शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिक्षण आणि आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:08 AM

​​​​​​​शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल.

- डॉ.भूषण कुमार उपाध्याय शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल.शिक्षण आणि आरोग्याच्या या अनन्यसाधारण महत्त्वाला समजून भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्ही बाबींवर फार खोलवर जाऊन विचार केलेला आहे. शिक्षण हे ज्ञानाचे माध्यम आहे. ज्ञान ही मानवाची वैचारिक आणि बौध्दिक क्षमता आहे ज्यामुळे मानव चांगल्या किंवा वाईट या बाबी ओळखू शकतो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे- ‘नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. याचाच अर्थ या सृष्टीमध्ये ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. या ज्ञानामुळेच मानव लौकिक किंवा पारलौकिक यश साध्य करू शकतो. शेवटी या ज्ञानप्राप्तीचे साधन जे शिक्षण आहे, ते सर्वांना सुलभ असणे आवश्यक आहे. ते सर्वांना सुलभ असण्याबरोबरच शिक्षण हे व्यवसायाचे रूप घेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शिक्षण देणारे पूर्णपणे त्यागाच्या भावनेने परिपूर्ण असावेत. शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत, त्या सुध्दा व्यक्ती आणि समाज निर्माणाच्या भावनेने प्रेरित असाव्यात. समाजसेवेच्या भावनेने प्रेरित व्यक्तीच या क्षेत्रांमध्ये आली पाहिजे. पैशांच्या कमतरतेमुळे कोणताही विद्यार्थी त्याच्या इच्छेनुसारच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हेच कारण आहे की अनेक विकसित देशांमध्ये शिक्षण-संस्था पूर्णपणे सरकारच्या अमलाखाली आहेत. दुसरीकडे सरकारकडे जमा होणाऱ्या महसुलातील एक मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च केला जातो. शिक्षण-प्रणाली अशी व्हावी की जिच्यामध्ये मानवाचे शरीर, मन आणि चेतनेचा संतुलित विकास व्हावा.याच प्रकारे आरोग्य हे मानवाच्या समाज आणि सुखी जीवनासाठी आवश्यक आहे. हेच कारण आहे की आयुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की- ‘धर्मार्थकाम मोक्षाणाम् आरोग्यम् मूलमूत्तमम’. याचाच अर्थ चार पुरु षार्थ- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी आरोग्य हेच मूळ आहे. शेवटी इतक्या महत्त्वपूर्ण असलेल्या आरोग्याकरिता सर्वसुलभता आवश्यक आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी आरोग्यकेंद्र सर्वांकरिता उपलब्ध असावेत. पैसे असले तरच चांगली आरोग्य सुविधा आणि पैसे नसतील तर कमी दर्जाची आरोग्य सुविधा देणे हा व्यावसायिक वृत्तीचाच परिणाम आहे. सरकारच्या महसुलाचा मोठा हिस्सा आरोग्यावर खर्च झाला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक देखील त्यागवृत्तीच्या भावनेने प्रेरित असावेत.

टॅग्स :educationशैक्षणिकHealthआरोग्यnewsबातम्या