शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 04:56 IST

सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश सुसंस्कृत, शालीन व कणखर नेतृत्वाला मुकला आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अजोड वक्तृत्वशैली, निर्भय वावर हे सुषमाजींचे वैशिष्ट्य. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास असे. बुद्धिमत्तेला मिळालेली अभ्यास व अनुभवाची जोड यातून तो आला होता. पण त्याला अहंकाराचा वास नसे. उच्चभ्रू वर्गाचा वावर असणाऱ्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले, तरी त्या वर्गाचा तोरा त्यांच्या वागण्या-बोलण्यात नव्हता. सर्वांना त्या आपल्याशा वाटत. परराष्ट्र खात्याला माणुसकीचा चेहरा देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. भारतीय दूतावास हा त्या देशातील रहिवासी व प्रवासी भारतीयांचे हक्काचे घर असल्याचा विश्वास त्यांनी कामातून दिला. ‘जनतेचे मंत्रालय’ अशी या खात्याच्या कारभाराला त्यांनी मिळवून दिलेली ओळख महत्त्वाची आहे.

स्वभाव, विचारधारा आणि वास्तव यांच्यात उत्तम मेळ घालण्याचे कौशल्य स्वराज यांच्याकडे होते. ते त्यांनी देशातील राजकारण व परराष्ट्रीय कारभार या दोन्ही ठिकाणी चांगल्या रीतीने वापरले. तरुण वयात हरयाणासारख्या कर्मठ राज्यात मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली. आणीबाणीत जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सहवासात नेतृत्वगुण विकसित झाले. तरुणपणी त्यांच्यावर मार्क्सवाद व समाजवादाचा प्रभाव होता. पुढे भाजपच्या संपर्कात आल्यावर त्या पक्षाच्या विचारांची कास त्यांनी धरली, ती कायमचीच. पण कडव्या हिंदुत्ववादीही त्या झाल्या नाहीत. लालकृष्ण अडवाणींच्या शिष्या असूनही त्यांचे हिंदुत्व अडवाणी, मोदी यांच्यापेक्षा वाजपेयींच्या जास्त जवळ जाणारे होते.
सोनिया गांधींच्या विरोधात कर्नाटकमधून निवडणूक लढवल्याने आणि त्या पंतप्रधान झाल्या तर केशवपन करीन या त्यांच्या मूळ स्वभावाशी न जुळणाऱ्या, आक्रस्ताळ्या भूमिकेने त्यांचे नाव देशात पोहोचले. संघ परिवाराला पसंत पडणाऱ्या या भूमिकेनंतर त्यांच्यातील गुणांना वाव मिळाला. अडवाणींच्या नेतृत्वाखालील मोठ्या पराभवानंतर संघाने नवे नेतृत्व घडविण्यास प्रारंभ केला; तेव्हा नितीन गडकरी, अरुण जेटलींसोबत सुषमा स्वराज शीर्षस्थानी होत्या. गांजलेल्या मनमोहन सिंग सरकारवर सुषमा स्वराज यांनी लोकसभेत तुफानी हल्ले चढविले. नरेंद्र मोदींच्या २०१४च्या विजयात सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील या कामगिरीचा मोठा वाटा होता. मात्र त्या मोदी गटातील नव्हत्या. त्यांच्यात वितुष्ट नसले तरी सख्यही नव्हते.
पक्षातील त्यांचे वरिष्ठ स्थान लक्षात घेऊन त्यांना परराष्ट्रमंत्रिपद दिले गेले. नेहरूंपासून भारताच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधानांची छाप नेहमी असते. मोदी त्याला अपवाद नव्हते. सुषमा स्वराज यांचे वैशिष्ट्य असे की मोदींसारख्या लोकप्रिय व प्रचारतंत्रकुशल नेत्याबरोबर काम करतानाही त्यांनी आपला ठसा उमटविला. परराष्ट्र व्यवहारातील नाट्यमयता मोदींवर सोडून दिली व आपले लक्ष परराष्ट्र खात्याला जनतेशी जोडण्यावर केंद्रित केले. भाषेवर पकड, सौजन्यशील वागणूक, राष्ट्रहिताचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे कसोटीच्या प्रसंगी त्यांनी भारताचे नाव लख्खपणे जागतिक व्यासपीठावर नोंदवले.
मोदींचे परराष्ट्र धोरण कठोर होते. हिंदू बहुसंख्याकांच्या सरकारचा ठपकाही होता. तरीही चीन, अमेरिकेपासून मुस्लीम राष्ट्रांत भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम सुषमा स्वराज यांनी केले. त्यांच्या युक्तिवादात चापल्य असले तरी ओरखडे नसत. प्रतिपक्षाशी मैत्रीचा अवकाश त्यात असे. दिव्यांग गीताला भारतात आणताना पाकिस्तानने केलेल्या मदतीचे त्यांनी जाहीर कौतुक केले; पण त्याच पाकिस्तानला दहशतवादावरून कडक शब्दांत सुनावण्यास कमी केले नाही. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची कोंडी करण्याचे डावपेचही यशस्वीपणे टाकले. त्याचवेळी सामान्य देशवासीयांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. संकटाच्या वेळी तत्काळ उभी राहणारी व्यक्ती, असा नावलौकिक अनेक प्रसंगांतून मिळविला. वाजपेयी, अडवाणी, मोदी अशा लोकप्रिय नेत्यांच्या प्रभावळीत वावरूनही ‘प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधेन नाही’ हे स्थान त्यांनी कामातून मिळविले. त्यामुळेच स्वराज यांचे जाणे चटका लावणारे आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग