शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वारकऱ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 08:13 IST

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसून आठजणांचे बळी गेले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं वाटत असतानाच भरधाव वेगाचे हे वारकरी बळी ठरले. वर्षानुवर्षे वारीची परंपरा सुरू आहे. वाटेत अनेक विघ्ने आली तरी सुखनैव वाटचाल करणारे वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी म्हणत हा वैकुंठाचा मेळा विठुरायाच्या चरणी लीन होतो. अवघ्या दीनांचा हा नाथ, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. अशा गरीब वारकऱ्यांचा पायी पंढरपूरला जाण्याकडे ओढा असतो. मात्र, वाहनांची गर्दी, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. यापूर्वीही दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत असे अनेक अपघात झाले आहेत.

अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आषाढीसाठी वारकऱ्यांना विशेषत: मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळते. मात्र, लहान-मोठ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असते. उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर निघतात. त्यांचीही सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. तरीही अपघात होतच असतात. त्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय दिसत नाहीत. रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे काही भान राहिलेले नाही. शासनाच्या आकडेवारीनुसार २०२० साली रस्ते अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सांगण्यात आले होते. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसंदर्भात प्रशासन निर्देश देते, त्या प्रमाणात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या काळजीबाबत प्रशासन तितकेसे जागरूक आहे, असे वाटत नाही. पंढरपूरकडे येणारे रस्ते आता मोठे झाले आहेत.

अनेक महामार्ग तयार झाले आहेत. मात्र, रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने मदत कशी मिळेल, याची उपाययोजना अद्यापही झालेली नाही. रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची गर्दी वाढली असली तरी त्यांच्यासाठी वेगळे मार्ग उपलब्ध नाहीत. वाहनांचे आयुष्यमान, वाहनांची वाढती गर्दी, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यांचे योग्य पद्धतीने नियोजन नसणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधली जातात. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. परदेशात अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळते. तशी परिस्थिती भारतात नाही. त्यामुळे वाहतूक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. वारीच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांची वाढती संख्या.

दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या महिला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात. त्या विठुराया-रुक्मिणी मातेला साकडे घालून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. ही वारी म्हणजे आयुष्याचे सार आहे. आपल्या आयुष्यातील सारी दु:खे बाजूला सारून आनंदाचे चार क्षण आपल्या पदरात पडावेत म्हणून भाविक त्या विठुरायाकडे धाव घेतात. त्याच्या चरणी आपला माथा टेकवतात. केवळ धार्मिक भावनेतून नव्हे तर या जगाचा त्राता असणाऱ्या विठुरायाने आपले आयुष्य अधिक सुखकर करावे, ही त्यामागची आंतरिक तळमळ असते. त्यासाठी तेे मैलोनमैल, उन्हातान्हाची, पावसाची तमा न बाळगता चालत येतात. निर्मळ मनाने येणाऱ्या भाविकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे काम अशा अपघातांनी होते.

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये आपण रस्त्यांसाठी खर्च करीत आहोत, त्याचवेळी नागरिकांना रस्त्यावरून निर्धोकपणे जाता यावे, यासाठी उपाययोजना मात्र आपण करीत नाही. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्याकडे काही काळापुरते पाहतो, मृतांना मदतही करतो. ही अल्पावधीची मलमपट्टी फार काळ उपयोगी पडणार नाही. रस्त्यांचा विकास झाला, त्याने वाहनांचा वेग जरूर वाढला असेल. मात्र, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणार असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. गर्दीचे नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या जिवाचेही मोल अधिक प्रभावीपणे जपणे गरजेचे आहे. दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा अशा निष्पाप जिवांचे हकनाक बळी जातच राहतील. वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू