलुतेदार तयार झाले आहेत. याची दखल घेतली पाहिजे. एका अर्थाने संपूर्ण रोजगार हमी योजनेचाच नव्याने विचार करावा लागेल. स्वत:च्या शेतीची मशागत करण्यासाठी शेतकºयांना रोहयोतून निधी द्यावा. सध्या रेशीम शेतीसाठी सरकारने ही योजना लागू केली आहे. त्या धर्तीवर शेतीची इतर कामे योजनेत आणली, तर आपल्याच शेतात तो काम करू शकेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. दुष्काळात वीज बिल, पाणीपट्टी, परीक्षा शुल्क आदी उपाययोजना या मलमपट्टीप्रमाणे असतात. त्या केल्या किंवा नाही केल्या तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. हल्ली तर शालेय शिक्षण मोफतच झालेले आहे. तातडीने गरज आहे ती जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची. ज्यामुळे पशुधन जगवता येईल. त्यापाठोपाठ पाण्याची सोय करणे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होणार आहे. जग वेगाने बदलत असताना त्याच गतीने आपल्यात बदल केला, तर आपण काळासोबत राहू शकतो. सध्या जगाची गती व आपल्या गतीत तफावत झाल्याने अंतर पडले आहे. ते भरून काढले तरच अशा संकटावर मात करता येईल. जुन्या निकषांवर आजचा दुष्काळ हाताळता येणार नाही, एवढे मात्र निश्चित. दुष्काळाचा नवा अर्थ शोधावा लागणार आहे, तरच ही समस्या, समस्या राहणार नाही.

टॅग्स :droughtदुष्काळ