शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

लेख: १० ते १४ हजार रुपयांत महिना ढकलणाऱ्यांची कुटुंबकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:41 IST

गरिबी हटविण्याचे ध्येय दुर्लक्षून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढविण्याचे ध्येय जसे अन्यायकारक आहे, तसेच ती विकासाच्या कल्पनेतली गैरसमजूतही आहे.

अश्विनी कुलकर्णी,प्रगती अभियान

आपल्या आजूबाजूला राहाणारे शेजारी, नातेवाईक, कामाच्या निमित्ताने ज्यांच्याशी संबंध येतो, अशा आपल्या ओळखीतील किती कुटुंबे महिना दहा ते चौदा हजार रुपयात राहतात असे तुम्हाला वाटते? - या कुटुंबांच्या मिळकतीतली सरासरी अर्धी रक्कम अन्नधान्यासाठी खर्च होते आणि शाळा, औषधपाणी, कपडेलत्ते, घरभाडे, वीज, दैनंदिन प्रवासभाडे असे इतर सर्व खर्च शिल्लक रकमेतून होत असणार. एवढे आणि याहून कमी उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातल्या गरिबांची संख्या साधारण एक कोटीच्या वर  आहे.

आता पूर्वीइतकी गरिबी राहिलेली नाही हे खरे आहे. पण म्हणून आपल्या राज्यासाठी ‘गरिबी  हा मुख्य मुद्दा राहिलेला नाही’ असा आपला समज करून घेणे चुकीचे होईल. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) च्या नव्या आकडेवारीवर आधारित गरिबी रेषेचा अभ्यास अर्थशास्त्रज्ञांनी केला असून, त्यांचे अहवाल EPW या मान्यवर नियतकालिकांनी प्रकाशित केले आहेत. या अभ्यासातून महाराष्ट्रातील  ग्रामीण गरिबी, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. ओडिशामध्येही आज महाराष्ट्राच्या तुलनेत गरिबी कमी आहे, हे वाचल्यावर धक्का बसेल. पण हे सत्य होय!

पंधरा वर्षांपूर्वी २०१०-११ मध्ये तेंडुलकर समितीच्या शिफारशींवर आधारित मांडलेली गरिबीची व्याख्या सरकारने मान्य केली. गरिबीची व्याख्या सतत नव्याने अभ्यासणे गरजेचे आहे, कारण या माहितीच्या आधारावर धोरणे आणि योजना आखल्या जातात (म्हणजे तशी अपेक्षा आहे). तसे झाले नाही, तर विकासाचे प्रयत्न म्हणजे अंधारात बाण मारल्यासारखेच होईल. 

अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी २०४७ पर्यंत  ‘महाराष्ट्र राज्य ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल’ असा आत्मविश्वास नीति आयोगच्या बैठकीत बोलून  दाखवला. हा आकडा म्हणजे पाचावर नेमकी किती शून्ये हे आपल्याला कळत  नाही, पण राज्याच्या अर्थव्यवहाराचा  आकार २०४७ साली  इतका  वाढलेला असेल  तर बहुतांश  लोकांच्या जीवनमानात  मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असेल  असे गृहीत धरता  येईल का? आपली अर्थव्यवस्था वाढली की त्याचा फायदा सर्वांना होतोच असे नाही.  काही विशिष्ट गटातील लोकांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आणि मोठी लोकसंख्या मात्र या विकासात सामावली गेली नाही;  तरीही एकंदर अर्थव्यवस्थेचा आकार वाढलेला असू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार किती मोठा झाला यापेक्षा ‘राज्यातील  दरडोई सरासरी उत्पन्न’ किती झाले हे महत्त्वाचे.

थोडक्यात, आपल्या राज्यात गरिबांची संख्या खूप मोठी आहे हे वास्तव मान्य करून कामाला लागले पाहिजे. मोठाल्या महामार्गांचे नियोजन करताना त्यांना जोडणऱ्या रस्त्यांचे जाळे गावागावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन त्यातच अंतर्भूत असले पाहिजे. विमानतळे बांधायची आणि बसस्थानकांकडे दुर्लक्ष, आरोग्या विमा दिला म्हणून बालमृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना कात्री, असे होता कामा नये. किसान सन्मान निधी दिला, तरीही शेतीसाठीच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची गरज कमी होत नाही, याचे भान सुटता कामा नये.

‘५ ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी’ वगैरे भाषेत आपण बोलायला लागलो की डोळे दीपतात आणि गरिबीची तीव्रता, गरिबांची मोठी संख्या त्या झगमगाटात दिसेनाशी होते. मग  विकासाची कल्पनाही संकुचित होते. आपल्याला अर्थातच मोठे स्वप्न पाहायचे आहे. पण गरिबी हटविण्याचे ध्येय दुर्लक्षून  अर्थव्यवस्थेचा  आकार वाढविण्याचे ध्येय हे जसे अन्यायकारक आहे, तसेच ती विकासाच्या कल्पनेतली गैरसमजूतही आहे. उलट राज्यात गरिबी आहे आणि त्यासाठी अग्रक्रमाने योजना राबविल्या पाहिजेत हे नोकरशाहीने मनात बिंबवलेले असेल तरच ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याच्या  स्वप्नाला अर्थ प्राप्त होईल.  गरिबी हटविण्याचे  ध्येय अग्रक्रमाने बाळगले आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यावर रोख राहिला तर अर्थव्यवस्थेचा आकार वाढण्याची शक्यताही वाढते.

समाजातील  तळातील  लोकांच्या  जीवनमानात  मोठा बदल न होता अर्थव्यवस्थेचा आकार आणि आकडे फक्त वाढत राहिले, तर  त्याला राज्याचा विकास म्हणता येईल का? 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFamilyपरिवार