शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

शेतकऱ्यांची आत्महत्या वर्तमानाचे अन् मुलांचे कुपोषण भविष्याचे अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 05:10 IST

शेतकरी आत्महत्या करतात, लहान मुले कुपोषित राहतात आणि राज्याचे मंत्री आणि केंद्रातले नेते ‘अच्छे दिन’ची बात करतात यातील वदतो व्याघात समजला पाहिजे व तो तत्काळ मिटविला पाहिजे.

जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत ६१० शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या तर २०१५ ते २०१८ या ‘अच्छे दिना’च्या काळात १२,६६१ शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या मार्गाने मृत्यू पत्करला. प्रत्यक्ष राज्य सरकारने ही माहिती विधिमंडळातील एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. मात्र एवढ्या आत्महत्या होऊनही त्यातील फक्त १९६ आत्महत्याग्रस्त कुटुंबेच सरकारी मदतीला पात्र होणारी आहेत, असे संतापजनक विधानही याचवेळी सरकारकडून करण्यात आले. शेतकरी कर्जबाजारीपणापायी आत्महत्या करतात, दुष्काळासाठी करतात आणि घरातल्या टंचाईपायीही करतात. प्रश्न या आत्महत्या कोणत्याही कारणाखातर झाल्या असल्या तरी त्याची झळ त्या शेतकºयाच्या कुटुंबीयांना सारखीच बसत असते. सबब आत्महत्याग्रस्तांची सारीच कुटुंबे सरकारी मदतीला पात्र ठरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. केवळ कर्जमाफी केल्याने वा जुजबी मदत पुरविल्याने शेतक-यांच्या आत्महत्या थांबतात असे नाही. आत्महत्या हा सर्व बाजूंनी निराश झालेल्या माणसाचा अखेरचा पर्याय असतो. ही निराशा केवळ दारिद्र्यातून येत नाही. ती जीवनातील एकूणच पराभवातून येत असते.

सबब सरकारची जबाबदारी केवळ आर्थिक मदत देऊन संपत नाही. जीवनाला विटलेल्या शेतक-यांना आधार देण्यानेच ती पूर्ण करता येते. महाराष्ट्र सरकारच्या या अपयशावर आता केंद्र सरकारनेही शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेली ३६ टक्के मुले कुपोषित असल्यामुळे ती वजनाने कमी आहेत आणि त्यांची उंचीही नियमितपणे वाढत नाही, असे केंद्र सरकारनेच आता म्हटले आहे. शेतकºयांच्या आत्महत्या आणि बालकांचे कुपोषण ही अंत्योदयाच्या कार्यक्रमाची आरंभ रेषा आहे. हा देश शेतकºयांचा आहे, असे गांधीजी म्हणत. पण शेतकरीच आत्महत्या करीत असतील आणि नव्याने जन्माला येणारी मुले मुळातच दुबळी व कुपोषित राहत असतील तर हे राष्ट्र समर्थपणे कधी उभे होणारच नाही. कुपोषणाच्या घटनांची माहिती सर्वप्रथम १९९० च्या सुमाराला जनतेसमोर आली.

आत्महत्यांचे प्रकारही त्याच काळात मोठ्या प्रमाणावर घडल्याचे देशाला दिसले. या गोष्टीला आता ३० वर्षे होत आली. एवढ्या काळात देशाच्या पोषणकर्त्याला वाचविण्यात सरकार अपयशी झाले असेल आणि येणाºया नव्या पिढ्यांना सशक्ततेचे आश्वासन देण्यात ते हरले असेल तर मग असली सरकारे असून नसून त्यांचा काही फायदा नसतो. देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक व औद्योगिक विकास नव्हे. विकासाचा खरा अर्थ नागरिकांची उन्नती हा होय. ती होत नसेल तर बाकीचा विकास हा नुसता वरवरचा देखावा ठरतो आणि त्या देखाव्याचा उपयोगही काही मूठभर माणसेच करीत असतात. देश साºयांचा असेल तर त्याच्या विकासाचा लाभ साºयांना व त्यातही जे साºयांत मागे आहेत त्यांना होणे गरजेचे आहे. तो होत नसेल तर त्याची कारणे सरकारच्या धोरणविषयक अपयशात पाहावी लागतील.

चुकीचे धोरण व चुकीची अंमलबजावणी यामुळे देशाची श्रीमंती वाढली तरी त्यातील गरिबांची दुरवस्था वाढत असते. त्यामुळे यासंदर्भातील धोरणाची आखणी ग्रामीण भागापासून सुरू होऊन ती दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. दिल्लीत आणि मुंबईत धोरण ठरणार, त्याच्या अंमलबजावणीची कारवाईही तेथेच ठरणार. मात्र त्याचा लाभ ज्यांना द्यायचा ते यापासून दूर राहणार हा प्रकार मुळातच चुकीचा व गंभीर आहे. आर्थिक विकासाचा लाभ ज्यांना द्यायचा तो सामान्य माणूस सा-या धोरणाच्या आखणीत अग्रक्रमाचा विषय बनला पाहिजे व त्याला मध्यवर्ती मानून सारी धोरणे निश्चित केली पाहिजेत. शेतकरी आत्महत्या करतात, लहान मुले कुपोषित राहतात आणि राज्याचे मंत्री आणि केंद्रातले नेते ‘अच्छे दिन’ची बात करतात यातील वदतो व्याघात समजला पाहिजे व तो तत्काळ मिटविला पाहिजे. शेतक-यांची आत्महत्या वर्तमानाचे अपयश सांगतात तर मुलांचे कुपोषण हे भविष्याचेही अपयश सांगतात. हे अपयश तत्काळ मिटविले जाणे आवश्यक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या