शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:06 IST

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गडचिरोली येथील अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना परवा दाखविलेले काळे झेंडे म्हणजे तावडेंना घरचा अहेर होय. गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शहरात प्रवेश करताच विनोद तावडेंना अभाविप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय  महामंत्री असताना विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा आग्रह धरणारे अभाविपचे नेते विनोद तावडे यांना शिक्षण मंत्री होताच आपल्या मागणीचा विसर पडला. मागील तीन वर्षांपासून याबाबत नुसती घोषणा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. म्हणून की काय, अभाविपने खुद्द आपल्या माजी राष्ट्रीय महामंत्र्यालाच फैलावर घेतले. केवळ थापा मारून चालणार नाही तर कृतीसुध्दा करावी लागणार, या भाषेत शिक्षण मंत्र्यांना सुनावण्यात आले. जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा, अशा घोषणा देण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर का आली, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. खरे तर राज्य सरकारमध्ये अभाविपचे दोन माजी राष्ट्रीय महामंत्री आहेत. तावडेंपूर्वी चंद्रकांतदादा पाटलांनी संघटनेची धुरा सांभाळली आहे. एव्हाना ‘सेव्ह कॅम्पस’, ‘छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती’ सारख्या घोषणा देत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोठमोठी आंदोलने करणारे हेच नेते आज सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अभाविपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण हीच नेतेमंडळी जर काँग्रेस पॅटर्नने वागू लागतील तर गडचिरोलीतील अभाविप कार्यकर्त्यांच्या आक्रोशाची धग राज्यातही पसरू शकते. विद्यार्थी दशेतच युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासवर्ग घेणारी अभाविप आपल्या कार्यकर्त्याला दरी उचलण्यापासून उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे प्रशिक्षण देते. त्याच्यातील संघटन क्षमता वाढविते. कार्यकर्ता हाच संटघनेचा आधारस्तंभ असल्याचा बौद्धिक डोजही पाजते. मात्र याच संघटनेतील काही नेते जेव्हा सत्ताधाºयांच्या फळीत जाऊन बसतात, तेव्हा त्यांना या नैतिकतेचा विसर पडत असेल तर असा उद्रेक होणारच. अहो, ज्यांच्या खांद्याला खांदा लावत आम्ही संघटनेसाठी झटलो, रात्रभर फिरून भिंती रंगविल्या, आंदोलने केली, प्रसंगी पोलिसाचा मार खाल्ला तेच नेते मंत्री झाल्याबरोबर ओळखत नाहीत, ही एका कार्यकर्त्याची बोलकी प्रतिक्रिया.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाeducationशैक्षणिक