शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बंगालची दंगल; विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल-भाजपमध्ये रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 05:42 IST

हिंसा, दडपशाहीच्या मार्गाने काँग्रेसला जेरीस आणून मार्क्सवादी सत्तेवर आले व त्याच मार्गाने २००७ मध्ये ममता बँनर्जींनी मार्क्सवाद्यांचा पराभव केला. आता त्याच मार्गाने भाजपा तृणमूलला आव्हान देत आहे. सांस्कृतिक व बौद्धिक संपदेचे वरदान लाभलेल्या बंगालची राजकीय संस्कृती हिंसक असावी, हे त्या राज्याचे व देशाचे दुर्दैव.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच्या प्रचाराची सुरुवात बंगाली प्रथेप्रमाणे हिंसाचाराने झाली. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्या संघर्षांत दोन महिन्यांत ११ जणांचा बळी पडला. लहानसहान दंगे वा मारामाऱ्या सर्रास सुरू आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर गेल्याच आठवड्यात जोरदार हल्ला झाला. एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावर थेट हल्ला होण्याची ही पहिलीच घटना असेल. हा हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला नसून भाजपाचा हा ड्रामा आहे, अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. राज्यपाल धनकर यांना ही टीका मान्य नाही. राज्यपाल असूनही त्यांनी स्वतः ममतांवर माध्यमांतून तिखट टीका केली आणि आगीशी खेळू नका, असा इशारा दिला. ही राज्यपालांची नव्हे, तर राजकीय नेत्याची भाषा झाली.

नड्डा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अमित शहा यांचे केंद्रीय गृहमंत्रालय सक्रिय झाले व त्यांनी राज्यातील पोलीस व सनदी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. अशा चौकशीला ममता बॅनर्जी यांचे सरकार विरोध करील, याची खात्री भाजपाला होती आणि तसेच झाले. शहा व ममता बॅनर्जी यांचे स्वभाव एकच आहेत. दोघांना संघर्ष प्रिय असतो. त्यात ममता बॅनर्जी या आततायी वर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. मोदी-शहा व ममता, अशा दोन्ही बाजूंचे नेते संघर्षप्रिय आणि बंगालची भूमीही अशा संघर्षाची परंपरा जोपासणारी असल्याने निवडणूकपूर्व झटापटी वाढल्यास नवल नाही.
बंगालमधील भाजपाच्या आक्रमतेमागचा उद्देश स्पष्ट आहे. भाजपा हा भारतात सर्वत्र विस्तारला पाहिजे याकडे मोदी-शहा यांचे लक्ष असते. ईशान्य भारतात भाजपाने विस्तार केला व काँग्रेसमधील हेमंत बिश्वशर्मा यांना हाताशी धरून आसाममध्ये सत्ताही काबीज केली. अलीकडे हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत ताकद लावली आणि तेलंगणामध्ये प्रमुख विरोधी पक्ष होण्याची क्षमता दाखवून दिली. तामिळनाडूतही एकतर अण्णा द्रमुक किंवा पुढे रजनीकांत यांच्या साहाय्याने त्या राज्यात शिरकाव करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. केरळमधील पालिका निवडणुकीत पक्ष जोमाने उतरला आहे. गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा सफाया केला. राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्या आहेत आणि देशात झालेल्या अनेक पोटनिवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळविले.
आता पक्षाचे लक्ष पश्चिम बंगाल आणि मुंबई याकडे आहे. नड्डा यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात अन्यत्र बदल केले असले तरी बंगालचे प्रभारी म्हणून कैलाश विजयवर्गीय यांना कायम ठेवले. विजयवर्गीय यांचा स्वभाव ज्यांना माहीत आहे त्यांना बंगालसाठी ते का योग्य आहेत, हे पटू शकेल. लोकसभा निवडणुकीत पक्षाने ४२ पैकी १८ जागा मिळविल्या. त्यामुळे पक्षात आवेश असला तरी विधानसभा सोपी नाही. ममता बॅनर्जी यांची पक्षयंत्रणा बळकट आहे आणि दंडेलशाहीला त्यांची ना नाही. आपल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा वरदहस्त राहील, याची दक्षता त्यांचे सरकार घेते. संसदेत चमकदार भाषणे करून देशावरील सांस्कृतिक संकटावर बोलणारे डेरेक ओबेरायनसारखे तृणमूलचे नेते आपल्या राज्यातील हिंसाचाराबाबत मुखपट्टी लावून बसतात. तृणमूलच्या ठोकशाहीचे समर्थन या ना त्या प्रकारे सुरू असते. सरकारचे हे धोरण लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांवरील खटले चालविण्यासाठी भाजपाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वकिलांची फौज उभी केली आहे.
सत्तेपासून भाजपा अजून बराच लांब असली तरी बंगालमध्ये ममतांना जाब विचारणारी प्रमुख राजकीय शक्ती म्हणून भाजपाचा बोलबाला सुरू झाला व पक्षासाठी ही पायरीही महत्त्वाची आहे. कित्येक वर्षे सत्ताधारी राहिलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना भाजपाने मागे टाकले. या दोन पक्षांची युती होणार असली तरी त्याला जनमानसात स्थान नाही. ममतांवर राग असणारे मार्क्सवादी आडून भाजपाला मदत करीत असल्याचीही चर्चा चालते. जे मार्क्सवादी, देशाला बोधामृत पाजण्यात आणि राजकारणातील नैतिकतेची दिल्लीत चर्चा करण्यात आघाडीवर असतात त्यांना दोन दशकांच्या स्वतःच्या राजवटीत बंगालमधील हिंसक राजकीय संस्कृती बदलता आली नाही. हिंसा, दडपशाहीच्या मार्गाने काँग्रेसला जेरीस आणून मार्क्सवादी सत्तेवर आले व त्याच मार्गाने २००७ मध्ये ममता बँनर्जींनी मार्क्सवाद्यांचा पराभव केला. आता त्याच मार्गाने भाजपा तृणमूलला आव्हान देत आहे. सांस्कृतिक व बौद्धिक संपदेचे वरदान लाभलेल्या बंगालची राजकीय संस्कृती हिंसक असावी, हे त्या राज्याचे व देशाचे दुर्दैव.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीj. p. naddaजे. पी. नड्डा