शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

भुकेनं जागविलेली ‘ज्योती’ची ऊर्जा प्रेरणादायी ठरावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 00:13 IST

लॉकडाऊनमुळे वडिलांची रिक्षा बंद. घरात अन्नपाण्याची शाश्वती नाही.

- धनाजी कांबळे 

भूक माणसाला सैरभैर करते. अस्वस्थ करते. बेचैैन करते. तशीच ती छुप्या ऊर्ज$ेलादेखील जागी करते. स्वत्व जागं करते आणि ज्याला स्वत:ला ओळखता येते, तो जगातल्या कोणालाही ओळखू शकतो, हाच आजवरचा मोठ्या माणसांचा इतिहास आहे. स्वत:ला आणि स्वत:तील ऊर्जेला ओळखणारी माणसं एकदा उंच शिखराकडे झेपावली की, ती मागे वळून पाहात नाहीत. ती अग्निपंख होतात. फिनिक्सप्रमाणे भरारी घेतात. संघर्षाची आणि कष्टाची तयारी असेल, तर जगात अशक्य असे काही नसावे. १५ वर्षांच्या ज्योतीने आपल्या वडिलांना सायकलच्या कॅरिअरवर बसवून तब्बल १२०० किलोमीटर सायकल चालवत गाव गाठले आहे.

लॉकडाऊनमुळे वडिलांची रिक्षा बंद. घरात अन्नपाण्याची शाश्वती नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मिळेल त्या वाहनाने गावाच्या ओढीनं, पोटातली आग पायात एकवटून स्थलांतरितांचे तांडेच्या तांडे निघाले असताना आपल्याला वाहन मिळेल ना मिळेल, या विचारात न राहता सायकलच्या भरवशावर छोट्याशा अपघातात जखमी झालेल्या वडिलांना मागच्या सीटवर बसवून बिहारच्या दिशेने निघालेली ज्योती आता देशाची खऱ्या अर्थाने ‘आयडॉल’ आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यांच्या सीमा पार करून दुसºया राज्यात अडकून पडलेले मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने किंवा खाली जमीन, वर आकाश म्हणून अनवाणी रक्ताळलेल्या पायाने गावाकडची वाट तुडवत असताना गुरुग्राम ते बिहार असा १२०० किलोमीटरचा टप्पा केवळ सात दिवसांत पूर्ण करणारी ज्योतीकुमारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

एकीकडे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर होत असताना २० लाख कोटींतील कोणता शून्य आपल्या विकासासाठी आहे, याची तिळमात्र कल्पना नसलेल्या या ज्योतीकुमारीने सायकलीवर पार केलेल्या या प्रवासाची दखल सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने घेतली आहे. गावाकडे पोहोचलेल्या या ज्योतीला त्यांनी चाचणीसाठी बोलावले आहे. ज्योतीने ही चाचणी पूर्ण केल्यास नॅशनल सायकलिंग अकॅडमीमध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होण्याची शक्यता आहे.

सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी तशी घोषणा केली आहे. ही अकॅडमी स्पोर्टस् अथॉरिट आॅफ इंडियाची अत्याधुनिक सुविधांपैैकी एक मानली जाते. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च अकॅडमी करणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला या चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. तिने दाखविलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. ज्योतीचे वडील मोहन पासवान हे रिक्षाचालक होते. त्यांचा नुकताच एक छोटासा अपघात झाला आहे.

रोजगार बुडाल्याने कुटुंबाला जगविणे कठीण असल्याने गावाकडे परतण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अशा परिस्थितीत डोळ्यांसमोर दिसणारी सायकलच आपल्याला गावापर्यंत पोहोचवेल या विश्वासानेच ज्योतीकुमारीने वडिलांसोबत केलेला हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. जिद्द आणि चिकाटी असेल, तर ध्येय साध्य करता येते. मन ध्येयवेडं असेल तर अंगात बळही भरता येतं. त्यासाठी कोणतेही संकट आल्यावर रडत न बसता लढण्याची तयारी ठेवली, तर जग जिंकता येतं हे या ज्योतीकुमारीने दाखवून दिले आहे.ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, निर्धार पक्का आहे, त्याला कोणतेही ध्येय अशक्य नसते. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो, असं व. पु. काळे म्हणतात. ते ज्योतीकुमारीच्या बाबतीत चपखल खरे ठरले आहे.

प्रामाणिकपणे कष्ट करत राहणाºया माणसांना दु:ख, वेदना, संघर्ष नवा नसतो. कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्याठायी आपसूकच येते. जे लोक स्वत:ला ओळखतात, स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा ओळखतात, ते कधीच खचून जात नाहीत. ते संघर्ष करत राहतात. अनेकदा त्यांना समाजव्यवस्थेशीदेखील संघर्ष करावा लागतो. मात्र, ती लढत राहतात. ज्योतीकुमारीने कोणाच्या मदतीची वाट न पाहता स्वत:च पुढाकार घेऊन पोटातल्या भुकेतून आलेल्या ऊर्जेने वडिलांना गावाकडं नेलं. अशा अनेक रणरागिणी उन्हातान्हात तान्हुल्यांना अंगाखांद्यावर घेऊन आजही गावाकडची वाट तुडवत आहेत.

जातीय उतरंडीत तळातल्या समजल्या गेलेल्या समूहातील लोकांची संख्या यात मोठी आहे. हे वास्तव एकीकडे असताना ज्योतीकुमारीने दाखविलेल्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम.

अंधाराविरुद्ध संघर्ष करणाºया या ज्योतीपासून प्रेरणा घेऊन अशाच अनेक ज्योती निर्माण झाल्या, एकत्र आल्या, तर ही एकजुटीची मशाल नवीन प्रकाशपर्व घेऊन येईल. ...आणि तो दिवस फार दूर नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या