शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : सिंह... शालीन आणि हिंस्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 07:29 IST

नव्याने विकसित होणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनाच्या शीर्षस्थानी बसविण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून दुर्दैवी वाद उभा राहिला आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनाच्या शीर्षस्थानी बसविण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून दुर्दैवी वाद उभा राहिला आहे. तब्बल साडेनऊ टन वजनाच्या, सात मीटर उंचीच्या या भव्य प्रतिकृतीचे अनावरण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या उपस्थितीत केले.

ती छायाचित्रे समोर येताच अनेकांनी आक्षेप घेतला, की १९५० साली प्रजासत्ताक भारताने राष्ट्रीय चिन्ह किंवा राजमुद्रा म्हणून स्वीकारलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांपेक्षा या सिंहांची भावमुद्रा थोडी हिंस्र वाटते. मूळ अशोकस्तंभावरील सिंह शांत, धीरगंभीर, शालीन व अर्थातच सामर्थ्यशाली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर महासत्तेचा सार्थ अभिमान, आत्मविश्वास दिसताे. भक्ष्यावर झडप घालण्याची घाई त्यात नाही. विरोधकांनी आक्षेप घेतला, की केवळ सिंहांची छबीच नव्हे तर राष्ट्रपती-उपराष्ट्रपती आणि विरोधी पक्षांना या कार्यक्रमापासून दूर ठेवणे गैर आहे. त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षित प्रतिक्रिया उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी, त्यांना लक्ष्य बनविण्यासाठी विरोधकांनी शोधलेली आणखी एक संधी वगळता यात काहीही नाही, असे भाजपचे म्हणणे.

काही इतिहासकार व अभ्यासकांचे सिंहांच्या भावमुद्रेबद्दलचे आक्षेप मात्र नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी खोडून काढले. त्या भव्य प्रतिकृतीचे छायाचित्र समोरून घेणे शक्य नसल्यामुळे ते खालच्या बाजूने घेतले गेले व त्यामुळे सिंहाचा चेहरा उग्र दिसतो, असा पुरी यांचा प्रतिवाद आहे आणि सारनाथ येथील मूळ अशोकस्तंभ व या प्रतिकृतीच्या आकाराची, वजनाची तुलना करता हा प्रतिवाद बऱ्याच जणांना पटण्यासारखाही आहे. त्यातून हेदेखील स्पष्ट झाले, की आता या वादाचे पुढे फारसे काही होणार नाही. ज्यांनी आयुष्यभर इतिहास संशोधन केले, ऐतिहासिक घटना आणि प्रतीके, प्रतिमांचा अभ्यास केला, त्यावरून काही अनुमान काढले, त्याला मान्यता मिळाली, असे मान्यवर काही आक्षेप घेत असतील व सरकारचे मंत्री त्यावर तितक्याच गंभीरपणे उत्तर देत असतील, सरकारची बाजू मांडत असतील, तर ते लोकशाहीमूल्यांना धरून, खुल्या संवादाचा धागा पकडून होत आहे, असे म्हणावे लागेल. तथापि, सरकारच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावरच टाकली आहे, असे स्वत:च ठरवून काही वाचाळवीर ज्या प्रकारे या वादात उतरले आहेत व खतपाणी घालत आहेत ते केवळ संतापजनक नाही तर गंभीरपणे विचार करायला लावणारे आहे. ही सगळी मंडळी सत्ताशरण आहेत.

सार्वभौम देशाच्या राजमुद्रेबद्दल, राजचिन्हांबद्दल पुरेसे गांभीर्य न बाळगता केवळ सत्तास्थानांना खूश ठेवण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. त्यातूनच, सिंह असाच असतो, तो बकरीसारखा शांत कसा असू शकेल किंवा शेर दहाडते हुए अच्छा दिखता है, अशी मुक्ताफळे केवळ आक्षेप घेणाऱ्यांना डिवचण्यासाठी काही मान्यवरांनी केली आहेत. त्यात ज्यांनी विवेक व तारतम्य गुंडाळून ठेवले आहे व ज्यांच्या सत्तानिष्ठेबद्दल अजिबात शंका नाही असे थोर कलावंत आहेत. आधीच ज्यांची गोदी मीडिया अशी संभावना होते असे काही पत्रकार आहेत. खंत अशी, की या शिल्पकृतीचे कर्तेकरविते शिल्पकारही मूळ राजमुद्रेबद्दल न बोलता सिंहाच्या गुणवैशिष्ट्यांवर जाहीरपणे बोलत आहेत. तरी बरे सम्राट अशोकाने शांततेचे प्रतीक म्हणून सिंह का निवडले यावर ते विचार करताहेत. भारताच्या ज्ञात इतिहासातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सम्राट अशोक अजिबात दुबळा नव्हता.

कलिंगासह अनेक लढाया जिंकल्यानंतर, त्यातील रक्तपातानंतर त्यांना तथागत बुद्धाच्या अहिंसा तत्त्वाचे महत्त्व पटले होते. म्हणून त्यांनी उरलेले आयुष्य बुद्धविचारांच्या प्रसारासाठी घालविले आणि आपल्या मुलामुलींनाही भारताच्या सीमापलींकडे या मानवीय, अर्थातच ईश्वरी कार्यासाठी पाठवले.  साम्राज्याचा वृथा अभिमान किंवा अहंकार म्हणून सम्राट अशोकांनी अशा धीरगंभीर सिंहमुद्रांचे राजचिन्ह नक्कीच स्वीकारले नव्हते.

सिंह हा हिंस्र प्राणी असूनही तो शांत, गंभीर यासाठी आहे की स्वत:च्या सामर्थ्याची त्याला पुरेशी जाणीव आहे व ते सामर्थ्य कुठे वापरायचे याचे भानही आहे. तसेही दया, क्षमा, शांती ही बलवानांनाच शोभून दिसते. दुबळ्यांच्या अहिंसेला फारशी किंमत नसते. आपण म्हणतोही, क्षमा वीरस्य भूषणम्... तेव्हा, अशा वादांवर गंभीरपणेच चर्चा व्हावी. समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगचा नवा मुद्दा असे त्याचे स्वरूप असू नये.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत