शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: यूपीएससीचा काटेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 07:40 IST

गुणवत्ता हा अशा नियुक्त्यांचा निकष असल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे दरवर्षी यूपीएससीमधून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या कमी होत आहे.

दिवंगत आर. आर. आबा राज्याचे गृहमंत्री असताना नाशिकच्या पोलीस अकादमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या एका तुकडीचे नेहमी उदाहरण द्यायचे. त्यांच्याच उपस्थितीत झालेल्या दीक्षान्त सोहळ्यात त्या तुकडीतील फौजदारांनी पोलीस खात्यात पदार्पण केले होते. त्यानंतर जागोजागी लाचखोरीत सापडलेल्या अधिकाऱ्यांमुळे ती तुकडी बदनाम झाली होती. हे आता आठवायचे कारण, काल जाहीर झालेला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल. विचित्र योगायोग पाहा, गेला महिनाभर झारखंडमधील पूजा सिंघल नावाच्या महिला आयएएस अधिकारी त्यांच्या प्रचंड भ्रष्टाचारासाठी चर्चेत आहेत आणि त्याचवेळी प्रथमच असे घडले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात पहिल्या चार जागी मुली आहेत. पहिल्या दहामधील सहा जागाही मुलींनीच पटकावल्या आहेत.

महाराष्ट्रातूनदेखील प्रियंवदा म्हाडदळकर प्रथम आली. संधी मिळाली तर मुलांपेक्षा मुली अधिक कर्तबगारी सिद्ध करतात, हे पुन्हा अधोरेखित झाले. साहजिकच स्वच्छ व पारदर्शी कारभाराची पहिली जबाबदारी प्रशासकीय सेवेत पदार्पण करणाऱ्या मुलींच्या खांद्यावर येते. महाराष्ट्राचा विचार करता यंदाच्या निकालात पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांपेक्षा खेड्यापाड्यातील प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविणाऱ्या मुलामुलींची संख्या मोठी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील, खेड्यापाड्यातील लाखो विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, प्रचंड अभ्यास करून यूपीएससीचा अत्यंत प्रतिष्ठेचा उंबरठा ओलांडण्याच्या प्रयत्न केला. त्यापैकी केवळ ६८५ जणांना यश मिळाले. त्यांचे कौतुक करताना हे विसरता येत नाही, की महसूल, परराष्ट्र सेवा, पोलीस किंवा करप्रणालीतल्या विविध पदांच्या या प्रतिष्ठेमागे धावणाऱ्यांची आणि त्यात अपयश येणाऱ्यांची संख्या धडकी भरावी इतकी मोठी आहे.

गेल्या वर्षी यूपीएससीसाठी तब्बल १० लाख ९३ हजार जणांनी अर्ज भरले. ही लेखी परीक्षा अत्यंत कठीण असते, मुलाखतींमध्ये क्षमतांचा कस लागतो. म्हणूनच जवळपास निम्म्यांनी परीक्षा दिली नाही. केवळ ५ लाख ८ हजार परीक्षेला बसले आणि राखून ठेवलेले निकाल वगैरे जमेस धरले तरी जेमतेम सात-आठशे यशस्वी झाले. यात तीन, चार, पाचवेळा परीक्षा देणारे, आधीच्या निकालात खालची रँक आल्यामुळे कमी महत्त्वाच्या पदांवर निवड झालेले, पुन्हा प्रयत्न करून आयएएस किंवा आयपीएससाठी प्रयत्न केलेले हजारो तरुण-तरुणी आहेत. लोकसेवा आयोगाची ही परीक्षा बुद्धिवंतांची निवड करणारी सर्वोच्च चाचणी समजली जाते. अलीकडे कला, वाणिज्य, विज्ञान अशा परंपरागत विद्याशाखांमधून पदवी घेतलेल्यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंतांमधील प्रमाण कमी झाले आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यक अशा व्यावसायिक विद्याशाखांमधील यशस्वीतांचे प्रमाण वाढत आहे.

यंदाच्या यशस्वीतांमध्ये तंत्रज्ञानाची पदवी घेतलेल्यांचे प्रमाण ठळकपणे नजरेत भरणारे आहे. हे विद्यार्थी जेईई, नीटसारख्या देशपातळीवरच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होतात. त्या संस्थांमधून पदवी घेतात आणि त्यानंतर यूपीएससीची तयारी करतात. अशी तावून-सुलाखून निघालेली गुणवत्ता प्रशासनात येत असेल तर तिचे स्वागतच होईल. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे शिवधनुष्य पेललेल्या या बुद्धिवंत प्रशासकांपुढे मोठी आव्हाने आहेत. नोकरशाही लालफितीचा अतिरेकी आग्रह धरते, चौकटीबाहेरच्या मुद्द्यावर लवचिकता दाखवत नाही असे मानून केंद्र सरकार लॅटरल एन्ट्रीच्या रूपाने कार्पोरेटमधील अधिकाऱ्यांना थेट सहसचिव पदांवर आणत आहे. गेल्या वर्षी आयोगानेच अशा एकतीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची शिफारस केली.

गुणवत्ता हा अशा नियुक्त्यांचा निकष असल्याचे सरकारने सांगितले. त्यामुळे दरवर्षी यूपीएससीमधून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या कमी होत आहे. आता भारतीय सेवेत दाखल होणाऱ्या भविष्यातील या प्रशासकांना हे सिद्ध करावे लागेल की, ते कंपन्यांमधील अधिकाऱ्यांपेक्षा कुशल आहेत. लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभापैकी दुसरा स्तंभ असलेल्या कार्यकारी मंडळाची पत व प्रतिष्ठा तेच कायम ठेवू शकतात. हे करायचे असेल तर ज्या आयोगातून त्यांची निवड झाली त्याच्या नावातील लोकसेवा हा शब्द त्यांना कारकीर्द पूर्ण होईपर्यंत ठायीठायी लक्षात ठेवावा लागेल. आरोग्य, शिक्षण, पाणी-विजेसारख्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असणारा ग्रामीण व आदिवासी समाज, नागरी समस्यांनी त्रस्त व पायाभूत सुविधांसाठी झटणारा शहरी वर्ग, तसेच जगाशी स्पर्धा करू पाहणारी नवी पिढी यांच्या आशाआकांक्षा, स्वप्ने विचारात घेऊन कारभार करावा लागेल.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र