शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

संपादकीय - माध्यमांचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:22 AM

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले आणि त्यानंतरचे, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापर्यंतचे सगळे महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले गेले. परवा २ आॅक्टोबरला झालेल्या बापूंच्या १५० व्या जयंतीचे व कस्तुरबांच्या ७५ व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने आपला राष्ट्रीय मेळावा तेथे भरविला. राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्या पक्षाचे देशभरातील सर्व नेते व कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. पदयात्रा व जाहीर सभा असे सारे होऊन सुमारे पाऊण लाखांचा तो प्रचंड जनमेळावा गांधीजींना अभिवादन करून व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकून अत्यंत उत्साही वातावरणात समाप्त झाला. आश्रमाच्या नियमाप्रमाणे सारे नेते जमिनीवर बसून जेवले व देशाच्या या नेत्यांनी नंतर त्यात स्वत:ची ताटेही धुतली! प्रार्थनेत सहभाग घेतला.

गांधीजींचे सारे यमनियम पाळून या मेळाव्याचा शेवट जाहीर सभेत झाला. तेव्हा तीत यापुढची निवडणूक गांधी वि. गोडसे या सूत्रावरच लढविण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भागीदार आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी या वेळी केली. त्यातील प्रचाराचा भाग वगळला तरी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीला देशातून एवढ्या साऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच मुळात एक विलक्षण व देशाच्या एकात्मतेएवढेच गांधीजींवरील त्यांच्या निष्ठेचे दर्शन घडविणारी बाब होती. एवढी मोठी घटना देशाच्या हृदयस्थानी घडत असताना व तिने देशात एक शांती व अहिंसेचा संदेश महात्म्याच्या नावासोबत पोहचविला असता त्या महाघटनेची घ्यावी तशी दखल देशातील प्रकाश व मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी फारशी घेऊ नये या करंटेपणाला काय म्हणायचे असते? देशभक्तीहून पक्षभक्ती आणि पक्षभक्तीहून पदभक्ती येथे मोठी झाली आहे काय? देशाच्या मध्यवर्ती स्थानी एवढे महाभारत घडत असताना या माध्यमांची तोंडे कुठे दिल्लीत, कुठे औरंगाबादेत तर कुठे शेजारच्या नागपुरात घडणाºया बारीकसारीक घटनांकडे व तेथील मध्यम वजनांच्या पुढाºयांकडे असावी हा काळाचा महिमा नसून सरकारने चालविलेल्या माध्यमांच्या गळचेपीचा व विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांना दिलेल्या निर्देशाचा परिणाम आहे. क्वचित एखाद दुसरे मराठी वृत्तपत्र सोडले तर या महान घटनेला कोणत्याही वृत्तसंस्थेने व पत्राने न्याय दिला नाही. देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या अवतीभवतीच घडत असतात. सामान्य माणूस सरकारचे हे अपयश त्याला दाखविले नाही तरी प्रत्यक्ष अनुभवत असतो. नेमक्या अशावेळी गांधीजी व कस्तुरबांसारख्या राष्टÑनिर्मात्यांच्या पुण्यस्मरणाकडे जनतेची म्हणविणारी माध्यमे दुर्लक्ष करतात आणि मोदीराजच्या कथा गाथेसारख्या आळवताना दिसतात तेव्हा त्यांचेही ढोंग जनतेच्या लक्षात येतच असते. त्यामुळे गांधी व कस्तुरबांसाठी नाही आणि काँग्रेस वा अन्य कुणासाठी नाही, तर केवळ स्वत:ची विश्वसनीयता टिकवायला तरी या माध्यमांनी जनतेच्या जवळ व तिच्या भावनांच्या आसपास राहिले पाहिजे. फार पूर्वी ‘विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना तुमची पत्रे त्यांच्या बातम्याही देत नाहीत असे का’ असा प्रश्न एका बड्या इंग्रजी दैनिकाच्या महाव्यवस्थापकाला पत्रकारांनी विचारला तेव्हा तो निगरपट्टपणे म्हणाला, ‘ते मरणारे शेतकरी आमचे वर्तमानपत्र वाचत नाहीत?’ वृत्तपत्रांना जनतेशी संबंध राखायचे नसतील आणि केवळ सरकारचे गुणगान गाऊन त्याच्या जाहिरातीच तेवढ्या मिळवायच्या असतील तर त्या वृत्तपत्रांचा आधार न घेताही त्यांना जगता येईल. मात्र, त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नुसता पोखरलाच जाणार नाही तर एक दिवस तो उन्मळून जमिनीवर पडलेलाही जनतेला दिसेल.देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या भोवतीच घडत असतात. सामान्य माणूस ते अनुभवत असतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी