शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लेख: १० ते १४ हजार रुपयांत महिना ढकलणाऱ्यांची कुटुंबकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:41 IST

गरिबी हटविण्याचे ध्येय दुर्लक्षून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढविण्याचे ध्येय जसे अन्यायकारक आहे, तसेच ती विकासाच्या कल्पनेतली गैरसमजूतही आहे.

अश्विनी कुलकर्णी,प्रगती अभियान

आपल्या आजूबाजूला राहाणारे शेजारी, नातेवाईक, कामाच्या निमित्ताने ज्यांच्याशी संबंध येतो, अशा आपल्या ओळखीतील किती कुटुंबे महिना दहा ते चौदा हजार रुपयात राहतात असे तुम्हाला वाटते? - या कुटुंबांच्या मिळकतीतली सरासरी अर्धी रक्कम अन्नधान्यासाठी खर्च होते आणि शाळा, औषधपाणी, कपडेलत्ते, घरभाडे, वीज, दैनंदिन प्रवासभाडे असे इतर सर्व खर्च शिल्लक रकमेतून होत असणार. एवढे आणि याहून कमी उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातल्या गरिबांची संख्या साधारण एक कोटीच्या वर  आहे.

आता पूर्वीइतकी गरिबी राहिलेली नाही हे खरे आहे. पण म्हणून आपल्या राज्यासाठी ‘गरिबी  हा मुख्य मुद्दा राहिलेला नाही’ असा आपला समज करून घेणे चुकीचे होईल. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) च्या नव्या आकडेवारीवर आधारित गरिबी रेषेचा अभ्यास अर्थशास्त्रज्ञांनी केला असून, त्यांचे अहवाल EPW या मान्यवर नियतकालिकांनी प्रकाशित केले आहेत. या अभ्यासातून महाराष्ट्रातील  ग्रामीण गरिबी, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. ओडिशामध्येही आज महाराष्ट्राच्या तुलनेत गरिबी कमी आहे, हे वाचल्यावर धक्का बसेल. पण हे सत्य होय!

पंधरा वर्षांपूर्वी २०१०-११ मध्ये तेंडुलकर समितीच्या शिफारशींवर आधारित मांडलेली गरिबीची व्याख्या सरकारने मान्य केली. गरिबीची व्याख्या सतत नव्याने अभ्यासणे गरजेचे आहे, कारण या माहितीच्या आधारावर धोरणे आणि योजना आखल्या जातात (म्हणजे तशी अपेक्षा आहे). तसे झाले नाही, तर विकासाचे प्रयत्न म्हणजे अंधारात बाण मारल्यासारखेच होईल. 

अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी २०४७ पर्यंत  ‘महाराष्ट्र राज्य ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल’ असा आत्मविश्वास नीति आयोगच्या बैठकीत बोलून  दाखवला. हा आकडा म्हणजे पाचावर नेमकी किती शून्ये हे आपल्याला कळत  नाही, पण राज्याच्या अर्थव्यवहाराचा  आकार २०४७ साली  इतका  वाढलेला असेल  तर बहुतांश  लोकांच्या जीवनमानात  मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असेल  असे गृहीत धरता  येईल का? आपली अर्थव्यवस्था वाढली की त्याचा फायदा सर्वांना होतोच असे नाही.  काही विशिष्ट गटातील लोकांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आणि मोठी लोकसंख्या मात्र या विकासात सामावली गेली नाही;  तरीही एकंदर अर्थव्यवस्थेचा आकार वाढलेला असू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार किती मोठा झाला यापेक्षा ‘राज्यातील  दरडोई सरासरी उत्पन्न’ किती झाले हे महत्त्वाचे.

थोडक्यात, आपल्या राज्यात गरिबांची संख्या खूप मोठी आहे हे वास्तव मान्य करून कामाला लागले पाहिजे. मोठाल्या महामार्गांचे नियोजन करताना त्यांना जोडणऱ्या रस्त्यांचे जाळे गावागावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन त्यातच अंतर्भूत असले पाहिजे. विमानतळे बांधायची आणि बसस्थानकांकडे दुर्लक्ष, आरोग्या विमा दिला म्हणून बालमृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना कात्री, असे होता कामा नये. किसान सन्मान निधी दिला, तरीही शेतीसाठीच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची गरज कमी होत नाही, याचे भान सुटता कामा नये.

‘५ ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी’ वगैरे भाषेत आपण बोलायला लागलो की डोळे दीपतात आणि गरिबीची तीव्रता, गरिबांची मोठी संख्या त्या झगमगाटात दिसेनाशी होते. मग  विकासाची कल्पनाही संकुचित होते. आपल्याला अर्थातच मोठे स्वप्न पाहायचे आहे. पण गरिबी हटविण्याचे ध्येय दुर्लक्षून  अर्थव्यवस्थेचा  आकार वाढविण्याचे ध्येय हे जसे अन्यायकारक आहे, तसेच ती विकासाच्या कल्पनेतली गैरसमजूतही आहे. उलट राज्यात गरिबी आहे आणि त्यासाठी अग्रक्रमाने योजना राबविल्या पाहिजेत हे नोकरशाहीने मनात बिंबवलेले असेल तरच ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याच्या  स्वप्नाला अर्थ प्राप्त होईल.  गरिबी हटविण्याचे  ध्येय अग्रक्रमाने बाळगले आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यावर रोख राहिला तर अर्थव्यवस्थेचा आकार वाढण्याची शक्यताही वाढते.

समाजातील  तळातील  लोकांच्या  जीवनमानात  मोठा बदल न होता अर्थव्यवस्थेचा आकार आणि आकडे फक्त वाढत राहिले, तर  त्याला राज्याचा विकास म्हणता येईल का? 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFamilyपरिवार