शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
5
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
6
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
7
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
8
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
9
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
10
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
11
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
12
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
13
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
14
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
15
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
16
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
17
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
18
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
19
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
20
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं

अग्रलेख : सकारात्मक, स्वागतार्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 10:36 IST

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिक्षण क्षेत्रासाठी तीन सुखद, सकारात्मक, स्वागतार्ह घोषणा केल्या.

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिक्षण क्षेत्रासाठी तीन सुखद, सकारात्मक, स्वागतार्ह घोषणा केल्या. शिक्षणसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी लवकरच भरती करणे आणि वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुरूच ठेवणे, या त्या तीन महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारच्या धोरणांमुळे, तसेच काही बाबतीतील संदिग्धतेमुळे, गत काही काळापासून राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आहे.

अस्वस्थ घटकांमध्ये जसे सेवारत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत, तसेच शैक्षणिक क्षेत्रात कारकीर्द घडविण्याची उमेद बांधून असलेला युवावर्गही आहे. सरकार शिक्षण क्षेत्रासंदर्भात नकारात्मक आहे. खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक तशी धोरणे आखत आहे, असा एकंदर सूर आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही उमटले. काही शिक्षक संघटनांनी सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ विधिमंडळासमोर जोरदार निदर्शने केली. सरकार प्रचलित शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून बाजारू शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे, असा शिक्षक संघटनांचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर, सरकारने केलेल्या घोषणा दिलासादायक म्हणायला हव्यात. अर्थात आंदोलकांचे कधीही पूर्ण समाधान होत नसते आणि सत्तेत कुणीही असले तरी त्यांना सर्वच असंतुष्ट घटकांचे संपूर्णतः समाधान करणे कालत्रयी शक्य नसते.

त्यामुळे सरकारने केलेल्या घोषणांमुळे असंतुष्ट वर्ग लगेच खुश होईल, अशी अजिबात अपेक्षा नाही. तरीदेखील सरकारने घेतलेल्या तीनही निर्णयांचे स्वागतच करायला हवे. सरकारने तीनही प्रवर्गातील शिक्षणसेवकांच्या मानधनात सरसकट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणसेवकांच्या प्रचलित मानधनाशी तुलना करता, प्रस्तावित वाढ किमान १०० ते कमाल १६६.६७ टक्के असल्याने त्याला घसघशीत वाढ संबोधता येणार असले तरी मूळ मानधनच अत्यंत तुटपुंजे असल्यामुळे वाढीनंतरही कुटुंबाचा गाडा ओढताना शिक्षणसेवकांची कुतरओढ होणारच आहे. प्रस्तावित वाढीनंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रवर्गातील शिक्षणसेवकांना अनुक्रमे १६, १८ व २० हजार मासिक मानधन मिळणार आहे. हल्ली हातमजुरीचे काम करणाऱ्यांचे मासिक उत्पन्नही यापेक्षा जास्त असते. त्यामुळे भावी पिढ्यांचा पाया तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपविली आहे, त्यांच्या उत्पन्नासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आस्थापनेवरील सातत्याने वाढता खर्च विचारात घेता कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा सरकारचा उद्देश मान्य केला तरी, भावी पिढ्या घडविणाऱ्या मंडळींना किमान कुटुंबाच्या पोटापाण्याची चिंता भेडसावू नये, एवढी काळजी तरी सरकारने घ्यायलाच हवी.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्याचा सरकारचा दुसरा निर्णयदेखील स्वागतार्ह असला तरी, त्याची जलद अंमलबजावणी महत्त्वाची आहे; कारण अशा घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत आणि कालौघात थंड बस्त्यात पडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही गतवर्षी शिक्षणसेवक, तसेच शिक्षकांची पदे भरण्याची घोषणा केली होती. पुढे सरकार बदलले; पण भरती काही झाली नाही. आता विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणेचेही वर्षा गायकवाड यांच्या घोषणेप्रमाणे होऊ नये, म्हणजे मिळवले! राज्य सरकारची तिसरी घोषणाही तेवढीच महत्त्वाची आहे. ज्या शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गत काही दिवसांपासून जोरात सुरू होती. मात्र, असा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही, अशी माहिती केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

त्यांची ही घोषणा केवळ शिक्षक म्हणून कारकीर्द घडविण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या युवांसाठीच नव्हे, तर खेड्यापाड्यांत, आदिवासी पाड्यांमध्ये वास्तव्य असलेल्या पालकांसाठीही खूपच दिलासादायक आहे. आजच्या घडीला राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांमध्ये आवश्यक तेवढे शिक्षक नाहीत, एका शिक्षकाला एकापेक्षा जास्त वर्ग सांभाळावे लागत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे डीएड, बीएड झालेले हजारो युवक- युवती बेकारीच्या वैफल्यात दिवस काढत आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत! ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन राज्य सरकार जेवढ्या तातडीने सर्व घोषणांची अंमलबजावणी करील, तेवढे बरे।

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण