शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:06 IST

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी

मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गडचिरोली येथील अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना परवा दाखविलेले काळे झेंडे म्हणजे तावडेंना घरचा अहेर होय. गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शहरात प्रवेश करताच विनोद तावडेंना अभाविप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय  महामंत्री असताना विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा आग्रह धरणारे अभाविपचे नेते विनोद तावडे यांना शिक्षण मंत्री होताच आपल्या मागणीचा विसर पडला. मागील तीन वर्षांपासून याबाबत नुसती घोषणा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. म्हणून की काय, अभाविपने खुद्द आपल्या माजी राष्ट्रीय महामंत्र्यालाच फैलावर घेतले. केवळ थापा मारून चालणार नाही तर कृतीसुध्दा करावी लागणार, या भाषेत शिक्षण मंत्र्यांना सुनावण्यात आले. जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा, अशा घोषणा देण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर का आली, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. खरे तर राज्य सरकारमध्ये अभाविपचे दोन माजी राष्ट्रीय महामंत्री आहेत. तावडेंपूर्वी चंद्रकांतदादा पाटलांनी संघटनेची धुरा सांभाळली आहे. एव्हाना ‘सेव्ह कॅम्पस’, ‘छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती’ सारख्या घोषणा देत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोठमोठी आंदोलने करणारे हेच नेते आज सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अभाविपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण हीच नेतेमंडळी जर काँग्रेस पॅटर्नने वागू लागतील तर गडचिरोलीतील अभाविप कार्यकर्त्यांच्या आक्रोशाची धग राज्यातही पसरू शकते. विद्यार्थी दशेतच युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासवर्ग घेणारी अभाविप आपल्या कार्यकर्त्याला दरी उचलण्यापासून उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे प्रशिक्षण देते. त्याच्यातील संघटन क्षमता वाढविते. कार्यकर्ता हाच संटघनेचा आधारस्तंभ असल्याचा बौद्धिक डोजही पाजते. मात्र याच संघटनेतील काही नेते जेव्हा सत्ताधाºयांच्या फळीत जाऊन बसतात, तेव्हा त्यांना या नैतिकतेचा विसर पडत असेल तर असा उद्रेक होणारच. अहो, ज्यांच्या खांद्याला खांदा लावत आम्ही संघटनेसाठी झटलो, रात्रभर फिरून भिंती रंगविल्या, आंदोलने केली, प्रसंगी पोलिसाचा मार खाल्ला तेच नेते मंत्री झाल्याबरोबर ओळखत नाहीत, ही एका कार्यकर्त्याची बोलकी प्रतिक्रिया.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाeducationशैक्षणिक