शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 08:47 IST

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या ‘गुलाबा’ने शेतकऱ्यांचा अक्षरश: काटा काढला. निसर्गाचा हा ‘हनी ट्रॅप’ होता की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण, एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील जवळपास सगळी धरणे एकाएकी भरली. नद्यांना पूर आला, ओढेनाले ओसंडून वाहू लागले. शेतीच्या, जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, या आनंदात सगळे असतानाच शिवारात मात्र वेगळेच चित्र होते. अवघ्या दोन दिवस झालेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या उडीद, मूग, मका, कापूस, सोयाबीन या खरीप पिकांचा अक्षरशः चिखल झाला. चाळीसहून अधिक माणसे दगावली. पशुधन किती वाहून गेले याची तर गणतीच नाही.

सुमारे सात लाख हेक्टरवरील जमीन पाण्यासोबत वाहून गेली. प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३५ लाख ६४ हजार इतकी आहे. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘पावसाने तहान भागवली पण घास हिरावला!’ अशी सध्या स्थिती आहे. कधी नव्हे ती यंदा खरीप पिके जोमदार आली होती. सोयाबीनचा बाजारभाव वधारला होता. कापसाची बोंडेही चांगलीच बहरली होती. असे असताना अचानक आलेल्या या गुलाबी चक्रीवादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. मराठवाड्यातील शेतकरी आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेला. त्यात या अवकाळी संकटाची भर! आजवर अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. पिके ऐन काढणीवर असताना अतिवृष्टी होते आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जातो. निसर्गचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्यांना ना पुरेशी नुकसानभरपाई मिळते, ना विम्याची रक्कम! परवाच्या चक्रीवादळाने या भागातील जवळपास सुमारे २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नुकसानीचा आकडा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पंचनामे कसे होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार करत बसण्याऐवजी दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना जशी तातडीने मदत केली होती, तशी तत्परता दाखवली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे निकष एनडीआरएफने ठरवून दिले आहेत. उदा. पशुधन वाहून गेले असल्यास संबंधित पशुपालकास मदत देण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि दूध संघाचा संचालक यांच्या स्वाक्षरीचा ‘स्पॉट पंचनामा’ ग्राह्य धरण्यात येतो. एवढा द्रविडी प्राणायाम कोण करत बसणार? शिवाय, गावकी अन् भावकीच्या राजकारणात एवढी मंडळी मदतीसाठी पुढे येतीलच याचा नेम नाही. तेव्हा अशा सोपस्कारात न जाता सरकारने तातडीने सरसकट हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी, पशुधन पालक, छोट्या व्यावसायिकांना तर झुकते माप दिले पाहिजे. कारण, हा प्रदेश अवर्षणप्रवण आहे. केवळ खरिपावर गुजराण करणारा आहे. 

परवाच्या चक्रीवादळाने केवळ पिकांची नासाडीच केली नाही, तर जमीनच नापीक करून टाकली आहे. नद्यांचे प्रवाह बदलल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नदीपात्राचे रुंदीकरण करताना सगळा भराव नदीकाठावर टाकण्यात आला. तो यंदाच्या महापुरात पुन्हा नदीत आल्याने नदीकाठावरच्या जमिनीची प्रचंड हानी झाली. हे नुकसान सरकारी यंत्रणांना मोजता येणारे नाही की, निकषात बसणारे. त्यामुळे विमा कंपन्यांकडे बोट दाखवून सरकारला आपला हात सोडवता येणार नाही. नुकसानीच्या किमान तीनपट रक्कम देतानाच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज काढले असेल आणि ते पीक ५० टक्के वाया गेले असेल, तर संबंधित शेतकऱ्याचे पीककर्ज माफ करून टाकायला हवे.

एनडीआरएफच्या निकषात ही बाब बसू शकते. सरकारने २९ ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. कोरोनामुळे लांबलेली पोरीबाळांची लग्ने उरकायची आहेत. थकलेल्या कर्जाची परतफेड बाकी आहे. तेव्हा निसर्गाने जे हिरावून नेले त्याची परतफेड सरकारने करावी, ही अपेक्षा रास्त आहे. लाखो शेतकरी कुटुंबीयांसाठी एवढे मागणे लई नाही.

टॅग्स :RainपाऊसCyclone Gulabगुलाब चक्रिवादळMaharashtraमहाराष्ट्र