शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

संपादकीय: बिहारचे रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 2:54 AM

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेने सामाजिक विलगीकरण पाळावे यासाठी देशव्यापी प्रसार, प्रचार सुरू असताना बिहार विधानसभेची निवडणूक घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित करता येतो.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक बिहार विधानसभेची येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. ही निवडणूक एका विचित्र परिस्थितीत होणार आहे; शिवाय बिहार राज्यातील आघाड्यांच्या राजकारणातील प्रचंड उलथापालथ झाल्याच्या पार्श्वभूमीवरदेखील होणार आहे आणि गेली तीन दशके या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी असलेले, प्रभावी राजकीय नेते लालूप्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत होणार आहे. वास्तविक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेने सामाजिक विलगीकरण पाळावे यासाठी देशव्यापी प्रसार, प्रचार सुरू असताना विधानसभेची निवडणूक घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित करता येतो.

बिहारच्या विद्यमान विधान सभागृहाची मुदत येत्या २९ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. वास्तविक एखाद्या राज्यात सभागृहाची मुदत संपली असेल किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नसेल तर सहा महिन्यांसाठी राष्टÑपती राजवट किमान सलग दोनवेळा लागू करता येते किंवा याच सभागृहास एक वर्षाची मुदतवाढही देता येते. महाराष्ट्र विधानसभेच्या १९७२ मध्ये स्थापन झालेल्या तिसऱ्या सभागृहास एक वर्षाची मुदतवाढ देऊन सहाव्या वर्षी (१९७८) निवडणुका घेतल्या होत्या. या दोन्हींपैकी एक प्रकार स्वीकारून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका स्वीकारायला नको होता. २४३ सदस्य निवडण्यासाठी २८ आॅक्टोबरपासून तीन टप्प्यांत या निवडणुका होणार आहेत. कोरोनाशिवाय महापुराने बिहारच्या ग्रामीण भागाचे अतोनात नुकसान झाले आहे. परराज्यांत बेरोजगार झालेला श्रमिक वर्ग गावात येऊन बसला आहे. त्याला नवा रोजगार मिळत नाही. अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बिहारमध्ये निवडणुका घेण्याची गरज होती का? लोकशाहीमध्ये मतदारांनी स्वत:चे सरकार निवडण्याचा हक्क बजावला पाहिजे; पण कोरोनाचा धोका वाढणार नाही का? निवडणूक आयोगाने प्रचार करताना राजकीय पक्षांनी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे, उमेदवारांनी घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, अर्ज दाखल करण्यासाठी दोघांनाच सोबत ठेवावे, असे बंधन उमेदवारांवर घालणार, असे जाहीर केले आहे.

आश्चर्य याचे वाटते की, प्रत्येक मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, हातमोजे, मास्क, फेसकव्हर, आदींचा पुरवठा करणार, असेही आयोगाने तारखा जाहीर करताना सांगून टाकले आहे, शिवाय कोरोनाबाधित रुग्णांनी मतदानास शेवटच्या एका तासातच मतदान केंद्रांवर यावे, असेही आवाहन केले आहे. प्रत्येकास इव्हीएमच्या मशीनचे बटण दाबताना स्वतंत्र हातमोजे देणार, असेही म्हटले आहे. बिहार विधानसभेसाठी ७ कोटी २१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१५च्या निवडणुकीत ६ कोटी ६८ लाखांपैकी ५६.९१ टक्के म्हणजे ३ कोटी १६ लाख ७३ हजार ५९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. इतक्या प्रचंड संख्येच्या मतदारांना कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकांचा खर्च राज्याच्या तिजोरीतूनच करायचा असतो. बिहारसारखा आर्थिकदृष्ट्या मागास राज्याला हा भुर्दंड कशासाठी हवा होता? देशात रेल्वे सुरू नाही, कारण गर्दी नको. हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे नकोत; कारण गर्दी होणार आहे. नरेंद्र मोदी, नितीशकुमार, तेज यादव, राहुल गांधी आदींच्या सभांना उपस्थित राहणारा हजारोंचा जमाव सामाजिक अंतर ठेवून कसा जमणार आहे, हे कोडेच आहे.

जाहीर सभांना किती लोकांना उपस्थित राहू द्यायचे हे त्या-त्या जिल्ह्यांचे दंडाधिकारी निश्चित करणार, असा अजब उपाय निवडणूक आयोगाने शोधला आहे, अशा या निवडणुका मुख्यत: संयुक्त जनता दल-भाजप आघाडीविरुद्ध राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस आघाडीतच होणार आहे. मागील निवडणुकीत संयुक्त जनता दलाची आघाडी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाबरोबर होती. भाजपचा सपशेल पराभव केला होता; पण वीसच महिन्यांत महागठबंधन ही आघाडी फुटली आणि नितीशकुमार भाजपच्या मदतीने सत्तेवर कायम राहिले. आता आघाड्यांचा आकार कसा वळण घेतो आणि राजकारण कसे वेग घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020