शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

वारकऱ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 08:13 IST

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसून आठजणांचे बळी गेले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं वाटत असतानाच भरधाव वेगाचे हे वारकरी बळी ठरले. वर्षानुवर्षे वारीची परंपरा सुरू आहे. वाटेत अनेक विघ्ने आली तरी सुखनैव वाटचाल करणारे वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी म्हणत हा वैकुंठाचा मेळा विठुरायाच्या चरणी लीन होतो. अवघ्या दीनांचा हा नाथ, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. अशा गरीब वारकऱ्यांचा पायी पंढरपूरला जाण्याकडे ओढा असतो. मात्र, वाहनांची गर्दी, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. यापूर्वीही दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत असे अनेक अपघात झाले आहेत.

अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आषाढीसाठी वारकऱ्यांना विशेषत: मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळते. मात्र, लहान-मोठ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असते. उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर निघतात. त्यांचीही सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. तरीही अपघात होतच असतात. त्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय दिसत नाहीत. रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे काही भान राहिलेले नाही. शासनाच्या आकडेवारीनुसार २०२० साली रस्ते अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सांगण्यात आले होते. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसंदर्भात प्रशासन निर्देश देते, त्या प्रमाणात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या काळजीबाबत प्रशासन तितकेसे जागरूक आहे, असे वाटत नाही. पंढरपूरकडे येणारे रस्ते आता मोठे झाले आहेत.

अनेक महामार्ग तयार झाले आहेत. मात्र, रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने मदत कशी मिळेल, याची उपाययोजना अद्यापही झालेली नाही. रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची गर्दी वाढली असली तरी त्यांच्यासाठी वेगळे मार्ग उपलब्ध नाहीत. वाहनांचे आयुष्यमान, वाहनांची वाढती गर्दी, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यांचे योग्य पद्धतीने नियोजन नसणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधली जातात. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. परदेशात अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळते. तशी परिस्थिती भारतात नाही. त्यामुळे वाहतूक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. वारीच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांची वाढती संख्या.

दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या महिला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात. त्या विठुराया-रुक्मिणी मातेला साकडे घालून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. ही वारी म्हणजे आयुष्याचे सार आहे. आपल्या आयुष्यातील सारी दु:खे बाजूला सारून आनंदाचे चार क्षण आपल्या पदरात पडावेत म्हणून भाविक त्या विठुरायाकडे धाव घेतात. त्याच्या चरणी आपला माथा टेकवतात. केवळ धार्मिक भावनेतून नव्हे तर या जगाचा त्राता असणाऱ्या विठुरायाने आपले आयुष्य अधिक सुखकर करावे, ही त्यामागची आंतरिक तळमळ असते. त्यासाठी तेे मैलोनमैल, उन्हातान्हाची, पावसाची तमा न बाळगता चालत येतात. निर्मळ मनाने येणाऱ्या भाविकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे काम अशा अपघातांनी होते.

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये आपण रस्त्यांसाठी खर्च करीत आहोत, त्याचवेळी नागरिकांना रस्त्यावरून निर्धोकपणे जाता यावे, यासाठी उपाययोजना मात्र आपण करीत नाही. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्याकडे काही काळापुरते पाहतो, मृतांना मदतही करतो. ही अल्पावधीची मलमपट्टी फार काळ उपयोगी पडणार नाही. रस्त्यांचा विकास झाला, त्याने वाहनांचा वेग जरूर वाढला असेल. मात्र, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणार असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. गर्दीचे नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या जिवाचेही मोल अधिक प्रभावीपणे जपणे गरजेचे आहे. दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा अशा निष्पाप जिवांचे हकनाक बळी जातच राहतील. वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू