शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 04:39 IST

श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही.

श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे यांचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले असले तरी भारताने त्यांच्याबाबत काहीसे सावधच राहायला हवे. ती निवडणूक अपेक्षेपेक्षा खूपच शांततेत पार पडली. पण गोटाबाया राजपक्षे व त्यांचे थोरले बंधू महिंद्र राजपक्षे यांचा चीन आणि पाकिस्तान यांच्याकडे असलेला कल सर्वज्ञात आहे. या निवडणुकीत सजिथ प्रेमदासा यांची निवड व्हावी, असे भारतीय राजनैतिक वर्तुळातील मंडळींना व लंकेतील तामिळींना वाटत होते. पण तसे घडले नाही.

गोटाबाया राजपक्षे हे आपल्या बंधूंच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्याआधी ते लष्करातही होते. श्रीलंकेत तामिळ वाघांविरुद्धच्या मोहिमेतही त्यांचा मोठा वाटा होता. तामिळ वाघांची चळवळ संपल्याचे आणि व्ही. प्रभाकरन यांचा अंत झाल्याचे दु:ख करण्याचे कारण नाही. पण तामिळ वाघांच्या विरोधातील मोहिमेच्या वेळी पाकिस्तानची मदतही घेण्यात आली होती. ती मिळवण्यात गोटाबाया राजपक्षे सक्रिय होते. त्यांच्या मनात लंकेतील तामिळ जनतेविषयी अढी असून, ते कायम बहुसंख्य सिंहला समाजाचेच राजकारण करीत आले आहेत. त्यांच्या आताच्या विजयाचे कारणही तेच आहे.
श्रीलंकेने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशच्या स्थापनेनंतर पाकिस्तानच्या विमानांना स्वत:च्या देशात इंधनाची सुविधा दिली होती. महिंद्र राजपक्षे यांनीही सत्तेत असताना आपल्या देशातील हम्बनटोटा हे महत्त्वाचे बंदर जणू चीनच्या हवालीच केले. हिंद महासागरात चीन आपला वावर व साम्राज्य वाढवू पाहत असताना श्रीलंकेमध्ये झालेला राजकीय बदल भारतासाठी त्रासदायकच ठरू शकतो. चीन व पाकिस्तान या आपणास त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांशी श्रीलंकेची जवळीक चिंतेचीच बाब आहे. गोटाबाया राजपक्षे अध्यक्ष म्हणून निवडून येताच थोरले बंधू महिंद्र राजपक्षे यांनी सध्याचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांना स्वत:लाच त्या जागी बसायचे आहे. देशाचा कारभार आपल्याच घराण्यामार्फत चालवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत.
निवडणुकीत पराभूत झालेले सजिथ प्रेमदासा हे भारताचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील रणसिंघे प्रेमदासा यांनीही राष्ट्राध्यक्ष असताना भारताशी उत्तम संबंध ठेवले. आताचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनाही चीनपेक्षा भारत अधिक जवळचा वाटतो. श्रीलंकेतील राजकारणात चीन व पाकिस्तानचे समर्थक व भारताचे समर्थक असे दोन गट सक्रिय आहेत. चीन व पाकिस्तानचा समर्थक असलेला पक्षच गोटाबाया राजपक्षे यांच्या विजयामुळे सत्तेत आला आहे. त्यामुळे या देशाचे भारताशी पुढील काळात संबंध कसे असणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. आपल्याला चीन व पाकिस्तान त्रासदायक ठरत असताना, त्यात श्रीलंकेची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेपाळमध्येही भारत समर्थक व चीन समर्थक पक्ष आलटून-पालटून सत्तेमध्ये असतात. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के. पी. शर्मा-ओली हे तेथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते असून, त्या पक्षाचे चीनशीच अधिक चांगले संबंध आहेत. परिणामी त्या देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प चीनला मिळताना दिसत आहेत. चीनने नेपाळचा सीमेवरील बराच भूभाग बळकावल्याने तेथे स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. पण त्याविषयी एक चकार शब्द न बोलणाऱ्या पंतप्रधान ओली यांनी भारताने आमचा कालापानीचा भूभाग बळकावला आहे, अशी तक्रार करीत, तो परत करावा, अशी मागणी केली. थोडक्यात नेपाळही आता आपल्याविरुद्ध कागाळ्या करू लागला असून, त्याला अर्थातच पाकिस्तान व चीनची फूस आहे. भूतानच्या सीमेवरील भूभागावर कब्जा करण्याचे चीनचे प्रयत्न आपण हाणून पाडल्याने तो आपल्या बाजूने उभा राहतो. पण त्याची स्वत:ची ताकद नाही. आणखी एक शेजारी म्यानमारमधील अंतर्गत समस्यांचा त्रासही चीनपेक्षा आपल्याला अधिक होतो. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे म्हणणे ठीक आहे. पण सारेच शेजारी त्रासदायक ठरणारे असतील, तर आपल्याला सततच सतर्क राहावे लागेल.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनNepalनेपाळPakistanपाकिस्तानMyanmarम्यानमारBhutanभूतान