शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:06 IST

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गडचिरोली येथील अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना परवा दाखविलेले काळे झेंडे म्हणजे तावडेंना घरचा अहेर होय. गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शहरात प्रवेश करताच विनोद तावडेंना अभाविप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय  महामंत्री असताना विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा आग्रह धरणारे अभाविपचे नेते विनोद तावडे यांना शिक्षण मंत्री होताच आपल्या मागणीचा विसर पडला. मागील तीन वर्षांपासून याबाबत नुसती घोषणा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. म्हणून की काय, अभाविपने खुद्द आपल्या माजी राष्ट्रीय महामंत्र्यालाच फैलावर घेतले. केवळ थापा मारून चालणार नाही तर कृतीसुध्दा करावी लागणार, या भाषेत शिक्षण मंत्र्यांना सुनावण्यात आले. जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा, अशा घोषणा देण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर का आली, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. खरे तर राज्य सरकारमध्ये अभाविपचे दोन माजी राष्ट्रीय महामंत्री आहेत. तावडेंपूर्वी चंद्रकांतदादा पाटलांनी संघटनेची धुरा सांभाळली आहे. एव्हाना ‘सेव्ह कॅम्पस’, ‘छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती’ सारख्या घोषणा देत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोठमोठी आंदोलने करणारे हेच नेते आज सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अभाविपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण हीच नेतेमंडळी जर काँग्रेस पॅटर्नने वागू लागतील तर गडचिरोलीतील अभाविप कार्यकर्त्यांच्या आक्रोशाची धग राज्यातही पसरू शकते. विद्यार्थी दशेतच युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासवर्ग घेणारी अभाविप आपल्या कार्यकर्त्याला दरी उचलण्यापासून उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे प्रशिक्षण देते. त्याच्यातील संघटन क्षमता वाढविते. कार्यकर्ता हाच संटघनेचा आधारस्तंभ असल्याचा बौद्धिक डोजही पाजते. मात्र याच संघटनेतील काही नेते जेव्हा सत्ताधाºयांच्या फळीत जाऊन बसतात, तेव्हा त्यांना या नैतिकतेचा विसर पडत असेल तर असा उद्रेक होणारच. अहो, ज्यांच्या खांद्याला खांदा लावत आम्ही संघटनेसाठी झटलो, रात्रभर फिरून भिंती रंगविल्या, आंदोलने केली, प्रसंगी पोलिसाचा मार खाल्ला तेच नेते मंत्री झाल्याबरोबर ओळखत नाहीत, ही एका कार्यकर्त्याची बोलकी प्रतिक्रिया.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाeducationशैक्षणिक