शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

वारकऱ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 08:13 IST

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसून आठजणांचे बळी गेले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं वाटत असतानाच भरधाव वेगाचे हे वारकरी बळी ठरले. वर्षानुवर्षे वारीची परंपरा सुरू आहे. वाटेत अनेक विघ्ने आली तरी सुखनैव वाटचाल करणारे वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी म्हणत हा वैकुंठाचा मेळा विठुरायाच्या चरणी लीन होतो. अवघ्या दीनांचा हा नाथ, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. अशा गरीब वारकऱ्यांचा पायी पंढरपूरला जाण्याकडे ओढा असतो. मात्र, वाहनांची गर्दी, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. यापूर्वीही दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत असे अनेक अपघात झाले आहेत.

अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आषाढीसाठी वारकऱ्यांना विशेषत: मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळते. मात्र, लहान-मोठ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असते. उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर निघतात. त्यांचीही सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. तरीही अपघात होतच असतात. त्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय दिसत नाहीत. रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे काही भान राहिलेले नाही. शासनाच्या आकडेवारीनुसार २०२० साली रस्ते अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सांगण्यात आले होते. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसंदर्भात प्रशासन निर्देश देते, त्या प्रमाणात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या काळजीबाबत प्रशासन तितकेसे जागरूक आहे, असे वाटत नाही. पंढरपूरकडे येणारे रस्ते आता मोठे झाले आहेत.

अनेक महामार्ग तयार झाले आहेत. मात्र, रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने मदत कशी मिळेल, याची उपाययोजना अद्यापही झालेली नाही. रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची गर्दी वाढली असली तरी त्यांच्यासाठी वेगळे मार्ग उपलब्ध नाहीत. वाहनांचे आयुष्यमान, वाहनांची वाढती गर्दी, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यांचे योग्य पद्धतीने नियोजन नसणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधली जातात. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. परदेशात अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळते. तशी परिस्थिती भारतात नाही. त्यामुळे वाहतूक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. वारीच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांची वाढती संख्या.

दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या महिला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात. त्या विठुराया-रुक्मिणी मातेला साकडे घालून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. ही वारी म्हणजे आयुष्याचे सार आहे. आपल्या आयुष्यातील सारी दु:खे बाजूला सारून आनंदाचे चार क्षण आपल्या पदरात पडावेत म्हणून भाविक त्या विठुरायाकडे धाव घेतात. त्याच्या चरणी आपला माथा टेकवतात. केवळ धार्मिक भावनेतून नव्हे तर या जगाचा त्राता असणाऱ्या विठुरायाने आपले आयुष्य अधिक सुखकर करावे, ही त्यामागची आंतरिक तळमळ असते. त्यासाठी तेे मैलोनमैल, उन्हातान्हाची, पावसाची तमा न बाळगता चालत येतात. निर्मळ मनाने येणाऱ्या भाविकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे काम अशा अपघातांनी होते.

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये आपण रस्त्यांसाठी खर्च करीत आहोत, त्याचवेळी नागरिकांना रस्त्यावरून निर्धोकपणे जाता यावे, यासाठी उपाययोजना मात्र आपण करीत नाही. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्याकडे काही काळापुरते पाहतो, मृतांना मदतही करतो. ही अल्पावधीची मलमपट्टी फार काळ उपयोगी पडणार नाही. रस्त्यांचा विकास झाला, त्याने वाहनांचा वेग जरूर वाढला असेल. मात्र, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणार असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. गर्दीचे नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या जिवाचेही मोल अधिक प्रभावीपणे जपणे गरजेचे आहे. दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा अशा निष्पाप जिवांचे हकनाक बळी जातच राहतील. वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू