शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:29 IST

मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, ‘‘२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ घोषणा आठवते ना?’’ - पण हेही खरे की, २००४ च्या ‘त्या’ चित्रात नरेंद्र मोदी नव्हते!

-प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार निवडणुका हा केवळ मनोबलाचा खेळ असता तर एव्हाना भाजप  सत्तारूढ होऊन नरेंद्र मोदी वाढीव संख्याबळानिशी आपला लोककल्याण मार्ग आक्रमत असलेले आपल्याला दिसले असते; पण अठराव्या लोकसभेसाठी नव्वद कोटी लोकांचे प्रत्यक्ष मतदान अजून व्हायचे आहे. आताच्या सुमारे साडेतीनशेच्या जागी चारशे जागा मिळवून आपण सत्तेत येणार असे पंतप्रधानांनी घोषित करून टाकले आहे. येत्या निवडणुकीची चर्चा सरकारच्या कामगिरीऐवजी मोदींना किती जागा मिळणार, याच प्रश्नाभोवती घुमत राहील, याची दक्षता त्यांनी घेतलेली दिसते. एकाच वेळी आपल्या संभाव्य विजयाचे टोलेजंग चित्र समोर ठेवून प्रतिस्पर्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करणे आणि आपल्या पाठीराख्या मतदारांना उत्साहित करणे असे दोन्ही पक्षी त्यांनी एकाच दगडात नेमके टिपले आहेत. प्रत्यक्षात काय होईल? - आपण थोडे गणित मांडून पाहूया.

घडवू बिघडवू शकणारी राज्येमागील लोकसभेतील ३०३ जागा अबाधित ठेवत ३७० चे नवे अविश्वसनीय लक्ष्य गाठायचे असेल तर महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांना असाधारण महत्त्व आहे. सध्या या राज्यातल्या लोकसभेच्या ११६ पैकी १०६ जागा भाजपकडे आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय उलथापालथींमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातील निकालांना अधिक महत्त्व असेल. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-जेडीयूने बिहारमध्ये एकत्र लढून ४० पैकी ३९ जागा मिळवल्या होत्या. मग नितीशकुमार यांनी फुटून आरजेडीबरोबर सरकार बनवलं आणि आता पुन्हा ते भाजपबरोबर आलेत. यामुळे वंचित जातींप्रति त्यांच्या बांधिलकीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. २०१९ मध्ये भाजपने लढवलेल्या १७ च्या १७, जेडीयूने १७ पैकी १६ आणि लोजपाने काँग्रेस आणि मित्रपक्षांविरुद्ध लढवलेल्या सर्व सहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी नितीश इतक्या जागा राखतील? चिराग पासवान यांचा पक्ष शंभर टक्के यश मिळवेल? -  निवडणूक तज्ज्ञांच्या मते मित्रांमुळे होणारे नुकसान भाजप अधिक जागा मिळवून भरून काढेल. यात भाजप अधिक जागा लढवेल हे गृहीत आहे; पण नितीशकुमार आणि तरुण रक्ताचा दलित नेता चिराग पासवान या दोघांच्या औदार्यावरच ते अवलंबून असेल.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा गुंताही सोपा नाही. भाजप आणि एकसंध शिवसेना व मित्रपक्षांनी मिळून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील पक्षांतरे व फूट यामुळे आगामी निवडणूक निकालाचे चित्र धूसर बनले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा १८ खासदार निवडून आणू शकेल का? की ‘एनडीए’ची बेरीज वाढावी म्हणून भाजप अधिक जागा लढवेल? कर्नाटकात नुकतीच विधानसभा निवडणूक जिंकलेली असल्याने पारडे काँग्रेसकडे थोडे झुकलेले आहे. 

बाजी पलटवावी लागेल अशी राज्ये२०१९ साली एकंदर १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात भाजपला एकूण ९२ पैकी एकही जागा मिळालेली नव्हती. त्यात आंध्रातील २५, केरळातील २० आणि तामिळनाडूतील ३९ जागांचा समावेश होतो. पक्षाने स्वतःच केलेल्या अभ्यासानुसार देशभरातील एकूण १७५ मतदारसंघात भाजपने क्वचितच विजय नोंदवला आहे. यात दक्षिणेतील तीन राज्यांबरोबरच ईशान्य आणि पश्चिमेकडील बराच मोठा प्रदेश येतो.

लोकसभा निवडणुकीत सहभागी नसलेले मंत्री आणि इतर ज्येष्ठ राज्यसभा सदस्य गेले वर्षभर या मतदारसंघांत तळ ठोकून ‘विकसित भारता’च्या मोदी मंत्राचा प्रसार करीत आहेत. इतिहासात प्रथमच आपण यापैकी १०० जागांवर दावा करू शकू, अशी निश्चिंती पक्षाला वाटत आहे. तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्यात अभूतपूर्व यश मिळवून आपण ३७० चे लक्ष्य गाठू, अशी खात्री पक्षाचे नेतृत्व जनतेला देत आहे. कर्नाटकातील २५ जागा अबाधित राखून दक्षिणेतील उर्वरित चार राज्यांत मिळून १०१ पैकी ४१ जागा जिंकण्याची आशा हा पक्ष बाळगून आहे. या सगळ्या राज्यांत मोदी जास्तीत जास्त सभा घेतील. छोट्या पक्षांबरोबर जातीनिहाय आघाडी बनवली जाईल. स्थानिक सेलिब्रिटीजना उमेदवारी दिली जाईल. भाजपच्या या जादुई लक्ष्याला पश्चिम बंगालमध्ये किमान पूर्वीएवढ्या म्हणजे १८ जागा मिळवण्याच्या आत्मविश्वासाचाही आधार आहे. 

बहुसंख्य जागा मिळवून देणारी राज्ये३७० चा आकडा गाठायचा तर उत्तरेतील आणि पश्चिमेच्या काही भागातील जवळजवळ शतप्रतिशत यशाची पुनरावृत्ती भाजपला करावीच लागेल. उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, दिल्ली व झारखंडमधील १२७ पैकी १२१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह ४००चा पल्ला गाठण्यासाठी या सर्व राज्यांतील २०१९ ला जिंकलेल्या सगळ्या जागा भाजपला याहीवेळी जिंकाव्याच लागतील. यापैकी काही ठिकाणी ‘इंडिया आघाडी’ने बऱ्यापैकी आकार घेतला असल्याने पूर्वयशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी तितके सोपे नसेल. अर्थात, हे आकडे काही आकडी आणणारे नाहीत. १९८४ चा अपवाद वगळता कुठल्याही पक्षाने मित्रपक्षांसहसुद्धा ४०० चा आकडा गाठलेला नाही. इंदिरा गांधींच्या दारुण हत्येनंतर काँग्रेसने ४०४ चा आकडा गाठला; पण २०२४ म्हणजे काही १९८४ नव्हे. तसा कोणताच भावनात्मक मुद्दा आज ऐरणीवर नाही.मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, “२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ ही घोषणा आठवते ना?” पण हेही खरे की २००४ च्या चित्रात नरेंद्र मोदी नव्हते!

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी