शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

अभियंत्यांची गर्दी

By admin | Updated: March 23, 2017 23:15 IST

देशभरात मशरूमप्रमाणे उगवलेली अभियांत्रिकी महाविद्यालये, तेथील शिक्षणाचा निकृष्ट दर्जा आणि या कारखान्यांमधून मागणीपेक्षा कितीतरी

देशभरात मशरूमप्रमाणे उगवलेली अभियांत्रिकी महाविद्यालये, तेथील शिक्षणाचा निकृष्ट दर्जा आणि या कारखान्यांमधून मागणीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात होणारा अभियंत्यांचा पुरवठा यामुळे अभियांत्रिकीच्या क्षेत्राला कधी नव्हे एवढी उतरती कळा लागली आहे. एक काळ असा होता जेव्हा अभियंता असणे हे जसे प्रतिष्ठेचे मानले जायचे तसे ते बुद्धिवंतांचे लक्षणही होते. परंतु गेल्या एक- दीड दशकापासून अभियांत्रिकी शाखेवरील विद्यार्थी व पालकांच्या उड्या वाढतच गेल्या. आणि मग केवळ पैसा हेच भविष्याचे ध्येय बाळगणाऱ्या शिक्षणसम्राटांनी या संधीचा फायदा घेत अभियांत्रिकी महाविद्यालये उघडण्याचा सपाटाच लावला. शासनानेही त्यांना कधी रोखले नाही. तिजोऱ्या भरणे हाच एकमेव उद्देश असल्याने देशाला खरोखरच एवढ्या अभियंत्यांची गरज आहे काय? या अभियंत्यांना सामावून घेणारे उद्योग आहेत का? याचा साधा विचारही करण्याची गरज कुणाला वाटली नाही. तंत्रशिक्षण संस्थांमधून दरवर्षी पदवी घेणाऱ्या आठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधर बेरोजगार राहतात हे धक्कादायक वास्तव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मांडले आहे. त्यातील आणखी चिंतेची बाब म्हणजे बहुतांश तंत्रशिक्षण संस्था म्हणजे नोकरी मिळण्यास अपात्र असे पदवीधर निर्माण करणारे कारखानेच झाले असल्याचे निरीक्षणही परिषदेने नोंदविले आहे. आणि ते सत्य आहे. मध्यंतरी केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनीसुद्धा अभियांत्रिकी महाविद्यालयांना अवकळा आल्याची कबुली देताना व्यावसायिक कौशल्यावर भर दिला होता. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर स्कील डेव्हलपमेंटचा नवा अहवाल अत्यंत बोलका आहे. आपल्या देशातील शिक्षित बेरोजगारांपैकी ३४ टक्के बेरोजगार हे रोजगारास पात्रच नसतात, असे या अहवालात नमूद आहे. याचा अर्थ असा की एकीकडे आम्ही अभियंते आणि डॉक्टरांच्या फौजा तर निर्माण करीत आहोत, पण त्यांना रोजगारास सक्षम करण्याकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. केंद्र शासनातर्फे कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अनेक घोषणा करण्यात येत असल्या तरी ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. पालकांनीही आता आपली मानसिकता बदलली पाहिजे.