शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संपादकीय - बाेगद्यातला थरार, देशवासीयांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:41 IST

सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

उत्तराखंडमधील सिलक्यारा ते बडकोटदरम्यानच्या बोगद्यातून अखेर मंगळवारी पहाटे आनंदाची बातमी आली. चार धाम महामार्गावर खोदल्या जात असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे भुसभुशीत छत कोसळल्यामुळे ४१ मजूर गेले दहा दिवस अडकले आहेत. मजूर व बचावपथकांमध्ये जेमतेम पन्नास-साठ मीटरचा मलबा आहे. तो हटविण्याचे प्रयत्न फसल्यानंतर त्यातून एक सहा इंच व्यासाची पाइप आत टाकली गेली. सोमवारी रात्री त्या पाइपमधून गरम खिचडी बाटल्यांमध्ये भरून पाठविण्यात आली. गेल्या दहा दिवसांत या मजुरांना मिळालेले हे पहिले ताजे व गरमागरम जेवण होते. त्याच पाइपमधून एक इंडोस्कोपिक कॅमेरा व वॉकीटॉकी पाठवून अडकलेल्या मजुरांशी संवाद साधला गेला. त्याचे व्हिडीओ जारी करण्यात आले. सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

जून-जुलै २०१८ मध्ये गुहेत अडकलेले बारा कुमारवयीन फुटबाॅलपटू व त्यांच्या प्रशिक्षकाची सुटका करणारे थायलंडचे तज्ज्ञ, तसेच नॉर्वे व अन्य देशांतील विशेषज्ञ, अमेरिकन बनावटीची अद्ययावत यंत्रे, त्याचप्रमाणे डीआरडीओ, ओएनजीसी, नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे विकास महामंडळ तसेच सतलज व टिहरी जलविद्युत महामंडळांचे तंत्रज्ञ या मजुरांना बाहेर काढण्याचे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पर्वताला उभे-आडवे ड्रिल मारून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा बोगदा एकूण ४,५३१ मीटर लांबीचा आहे. त्यापैकी सिलक्याराच्या बाजूने २३४० मीटर तर बडकोटच्या बाजूने १६४० मीटर तो खोदला गेला आहे. पाचशे-सहाशे मीटरचे काम उरले असतानाच अपघात झाला. सुरुवातीला तो किरकोळ वाटला. मधला मलबा हटवला की मजूर बाहेर येतील असे वाटले; परंतु, हिमालयाची रचना सह्याद्रीसारखी पाषाणाची नाही. किरकोळ हादऱ्याने तिथे जमीन खचते, भूस्खलन होते. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत गेले. आतमध्ये अडकलेल्या मजुरांचा तसेच बाहेर त्यांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची मानसिक, शारीरिक अवस्था आणि बचावकार्य हा थरार एखादा चित्रपट किंवा वेब सिरीजचा मसाला आहे.

थायलंडमध्ये गुहेत अडकलेली मुले व त्यांच्या प्रशिक्षकांच्या सुटकेवर गेल्या वर्षी वेब सिरीज आलीच आहे. ती गाजलीही. हा तसाच भयपट आहे. या मजुरांनी गेले दहा दिवस मृत्यूच्या कराल दाढेत घालवले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. या अडीचशे-तीनशे तासांत त्यांनी काय विचार केला असेल, एकमेकांशी काय बोलले असतील, त्यांची दिनचर्या किती अस्वस्थ असेल. अवतीभोवती घुटमळणारा मृत्यू, जिवलगांच्या आठवणी, मलब्याच्या पलीकडच्या हालचाली, बचावासाठी होणारे प्रयत्न, त्याच्या यशापयशाची ऊनसावली, त्यामुळे होणारी घालमेल या साऱ्या अवस्था शब्दांत व्यक्त होतीलच असे नाही. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड अशा आठ वेगवेगळ्या राज्यांमधून पोटाची खळगी भरण्यासाठी जोखमीचे काम करणारे हे मजूर १२ नोव्हेंबर रोजी पहाटे बोगद्यात अडकले. ते रात्रंदिवस काम करीत होते; कारण, सरकारचा महत्त्वाकांक्षी चार धाम प्रकल्प निवडणुकीच्या आधी पूर्ण करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर क्रेन व गर्डर कोसळून झालेल्या अपघातात वीस बळी गेले. तिथेही मजूर रात्रंदिवस काम करीत होते. या अपघाताची आठवण यासाठी की, दोन्ही अपघातांशी ‘नवयुग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार कंपनीचा संबंध आहे. तेव्हा, भयकथेच्या पलीकडे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

चार धाम यात्रेतील उत्तर काशी ते यमुनोत्री प्रवासातील अवघी ४०-५० मिनिटे वाचविण्यासाठी भूसंवेदनशील हिमालयीन टापूत अशा लांब बोगद्याची गरज आहे का? साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा खोदताना आराखड्यानुसार आपत्कालीन सुटकेचा मार्ग आधी का तयार केला नाही? समृद्धी महामार्ग व चार धाम प्रकल्पातील कंत्राट एकाच कंपनीकडे हा निव्वळ योगायोग समजला तरी महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता या कंपनीकडे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे का? बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० नव्हे तर ४१ आहे, हे समजायला पाच दिवस लागले. आपण कष्टकऱ्यांच्या जगण्या-मरण्याबद्दल इतके कसे बेफिकीर असू शकतो? तसेही अनेकदा जाणवते, की या देशात गरिबांच्या जिवांना किड्यामुंग्यांइतकीही किंमत नाही. त्याच वास्तवाचे हे आणखी एक उदाहरण नव्हे काय?

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगार