शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 08:39 IST

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते

नागालँडमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या १४ निरपराध नागरिक भारतीय सैन्याच्या गोळीबारात हकनाक बळी पडले. या घटनेचे केवळ दुर्दैवी, घोडचूक वा तत्सम शब्दांत वर्णन करून चालणार नाही. जे घडले ते अक्षम्य आहे! या अत्यंत दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार असलेल्या आसाम रायफल्सने अधिकृतरीत्या खेद प्रकट केला आहे आणि चौकशीचा आदेशही दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नागालँडमध्ये जे घडले त्याबद्दल सोमवारी लोकसभेत खेद प्रकट केला आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यास सेनादलांना बजावण्यात आले असल्याची मखलाशी केली. ओळखण्यात झालेल्या चुकीमुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. शहा यांच्या वक्तव्यात नवे असे काहीच नव्हते. त्यांचे वक्तव्य अपेक्षितच होते. अशी घटना घडली, की भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते आणि तरीही अशा घटना घडतच राहतात.

सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास कवडीमोल मानण्याची जी मानसिकता गणवेशधारी संस्थांमध्ये भिनली आहे, तीच अशा घटनांसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. अशा घटनांमुळे त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबांचे तर अपरिमित नुकसान होतेच; पण देशालाही त्याची जबर किंमत चुकवावी लागते. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आधीच अन्यायाची भावना रुजलेली आहे. त्याचा फायदा घेऊन त्या राज्यांमध्ये फुटीरतावादी चळवळींनी त्यांची पाळेमुळे रुजवली आहेत. चीन आणि पाकिस्तान हे आपले शेजारी देश अशा संघटनांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पाकिस्तान काश्मीरचा आणि चीन ईशान्य भारताचा घास घेण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत देशाची खूप मोठी ऊर्जा आणि शक्ती जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरतावादी संघटनांशी लढा देण्यात खर्ची पडत आली आहे. त्यातच अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा फुटीरतावाद्यांच्या हाती आयतेच कोलीत लागते.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते; कारण त्यांच्या प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. गोपनीयतेच्या नावाखाली सुरक्षा दलांच्या संदर्भातील सर्वच माहिती उजेडात येत नाही. गत काही वर्षांत समाजातील एका घटकाने सुरक्षा दलांना देवत्व बहाल करून टाकले आहे. त्यांच्या हातून चूक घडूच शकत नाही, अशी त्यांची भाबडी श्रद्धा आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. शेवटी सुरक्षा दलांमध्ये कार्यरत मनुष्यबळ काही आभाळातून पडलेले नाही. तेदेखील समाजाचाच एक भाग आहेत. त्यामुळे समाजाच्या इतर घटकांमधील गुणदोष कमीअधिक फरकाने त्यांच्यातही असणारच! नागालँडमधील घटना अपरात्री नव्हे, तर दिवसाढवळ्या घडली आहे. घटनेचे जे तपशील समोर आले आहेत, त्यानुसार कोळसा खाणीत कार्यरत कामगार काम संपवून घरी परतत असताना, ते ज्या वाहनातून प्रवास करीत होते, त्या वाहनावर आसाम रायफल्सच्या जवानांनी अंदाधुंद गोळीबार केला. हे अत्यंत अक्षम्य आहे. त्या रस्त्याने अतिरेकी येत असल्याचा सुगावा सुरक्षा दलाला लागला असेलही; पण याचा अर्थ त्यांनी संशयास्पद वाटणाऱ्या प्रत्येक वाहनावर अंदाधुंद गोळीबार करावा असा होत नाही.

नागालँड पोलिसांनी या प्रकरणी आसाम रायफल्सच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा दले समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलैमध्ये आसाम पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये झडलेल्या सशस्त्र संघर्षाची यानिमित्ताने आपसूकच आठवण झाली. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळींना आळा घालण्यात बऱ्यापैकी यश लाभले आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामेही होत आहेत. दुर्दैवाने अशा घटना घडतात तेव्हा त्या चांगल्या कामांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण होते. सुरक्षा दलांचे नेतृत्व करणाऱ्यांनी ही बाब ध्यानी घेतली पाहिजे आणि खालपर्यंत तसा संदेश झिरपवला पाहिजे. त्याशिवाय अशा घटनांना आळा घालणे शक्य होणार नाही.

टॅग्स :FiringगोळीबारAmit Shahअमित शाह