शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Education:गरिबांची मुले शिकतात, त्या शाळेत शिक्षक नसतात, हे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 09:14 IST

Education: गरिबांची मुले शिकतात, त्या शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत आणि शिक्षक होण्याची आस असलेल्या गरिबांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत; हे चित्र काय सांगते?

- विश्वनाथ कहाळेकर(नांडेड)शासनाने शिक्षणाच्याबाबतीत सातत्याने वेगवेगळी धोरणे आखली, अभ्यासक्रमात अनेक बदल केले. गरीब कुटुंबातील मूल शिकले पाहिजे, त्यांना पोषक आहार मिळाला पाहिजे, त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, तसेच मुलांना शिक्षण म्हणजे ओझे वाटले नाही पाहिजे, असा शासनाचा मानस आहे. त्यामुळे गरिबातील गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे वादे तर सगळ्याच सत्ताधारी लोकांनी सदैव केले.

नव्या शालेय शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शासनाच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पुस्तके देण्यात आली, वेगवेगळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे स्वागतही झाले. यावेळी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्येविद्यार्थीसंख्या वाढविण्याचा प्रयत्न त्या त्या शाळांनी केला आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये अजूनही शिक्षकांच्या प्रमाणात विद्यार्थी संख्या कमी दिसते, तर अनेक शाळा अशाही आहेत, जिथे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक नाहीत!

मागील १२-१३ वर्षांपासून शिक्षक भरतीकडे शासनाने म्हणावे तेवढे लक्ष पुरविले नाही. परिणामी, वर्षानुवर्षे निवृत्त होत गेलेल्या शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या वाढतच आहे, मात्र नव्याने भरती मात्र अतिशय धिम्या गतीने होत आहे. २०१० मध्ये सीईटीद्वारे शिक्षकांची भरती करण्यात आली. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता (टीईटी) व नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (टीएआयटी) चा नियम काढण्यात आला. त्यानुसार टीएआयटी परीक्षा २०१७ मध्ये राबविण्यात आली व पवित्र पोर्टलमार्फत १२ हजार जागा भरण्याचे घोषित करण्यात आले. मात्र, त्यापैकी केवळ ६ हजार जागा भरल्या असून, त्यातही अनेक घोळ, तक्रारी आहेतच. त्यामुळे त्या भरती प्रक्रियेवर अनेकांनी ताशेरे ओढले व संबंधित आयुक्त व पवित्र पोर्टल चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले. पुन्हा ही भरती प्रक्रिया राबविण्याचे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कंपनीला दिले व आयबीपीएसमार्फत जानेवारी २०१३ मध्ये टीएआयटी परीक्षा घेण्यात आली.

आता याद्वारे जास्तीत जास्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या डी. एड्... बी.एड्.धारकांनी मोठ्या आशेने परीक्षा दिली. त्याचा निकालही अपेक्षेप्रमाणे वेळेच्या आत लावण्यात आला. त्यामुळे आता पोर्टलही लवकर सुरू होणार व जूनपूर्वी आपल्याला शिक्षक म्हणून शाळेवर जाता येणार, असे अनेक परीक्षार्थीना वाटू लागले. मात्र, मागील चार-पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग, संचमान्यता, बिंदू नामावली अशा एक ना अनेक कारणांनी अद्यापही पवित्र पोर्टल सुरू झाले नाही. त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती होण्यासाठी २०२४ उजाडणार की काय, असा प्रश्न पडला आहे. त्यातच २०१७ तील १९६ संस्थांच्या रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया अगोदर पूर्ण करण्याचा निर्णय व त्यावर  सर्वसामान्य जनतेची शिक्षक भरती प्रक्रियेवर नाराजी आहे. जि. प. शाळेत प्रामुख्याने गरिबांची मुले शिकतात. लाखो रुपये पगार असणाऱ्या शासकीय शिक्षकांपेक्षा खासगी शाळेतील मोजक्या मानधनावर काम करणाऱ्या भिजत घोंगडे पडले असेल का?.. शिक्षकांना शिक्षित, कर्मचारी, व्यापारी पसंती दर्शवित असून, खासगी शाळेत त्यांच्या मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे खासगी शाळेत जास्त विद्यार्थी होऊ लागले आहेत, तर जि. प. शाळेत एका शिक्षकामागे ३० विद्यार्थी मिळणेसुद्धा कठीण झाले आहे.

ग्रामीण भागात थोडी फार सुशिक्षितांची मुले आहेत. मात्र, शहरी भागातील जि. प., मनपा शाळेत केवळ आणि केवळ गरीब, मजुरदारांची मुलेच दिसतात. त्यामुळे गरीब, सामान्यांच्या मुलांना ज्ञान देणाऱ्या शाळांतील शिक्षकांकडे कोणी लक्ष पुरवित नाही, नवीन भरतीबाबत प्रक्रिया सुरू झाली. मात्र, त्यातही निश्चितता नाही.. कोणी प्रयत्न करीत नाही. शिक्षक होण्याचे स्वप्नही गरीब, मजुरदारांच्या मुलांनीच बाळगले असून, आज जास्तीत जास्त डी. एड्., बी.एड्. धारक बेरोजगार ही गरिबांचीच मुले आहेत. म्हणूनच मागील १२-१३ वर्षांपासून शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे पडले असेल का?  

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी