शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:27 IST

परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत.

लोकसभेत पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुका समोर आल्या. भाजप-सेना यांच्यात जागावाटप होऊन त्या पक्षांचे नेते जनसंपर्काच्या यात्रा करू लागले आहेत. अजून वाट आहे ती काँग्रेसच्या बाहेर पडण्याची. त्या पक्षातील पुढाऱ्यांत एकमत होण्याची. परस्परांविषयी अतिशय टीकात्मक व वाईट बोलणे थांबण्याची. त्यांचा पक्ष नसावा आणि ते एकेकटेच आपली लढाई लढवीत किंवा दुसऱ्यांची टिंगल टवाळी करीत असावे, असे त्यांचे वागणे आहे. आपले फोटो लोकांना दाखविले आणि त्यामागे राहुल व सोनियाजींची छायाचित्रे लावली की, आपले काम फत्ते झाले, या भ्रमातून त्या लोकांना अजून बाहेर पडता आले नाही. 

आपण पडू शकतो (पडलोही आहोत), आपली मुलेही निवडून येत नाहीत, आपण विजयासाठी कोणतीही हालचाल व प्रयत्न करीत नाही, याच्याही जाणिवा त्या पक्षात दिसत नाहीत. साध्या बैठकी नाहीत, चर्चा नाहीत, जनसंपर्क नाही आणि जुनी पुण्याईही आता पातळ झाली आहे. हे या शहाण्या माणसांना कळत नसेल, तर त्यांना कोण तारणार आणि कोण मते देणार? प्रत्येक जिल्ह्यात भांडण, प्रत्येक मतदारसंघात हाणामारी, माणसे एकमेकांची तोंडे पाहत नाहीत आणि एकाने बोलाविलेल्या सभेत दुसरे येत नाहीत. ‘तो येणार असेल तर मी येणार नाही,’ असे म्हणण्यापर्यंत या एकाच पक्षातील कार्यकर्त्यांची भाषा जात असते. परिणामी, कुठेही प्रभावी नेतृत्व नाही, असलेल्याचा विश्वास नाही आणि परवाच्या महापक्षांतरानंतर पक्षाचा पुढाऱ्यांवरील व कार्यकर्त्यांवरील विश्वासही राहिला नाही.
काँग्रेसबाबत सारे आभाळच फाटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विजयाचा काही वारा यांनाही लागेल आणि त्यामुळे तरी त्यांच्यात एकजूट होईल, असा काहींचा समज होता, पण पुढाऱ्यांनी त्यांच्या वर्तनाने व निष्क्रियतेने तोही खोटा ठरविला आहे. एके काळी पक्ष जनतेचा होता. सरदार पटेल म्हणायचे, ‘आमच्या तिकिटावर विजेचा खांबही निवडून येईल.’ आता पटेल गेले आहेत, नेहरूही नाहीत, इंदिरा गांधीही गेल्या आणि पवार ते कुठे आहेत, याचा त्यांनाही पत्ता नाही. पवारांचे सोडा, ते तर कधीचेच दूर गेले आहेत, पण तुमचे नेते तरी जनतेत कुठे दिसत नाहीत. परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत. ते आपली प्रकृती कधी दुरुस्त करणार आणि पक्ष बांधणीच्या कामाला कधी लागणार?
आणखी महत्त्वाची बाब ही की, तुमचे तेच ते चेहरे पाहून लोकही कंटाळले आहेत. जरा नवीन माणसे द्या. चांगले काम करणारी व लोकांच्या विश्वासाला पात्र असणारी तरुण मुले फार आहेत. ती तुमच्या सेक्युलर विचारांचीही आहेत. त्यांना बळ द्या. सोनिया गांधींची मुले लोकप्रिय होतात, तशी आपलीही मुले होतील वा होतात, या भ्रमातून बाहेर पडा. आणि हो, ज्या पक्षाने आजवर भरभरून दिले, मुख्यमंत्रीपदापासून मंत्रीपदापर्यंत, खासदारकीपासून आमदारकीपर्यंत, कमिट्या दिल्या, समित्या दिल्या, नावे दिली आणि आणखीही बरेच काही दिले. किमान त्याला जागा आणि बाहेर पडा. विरोधक फार दूरवर गेले आहेत. फार लांबचा पल्ला त्यांनी गाठला आहे. त्यांची अपरिचित माणसेही त्यांनी निवडून आणली. आणि तुम्ही? तुम्हाला तुमच्या खुर्च्या, घरे व आराम अजून सोडवत नाही.
एकटे राहुल गांधी फिरणार, साऱ्या भाजपच्या व त्याच्या विषारी प्रचाराचा मारा ते एकटे अंगावर घेणार आणि त्यांच्यामुळे आपल्यावरचा मारा चुकतो, म्हणून तुम्ही गप्प राहणार? याला राजकारण म्हणत नाहीत. हे नेतृत्वही नाही आणि कार्यकर्तेही नाहीत. सव्वाशे वर्षांचा पक्ष अवघ्या पाच वर्षांत आपल्या निष्क्रियतेने या लोकांनी बुडविला आहे. त्याला वर आणायला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. झालेच तर आजवरच्या कमाईचा वाटाही त्यात गुंतवावा लागणार आहे. हे करण्याची किती जणांची तयारी आहे. साऱ्यांची तोंडे अजून दिल्लीकडे लागली आहेत आणि ही अवस्था त्यांना जनतेजवळ जाऊ देणारी नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा