शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:27 IST

परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत.

लोकसभेत पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुका समोर आल्या. भाजप-सेना यांच्यात जागावाटप होऊन त्या पक्षांचे नेते जनसंपर्काच्या यात्रा करू लागले आहेत. अजून वाट आहे ती काँग्रेसच्या बाहेर पडण्याची. त्या पक्षातील पुढाऱ्यांत एकमत होण्याची. परस्परांविषयी अतिशय टीकात्मक व वाईट बोलणे थांबण्याची. त्यांचा पक्ष नसावा आणि ते एकेकटेच आपली लढाई लढवीत किंवा दुसऱ्यांची टिंगल टवाळी करीत असावे, असे त्यांचे वागणे आहे. आपले फोटो लोकांना दाखविले आणि त्यामागे राहुल व सोनियाजींची छायाचित्रे लावली की, आपले काम फत्ते झाले, या भ्रमातून त्या लोकांना अजून बाहेर पडता आले नाही. 

आपण पडू शकतो (पडलोही आहोत), आपली मुलेही निवडून येत नाहीत, आपण विजयासाठी कोणतीही हालचाल व प्रयत्न करीत नाही, याच्याही जाणिवा त्या पक्षात दिसत नाहीत. साध्या बैठकी नाहीत, चर्चा नाहीत, जनसंपर्क नाही आणि जुनी पुण्याईही आता पातळ झाली आहे. हे या शहाण्या माणसांना कळत नसेल, तर त्यांना कोण तारणार आणि कोण मते देणार? प्रत्येक जिल्ह्यात भांडण, प्रत्येक मतदारसंघात हाणामारी, माणसे एकमेकांची तोंडे पाहत नाहीत आणि एकाने बोलाविलेल्या सभेत दुसरे येत नाहीत. ‘तो येणार असेल तर मी येणार नाही,’ असे म्हणण्यापर्यंत या एकाच पक्षातील कार्यकर्त्यांची भाषा जात असते. परिणामी, कुठेही प्रभावी नेतृत्व नाही, असलेल्याचा विश्वास नाही आणि परवाच्या महापक्षांतरानंतर पक्षाचा पुढाऱ्यांवरील व कार्यकर्त्यांवरील विश्वासही राहिला नाही.
काँग्रेसबाबत सारे आभाळच फाटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विजयाचा काही वारा यांनाही लागेल आणि त्यामुळे तरी त्यांच्यात एकजूट होईल, असा काहींचा समज होता, पण पुढाऱ्यांनी त्यांच्या वर्तनाने व निष्क्रियतेने तोही खोटा ठरविला आहे. एके काळी पक्ष जनतेचा होता. सरदार पटेल म्हणायचे, ‘आमच्या तिकिटावर विजेचा खांबही निवडून येईल.’ आता पटेल गेले आहेत, नेहरूही नाहीत, इंदिरा गांधीही गेल्या आणि पवार ते कुठे आहेत, याचा त्यांनाही पत्ता नाही. पवारांचे सोडा, ते तर कधीचेच दूर गेले आहेत, पण तुमचे नेते तरी जनतेत कुठे दिसत नाहीत. परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत. ते आपली प्रकृती कधी दुरुस्त करणार आणि पक्ष बांधणीच्या कामाला कधी लागणार?
आणखी महत्त्वाची बाब ही की, तुमचे तेच ते चेहरे पाहून लोकही कंटाळले आहेत. जरा नवीन माणसे द्या. चांगले काम करणारी व लोकांच्या विश्वासाला पात्र असणारी तरुण मुले फार आहेत. ती तुमच्या सेक्युलर विचारांचीही आहेत. त्यांना बळ द्या. सोनिया गांधींची मुले लोकप्रिय होतात, तशी आपलीही मुले होतील वा होतात, या भ्रमातून बाहेर पडा. आणि हो, ज्या पक्षाने आजवर भरभरून दिले, मुख्यमंत्रीपदापासून मंत्रीपदापर्यंत, खासदारकीपासून आमदारकीपर्यंत, कमिट्या दिल्या, समित्या दिल्या, नावे दिली आणि आणखीही बरेच काही दिले. किमान त्याला जागा आणि बाहेर पडा. विरोधक फार दूरवर गेले आहेत. फार लांबचा पल्ला त्यांनी गाठला आहे. त्यांची अपरिचित माणसेही त्यांनी निवडून आणली. आणि तुम्ही? तुम्हाला तुमच्या खुर्च्या, घरे व आराम अजून सोडवत नाही.
एकटे राहुल गांधी फिरणार, साऱ्या भाजपच्या व त्याच्या विषारी प्रचाराचा मारा ते एकटे अंगावर घेणार आणि त्यांच्यामुळे आपल्यावरचा मारा चुकतो, म्हणून तुम्ही गप्प राहणार? याला राजकारण म्हणत नाहीत. हे नेतृत्वही नाही आणि कार्यकर्तेही नाहीत. सव्वाशे वर्षांचा पक्ष अवघ्या पाच वर्षांत आपल्या निष्क्रियतेने या लोकांनी बुडविला आहे. त्याला वर आणायला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. झालेच तर आजवरच्या कमाईचा वाटाही त्यात गुंतवावा लागणार आहे. हे करण्याची किती जणांची तयारी आहे. साऱ्यांची तोंडे अजून दिल्लीकडे लागली आहेत आणि ही अवस्था त्यांना जनतेजवळ जाऊ देणारी नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा