शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सरकारला न्यायव्यवस्थेचे संघीकरण करायचे आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 3:25 AM

सत्ताधारी पक्ष त्याच्या मर्जीनुसार नियुक्त्या करतो याचे अनेक पुरावे लोकांसमोर आले आहेत. या स्थितीत विधि मंत्रालय किंवा कायदामंत्री न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत सहभागी होणार असेल तर आजवरच्या संशयाला ते पुष्टीच देत आहेत.

सर्वोच्च व उच्च या देशातील वरिष्ठ न्यायालयांवरील न्यायमूर्तींच्या नेमणुका कॉलेजियम या अपक्ष व तटस्थ समजल्या जाणाऱ्या कायदेपंडितांच्या व जाणकारांच्या समितीच्या सल्ल्यानुसार आता होतात. या समितीच्या शिफारशी विधि मंत्रालयामार्फत राष्ट्रपतींकडे पाठविल्या जातात. पुढे राष्ट्रपती सरन्यायाधीश किंवा न्यायाधीशाच्या नियुक्तीबाबत सल्ला घेऊन या नेमणुका कायम करतात. (निदान घटनेत तशी तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझे विधि मंत्रालय कॉलेजियमच्या शिफारशी राष्ट्रपतींकडे पाठविणारे नुसते पोस्ट ऑफिस राहणार नाही. आमचाही या नियुक्त्यांमध्ये सहभाग (स्टेक) असेल,’ असे विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आता जाहीर केले आहे. मुळात या कॉलेजियमवरील सभासदांच्या निवडीबद्दलच लोकांच्या मनात संशय आहे. सत्ताधारी पक्ष त्याच्या मर्जीनुसार या नियुक्त्या करतो, याचे अनेक पुरावे यापूर्वी लोकांसमोर आले आहेत. या स्थितीत विधि मंत्रालय किंवा कायदामंत्री न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत सहभागी होणार असेल, तर लोकांच्या मनातील आजवरच्या संशयाला ते पुष्टीच देत आहेत.

न्यायव्यवस्था निष्पक्ष असणे हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. त्याचसाठी न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांपासून त्यांच्या लोकसहभागापर्यंत सर्वत्र त्यांच्यावर निर्बंध आहेत. रविशंकर प्रसाद हे आता त्यांच्या नियुक्त्यांत सहभागी होणार असतील तर त्याचा अर्थ सरळ आहे. त्यांना व त्यांच्या सरकारला न्यायव्यवस्थेचे संघीकरण करायचे आहे. शिक्षण व्यवस्थेतून कुलगुरूंच्या सगळ्या जागाच जशा स्वयंसेवकांनी भरल्या तशी न्यायमूर्तींची पदेही त्यांना त्याच विचाराच्या लोकांनी भरायची आहेत. अजूनही प्रगत देशांत न्यायमूर्तींच्या नियुक्त्या निष्पक्षपातीपणे करण्याची पद्धत रूढ आहे. अमेरिकेत न्यायमूर्तीपदाच्या उमेदवाराचे नाव अध्यक्षांकडून सुचविले जाते व पुढे ते सिनेटसमोर (विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह) मान्यतेसाठी जाते. सिनेटने दोन तृतीयांश बहुमताने त्याला मान्यता दिल्यानंतरच ही नियुक्ती कायम होते. मात्र अशी मान्यता देण्याआधी सिनेटची न्यायविषयक समिती त्या उमेदवाराची अनेकवार तपासणी व उलटतपासणी करते. ती तपासणी दूरचित्रवाणीवरून देशाला दाखविलीही जाते. या समितीत दोन पक्षांचे सभासद असतात वा अनेकदा अध्यक्षविरोधी पक्षाच्या सभासदांचे बहुमतही असते.

आपल्या तपासणीत ती समिती संबंधित उमेदवाराला त्याचे पूर्वचरित्रच नव्हे, तर चारित्र्याविषयीही प्रश्न विचारते. त्याची विचारसरणी, वकील असताना ज्यांची बाजू त्याने लढविली ते अशील, न्यायाधीश राहिले असतील तर त्याने पूर्वी दिलेले निकाल या साऱ्यांची तपासणी ही समिती घटनेच्या मूल्यांशी ताडून पाहते व नंतरच त्याच्या नियुक्तीला मान्यता देते.कोणत्याही पद्धतीने हितसंबंधांना वाव मिळू नये, यासाठी ही व्यवस्था कार्यान्वित आहे. अमेरिकेत न्यायाधीशांना निवृत्ती वयाची मर्यादा नाही. शिवाय पूर्ण पगारानिशी निवृत्तही होता येते. ही स्थिती तेथील न्यायालयांना राजकारणाच्या प्रभावापासून मुक्त ठेवते. माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारात एका न्यायमूर्तीच्या मुलाची नियुक्ती केली तेव्हा त्याच्या ९१ वर्षीय वयाच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टावरील न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. तो देत असताना ‘हा राजीनामा न्यायालयावर सरकारचा प्रभाव अप्रत्यक्षरीत्यासुद्धा येऊ नये हे स्पष्ट करण्यासाठी मी देत आहे,’ असे ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत आम्ही सहभागी होऊ ही रविशंकर प्रसाद यांची भूमिका केवळ राजकीयच नाही, तर न्यायाची नासाडी करणारी ठरते. नरेंद्र मोदींच्या सरकारने आजवर नियोजन आयोग बुडविला, निर्वाचन आयोगाची विश्वसनीयता घालविली व विद्यापीठ अनुदान आयोगाचे संघ कार्यालय केले हा ताजा अनुभव लक्षात घेतला तरी रविशंकर प्रसादांना आपल्या न्यायालयांचे काय करायचे याची कल्पना येते. लोकशाही वाचविण्यासाठी या प्रयत्नाला विरोध करणे हे केवळ राजकीय पक्षाचेच नव्हे तर राष्ट्राचेही कार्य आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ