शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आजचा अग्रलेख: फोडा आणि जोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 11:14 IST

भ्रष्ट मार्गाने पैसे खाणाऱ्या प्रवृत्तीला हजारो तोंडे फुटलेली असतात. सध्या गाजत असलेले पेपरफुटी प्रकरण हे त्याचेच उदाहरण म्हटले पाहिजे.

भ्रष्ट मार्गाने पैसे खाणाऱ्या प्रवृत्तीला हजारो तोंडे फुटलेली असतात. सध्या गाजत असलेले पेपरफुटी प्रकरण हे त्याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. आरोग्य विभाग, शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडा अशी तीन-तीन पेपरफुटी प्रकरणे सध्या बाहेर आली आहेत. त्याचा संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. ज्या परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात, तिच्या दोन आयुक्तांनाच बेड्या ठोकल्या गेल्या. ज्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीवर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी होती, त्या कंपनीच्या संचालकांनाही अटक करण्यात आली. २०१८पासून हे प्रकरण घडत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, हे अजून पूर्ण तपासाअंती उघड व्हायचे आहे. त्याचा छडा लावण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे. 

आरोग्य विभागाच्या ‘गट ड’चा पेपर औरंगाबादेत व्हाॅट्सॲपवरून फुटला आणि या प्रकरणाचे बिंग बाहेर पडले, अन्यथा गेली तीन-चार वर्ष हे प्रकरण बिनबोभाट सुरू होते, ते कदाचित तसेच चालू राहिले असते. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीला प्राप्त ठरवताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विविध पात्रता परीक्षा घेतल्या जातात. त्या सक्तीच्या असल्यामुळे नोकरीसाठी अनेकजण लांड्यालबाड्या करून या परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात  असत. याच मानसिकतेचा गैरफायदा स्वतः परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि सुखदेव ढेरे यांनी घेतला.  त्यासाठी त्यांनी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला हाताशी धरले. या दोघांकडे सर्वाधिकार असल्याने हे प्रकरण बाहेर पडत नव्हते. 

‘म्हाडा’चा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर ती परीक्षाच रद्द करण्यात आली. त्यानंतर हळूहळू एकामागोमाग एक ही पेपरफुटीची प्रकरणे बाहेर येऊ लागली. या प्रकरणावरून मध्य प्रदेशात २०१३मध्ये उजेडात आलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापम) घोटाळ्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मोठा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. कंत्राटी शिक्षक, अन्न निरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आले. याची व्याप्ती एवढी मोठी होती की, आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर बड्या धेंड्यांसह दोन हजारांवर लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सरळमार्गाने करियर बनवू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा झाला तो वेगळाच. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पोलीस भरती प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वर्ग क आणि ड भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांचे पेपर फुटले. त्यानंतर टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार पुढे आला. 

पोलीस भरती प्रकरण वगळता उर्वरित तिन्ही पेपरफुटी घोटाळ्यांचा मास्टरमाईंड म्हणून जी. ए. सॉफ्टवेअरचा महाराष्ट्रातील संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याचे नाव पोलीस तपासातून पुढे आले. विशेष म्हणजे या तीनही परीक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट बंगळुरूच्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते. एमबीबीएस झालेल्या देशमुखने मंत्रालयातील लागेबांधे वापरुन कंपनीला ही कंत्राटे मिळवून दिली. त्याची बक्षिसी म्हणून कंपनीने त्याला संचालकपदी नेमले. राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्त तुकाराम सुपे याची त्याला साथ मिळाली. या दुकलीने जो काय धुडगूस घातला आहे, त्याने प्रशासनाची आणि सरकारचीदेखील लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सर्व स्तरांवर अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे यात सहभागी असलेली मंत्रालयातील बडी धेंडे कोण, याचा पोलिसांनी आता शोध घेतला पाहिजे. 

या दोघांनी  जमविलेली माया आणि घोटाळ्याची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात घेतल्यावर प्रशासकीय कारभार सर्वसामान्यांना दिसतो तसा नसून तो आतून किती पोखरलेला आहे, हेच दिसून येते. परीक्षा मंडळासारख्या महत्त्वाच्या विभागाकडे सत्ताधाऱ्यांचेदेखील वेळीच का लक्ष गेले नाही की, ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांमुळे त्याकडे कानाडोळा करण्यात आला, हा देखील तपासाचा भाग असला पाहिजे. पेपर फोडा, पैसे खा आणि नोकरीसाठी जोडा, असे तंत्र यामध्ये वापरलेले दिसते. सुदैवाने हे प्रकरण उघडकीस आल्याने आयुक्त स्तरावरील भ्रष्टाचार उघडा पडला आहे. आणखी कोणती मोठी धेंडे यात सापडतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र