शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 08:47 IST

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या ‘गुलाबा’ने शेतकऱ्यांचा अक्षरश: काटा काढला. निसर्गाचा हा ‘हनी ट्रॅप’ होता की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण, एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील जवळपास सगळी धरणे एकाएकी भरली. नद्यांना पूर आला, ओढेनाले ओसंडून वाहू लागले. शेतीच्या, जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, या आनंदात सगळे असतानाच शिवारात मात्र वेगळेच चित्र होते. अवघ्या दोन दिवस झालेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या उडीद, मूग, मका, कापूस, सोयाबीन या खरीप पिकांचा अक्षरशः चिखल झाला. चाळीसहून अधिक माणसे दगावली. पशुधन किती वाहून गेले याची तर गणतीच नाही.

सुमारे सात लाख हेक्टरवरील जमीन पाण्यासोबत वाहून गेली. प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३५ लाख ६४ हजार इतकी आहे. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘पावसाने तहान भागवली पण घास हिरावला!’ अशी सध्या स्थिती आहे. कधी नव्हे ती यंदा खरीप पिके जोमदार आली होती. सोयाबीनचा बाजारभाव वधारला होता. कापसाची बोंडेही चांगलीच बहरली होती. असे असताना अचानक आलेल्या या गुलाबी चक्रीवादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. मराठवाड्यातील शेतकरी आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेला. त्यात या अवकाळी संकटाची भर! आजवर अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. पिके ऐन काढणीवर असताना अतिवृष्टी होते आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जातो. निसर्गचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्यांना ना पुरेशी नुकसानभरपाई मिळते, ना विम्याची रक्कम! परवाच्या चक्रीवादळाने या भागातील जवळपास सुमारे २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नुकसानीचा आकडा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पंचनामे कसे होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार करत बसण्याऐवजी दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना जशी तातडीने मदत केली होती, तशी तत्परता दाखवली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे निकष एनडीआरएफने ठरवून दिले आहेत. उदा. पशुधन वाहून गेले असल्यास संबंधित पशुपालकास मदत देण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि दूध संघाचा संचालक यांच्या स्वाक्षरीचा ‘स्पॉट पंचनामा’ ग्राह्य धरण्यात येतो. एवढा द्रविडी प्राणायाम कोण करत बसणार? शिवाय, गावकी अन् भावकीच्या राजकारणात एवढी मंडळी मदतीसाठी पुढे येतीलच याचा नेम नाही. तेव्हा अशा सोपस्कारात न जाता सरकारने तातडीने सरसकट हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी, पशुधन पालक, छोट्या व्यावसायिकांना तर झुकते माप दिले पाहिजे. कारण, हा प्रदेश अवर्षणप्रवण आहे. केवळ खरिपावर गुजराण करणारा आहे. 

परवाच्या चक्रीवादळाने केवळ पिकांची नासाडीच केली नाही, तर जमीनच नापीक करून टाकली आहे. नद्यांचे प्रवाह बदलल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नदीपात्राचे रुंदीकरण करताना सगळा भराव नदीकाठावर टाकण्यात आला. तो यंदाच्या महापुरात पुन्हा नदीत आल्याने नदीकाठावरच्या जमिनीची प्रचंड हानी झाली. हे नुकसान सरकारी यंत्रणांना मोजता येणारे नाही की, निकषात बसणारे. त्यामुळे विमा कंपन्यांकडे बोट दाखवून सरकारला आपला हात सोडवता येणार नाही. नुकसानीच्या किमान तीनपट रक्कम देतानाच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज काढले असेल आणि ते पीक ५० टक्के वाया गेले असेल, तर संबंधित शेतकऱ्याचे पीककर्ज माफ करून टाकायला हवे.

एनडीआरएफच्या निकषात ही बाब बसू शकते. सरकारने २९ ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. कोरोनामुळे लांबलेली पोरीबाळांची लग्ने उरकायची आहेत. थकलेल्या कर्जाची परतफेड बाकी आहे. तेव्हा निसर्गाने जे हिरावून नेले त्याची परतफेड सरकारने करावी, ही अपेक्षा रास्त आहे. लाखो शेतकरी कुटुंबीयांसाठी एवढे मागणे लई नाही.

टॅग्स :RainपाऊसCyclone Gulabगुलाब चक्रिवादळMaharashtraमहाराष्ट्र