शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बेरोजगारांची फॅक्टरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:21 AM

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात.

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात. स्पर्धेचे जग, खासगी कंपन्यांमधील अस्थिर वातावरण आणि लहानपणापासून मनावर बिंबविले गेलेले सरकारी नोकरीचे महत्त्व यामुळे अख्ख्या पिढ्या आपला उमेदीचा काळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीत घालवितात. त्यांच्या हाती काय पडते, हे सध्या राज्यभरात निघणाºया विद्यार्थ्यांच्या मोर्चांनी दाखवून दिले आहे. शेतावर पोट भरत नाही आणि किमान पोट भरेल, एवढ्या पैशांची नोकरी कुठेच मिळत नाही. हीच या तरुणांची मुख्य अडचण आहे. कॉलेजेस वाढले. स्पर्धा वाढली. एकट्या मराठवाड्यात ३० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि ७५ तंत्रनिकेतन संस्था आहेत. वर्षाला सहा हजार पदवीधारक आणि १६ हजार पदविकाधारक अभियंते बाहेर पडतात. काय होते त्यांचे? पाच-सहा हजारांची नोकरी मिळाली तरी बेहतर. काय करायचे या पदव्यांचे? बेरोजगारांची फॅक्टरी बनलेल्या या महाविद्यालयांचे? २०१४-१५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशभरातील बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. २०१५-१६ साली तो वाढून ५ टक्क्यांवर आला. २०१४ ची निवडणूक लढविताना मोदी सरकारने दरवर्षी एक कोटी रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले. एका खासगी सर्वेक्षणानुसार, २०१४ नंतर तीन वर्षांत केवळ १५ लाख रोजगार निर्मिती झाली. याउलट २०१४ च्या आधी तीन वर्षांत २५ लाख रोजगार निर्मिती झाली. १ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार देशभरात शासकीय नोकºयांमधील ४ लाख १२ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. या लोकसेवा आयोगाला वेळेचे काही देणेघेणेच राहिले नाही. जागांची जाहिरात काढायची पहिल्या वर्षी. परीक्षा घ्यायची दुसºया वर्षी. निकाल तिसºया वर्षी. पुढे एखादा कोर्टात जातो आणि पूर्ण प्रक्रियेवरच स्थगिती मिळवितो किंवा निकाल लागूनही आॅर्डर हाती पडत नाही. जुन्या जागा भरल्या जात नाहीत आणि नव्या निघत नाहीत. कुणी म्हणेल, ‘नोकरीच कशाला हवी? धंदापाणी करावा. मोक्याच्या ठिकाणी साधे पकोडे विकले तरी भरपूर कमाई होईल तरुणांची.’ मग पकोडेच विकायचे असतील, तर शिक्षणावर लाखोंचा खर्च करायचा कशासाठी?

टॅग्स :Indiaभारत