शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणी वाऱ्यावर; गुटखाबंदीचा कायदा फक्त कागदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 05:19 IST

सध्या महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही तो सर्रास उपलब्ध होतो. छापे मारून गुटखा जप्त केल्याच्या बातम्याही रोजच वाचत असतो, तरीही हा गुटखा कोठून येतो याचा शोध लागत नाही. त्याचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही.

एखाद्या गोष्टीवर कायद्याने बंदी घातली की, लगेचच त्याचा समाजावर परिणाम होतो असे कायदा बनविणाऱ्याचे मत असावे, म्हणजे कायदा केला की सारे सुरळीत झाले. ते इतके सोपे नाही. अनेक कायदे, नियम का बनवले, असा प्रश्नही पडतो, कारण त्याचा भंग सर्रास होताना दिसतो; पण अंमलबजावणी होत नाही. सरकार तंबाखूच्या सेवनाचा कायदा अधिक परिणामकारक करण्याच्या विचारात आहे. तरुणांना तंबाखूच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न चांगला आहे; पण त्याच्या अंमलबजावणीचे काय? तंबाखू सेवनासाठी सध्या १७.९ वर्षे वय आवश्यक आहे. त्यात आणखी एक वर्षाची वाढ सरकार करू इच्छिते. धूम्रपान, तंबाखू सेवनाचे तरुणांमध्ये आकर्षण असते. हे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची जाहिरातबाजीच इतकी आकर्षक असते की, तरुण अशा वस्तूकडे खेचला जातो. धूम्रपान हे पौरुषत्वाचे लक्षण असल्याचे जाहिरातीतून बिंबवण्याचा प्रयत्न होतो, तर धूम्रपानासाठी कायदा अस्तित्वात असला तरी जाहिरातीसाठी कायदा नाही.. आणि असला तरी त्यावर आक्षेप घेतल्याचे उदाहरण नाही.

तंबाखूच्या सेवनामुळे एकट्या भारतात १५ टक्के मृत्यू होतात ही जागतिक आकडेवारी भयावह आहे. याचा अर्थ या तंबाखू सेवनाचा विळखा फार मोठा दिसतो. यामुळे रोज साडेतीन हजार मृत्यू होतात, तर जगभरात ८० लाख लोक मृत्यू पावतात. भारतात वर्षभरात साडेतेरा लाख मृत्यू तंबाखू सेवनाचे आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारला काळजी वाटणे साहजिक आहे. दुसरीकडे तंबाखू सेवनाचे प्रमाण जगात दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते, त्यावेळी त्याला आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक ठरते.
तंबाखूच्या सेवनाने तुमच्या शरीरात सात हजार रसायने प्रवेश करतात. त्या वेळी अशा व्यसनांना आळा घालणे हा सरकारचा प्राधान्य क्रम ठरतो. सरकारने कायदा करताना त्याची अंमलबजावणी कशी परिणामकारक होईल, याचाही तितक्याच गांभीर्याने विचार करावा. या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर गुटखा खाणारे किंवा बाळगणारे यांना लक्ष्य करणे आवश्यक आहे. खाणाऱ्यांवर कारवाई केली तर ती परिणामकारक ठरू शकते. आपण गुटखाविक्रेत्यावर कारवाई करतो. तो जप्त केल्यानंतर त्याचा पुन्हा पुरवठा केला जातो. म्हणजे त्याची उपलब्धता कायम आहे; पण गुटखा खाणाऱ्यावर कारवाई नाही. आज अफू, गांजा बाळगणाऱ्यावर कारवाई होते तशी कारवाई गुटखा, तंबाखूबाबत केली तर त्या कायद्याला काही अर्थ राहील. अन्यथा तो कायदावरच दिसेल.
गुटख्याच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी अन्न आणि औषधी विभागाला अधिकार देण्यात आलेले असले तरी त्यांच्याजवळची यंत्रणा अतिशय तोकडी आहे. त्या तुलनेत तंबाखू तर सर्रास उपलब्ध असतो. अगदी दहा वर्षांच्या मुलालासुद्धा घरातील लोक दुकानातून तंबाखू आणण्यास सांगतात. येथे वयाचा विचार करता मुलांना दुकानातून तंबाखू मिळायला नको; पण तशी कोणतीच आडकाठी नाही. विद्यार्थ्यांना तंबाखू आणायला सांगणारे शिक्षकही आहेत. म्हणजे केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणारा नाही, तर त्याला सामाजिक अभियानाची जोड द्यावी लागेल.
संस्कारक्षम वयातच मुलांवर तसे संस्कार झाले आणि भोवतालचे वातावरण त्याला पोषक असले तर अशा व्यसनांकडे तरुण वळणारच नाहीत; परंतु ग्राहककेंद्री बाजारपेठेच्या जमान्यात संस्काराच्या गोष्टी अडगळीत पडण्यास वेळ लागत नाही. जे काही शेवटी विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देतो त्यावर देश एक पिढी घडवत असतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी फक्त कायदा असला तरी त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा अतिशय ढिसाळ आहे. शिवाय प्रत्येक कायद्यामध्ये अनेक पळवाटा असतात. त्यातून कायद्यांना मुरड घालण्याचे मार्ग शोधले जातात. कायद्याची कडक अंमलबजावणी हाच जालीम उपाय असे सूत्र ठरवले तर बदल होऊ शकतो, नुसता कायदा कागदावरच राहतो.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी