शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 08:47 IST

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या ‘गुलाबा’ने शेतकऱ्यांचा अक्षरश: काटा काढला. निसर्गाचा हा ‘हनी ट्रॅप’ होता की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण, एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील जवळपास सगळी धरणे एकाएकी भरली. नद्यांना पूर आला, ओढेनाले ओसंडून वाहू लागले. शेतीच्या, जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, या आनंदात सगळे असतानाच शिवारात मात्र वेगळेच चित्र होते. अवघ्या दोन दिवस झालेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या उडीद, मूग, मका, कापूस, सोयाबीन या खरीप पिकांचा अक्षरशः चिखल झाला. चाळीसहून अधिक माणसे दगावली. पशुधन किती वाहून गेले याची तर गणतीच नाही.

सुमारे सात लाख हेक्टरवरील जमीन पाण्यासोबत वाहून गेली. प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३५ लाख ६४ हजार इतकी आहे. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘पावसाने तहान भागवली पण घास हिरावला!’ अशी सध्या स्थिती आहे. कधी नव्हे ती यंदा खरीप पिके जोमदार आली होती. सोयाबीनचा बाजारभाव वधारला होता. कापसाची बोंडेही चांगलीच बहरली होती. असे असताना अचानक आलेल्या या गुलाबी चक्रीवादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. मराठवाड्यातील शेतकरी आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेला. त्यात या अवकाळी संकटाची भर! आजवर अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. पिके ऐन काढणीवर असताना अतिवृष्टी होते आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जातो. निसर्गचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्यांना ना पुरेशी नुकसानभरपाई मिळते, ना विम्याची रक्कम! परवाच्या चक्रीवादळाने या भागातील जवळपास सुमारे २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नुकसानीचा आकडा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पंचनामे कसे होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार करत बसण्याऐवजी दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना जशी तातडीने मदत केली होती, तशी तत्परता दाखवली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे निकष एनडीआरएफने ठरवून दिले आहेत. उदा. पशुधन वाहून गेले असल्यास संबंधित पशुपालकास मदत देण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि दूध संघाचा संचालक यांच्या स्वाक्षरीचा ‘स्पॉट पंचनामा’ ग्राह्य धरण्यात येतो. एवढा द्रविडी प्राणायाम कोण करत बसणार? शिवाय, गावकी अन् भावकीच्या राजकारणात एवढी मंडळी मदतीसाठी पुढे येतीलच याचा नेम नाही. तेव्हा अशा सोपस्कारात न जाता सरकारने तातडीने सरसकट हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी, पशुधन पालक, छोट्या व्यावसायिकांना तर झुकते माप दिले पाहिजे. कारण, हा प्रदेश अवर्षणप्रवण आहे. केवळ खरिपावर गुजराण करणारा आहे. 

परवाच्या चक्रीवादळाने केवळ पिकांची नासाडीच केली नाही, तर जमीनच नापीक करून टाकली आहे. नद्यांचे प्रवाह बदलल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नदीपात्राचे रुंदीकरण करताना सगळा भराव नदीकाठावर टाकण्यात आला. तो यंदाच्या महापुरात पुन्हा नदीत आल्याने नदीकाठावरच्या जमिनीची प्रचंड हानी झाली. हे नुकसान सरकारी यंत्रणांना मोजता येणारे नाही की, निकषात बसणारे. त्यामुळे विमा कंपन्यांकडे बोट दाखवून सरकारला आपला हात सोडवता येणार नाही. नुकसानीच्या किमान तीनपट रक्कम देतानाच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज काढले असेल आणि ते पीक ५० टक्के वाया गेले असेल, तर संबंधित शेतकऱ्याचे पीककर्ज माफ करून टाकायला हवे.

एनडीआरएफच्या निकषात ही बाब बसू शकते. सरकारने २९ ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. कोरोनामुळे लांबलेली पोरीबाळांची लग्ने उरकायची आहेत. थकलेल्या कर्जाची परतफेड बाकी आहे. तेव्हा निसर्गाने जे हिरावून नेले त्याची परतफेड सरकारने करावी, ही अपेक्षा रास्त आहे. लाखो शेतकरी कुटुंबीयांसाठी एवढे मागणे लई नाही.

टॅग्स :RainपाऊसCyclone Gulabगुलाब चक्रिवादळMaharashtraमहाराष्ट्र