शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:43 IST

दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते.

दहावी असो की बारावी, परीक्षेत नापास झालेल्यांना शिक्षणाचा वीट यावा, अशी व्यवस्था अवतीभवती आहे. ज्यामुळे विद्यार्थी प्रवाहातून बाहेर पडतात. तसे घडू नये यासाठी शिक्षक अन् पालकांना सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल. केवळ हुशारी म्हणजे जीवनात यश हे पूर्ण सत्य नाही. शिक्षण अभ्यासक ॲन्जेला ली डकवर्थ यांनी तीन हजार हुशार अन् तीन हजार चिकाटी असणाऱ्या मुलांसोबत एक महत्वाचा प्रयोग केला. जी मुले केवळ हुशार होती त्यापेक्षा ज्यांच्याकडे दृढनिश्चय, ध्येयवेडेपणा आणि चिकाटी होती ती मुले ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी ठरली. अर्थात परीक्षांमधील १०० टक्क्यांचे गुणपत्रक म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग नाही. तितके गुण मिळवूनही दहा वाक्ये आत्मविश्वासाने बोलता येत नसतील, जगण्यासाठीची कौशल्ये आत्मसात केली नसतील तर त्या पैकीच्या पैकी गुणांचा उपयोग तरी काय? २१ व्या शतकात एकमेकांना सहकार्य करून सहयोगाने पुढे जाण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र आपण आजही स्पर्धेत अडकलो आहोत. त्यामुळे परीक्षेतील अधिक गुणांमुळे फाजिल आत्मविश्वास बाळगू नका अन् कुठे कमी पडलात म्हणून खचूही नका, हे शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले पाहिजे. त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा विद्यार्थी नैराश्यात अडकून वेगळ्या वाटेने तरी जातात अथवा टोकाचे निर्णय घेतात. दहावी, बारावीचा निकाल लागला,  नीट, जेईईमध्ये यश मिळाले नाही की, मुलांना जणू सगळे काही संपले  आहे, असे का वाटावे? ही मानसिक अवस्था निर्माण करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांपेक्षा पालक अधिक जबाबदार आहेत.

दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते. अगदी प्राथमिक वर्गातील चाचणी परीक्षांमधील एकेका गुणासाठी आई-वडील शिक्षकांना भंडावून सोडतात. खाजगी, जिल्हा परिषद अशा सर्वच शाळांमध्ये हल्ली हे असे चित्र दिसते. ही पालकांची जागरूकता आहे की, स्बत:च तयार केलेली स्पर्धा जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न? ‘परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे’ हे आधी पालकांच्या ध्यानी आले तर मुलांवरचा ताण कमी होईल. त्याला जे आवडेल ते तो करू शकेल. दहावी, बारावी बोर्डाचे महत्त्व कमी झाले असे कितीही म्हटले तरी ज्या घरातील मुले दहावी- बारावीत जातात तिथे अनेक बंधनांची सनद तयार केली जाते. या पलीकडे जात विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेणारे शिक्षक, पालक त्यांच्या पुढच्या पिढीला मोकळा श्वास देत आहेत. अर्थात, त्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. नवे शैक्षणिक धोरण त्यात बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. यापुढच्या काळात परीक्षा होणारच आहेत. त्यात लेखी परीक्षा हा एक भाग असेल. परंतु, विद्यार्थी वर्गात कसा वागतो, वर्गमित्रांचे सहकार्य कसे घेतो, त्यांना सहकार्य किती करतो, त्याचा स्वाध्याय किती दर्जेदार आहे आणि तो स्वयंप्रेरणेने किती शिकतो, यावर मूल्यमापन करणारी शालेय व्यवस्था आपल्याकडे निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निरीक्षण शिक्षक, वर्गातील सहकारी विद्यार्थी आणि स्वत: विद्यार्थी करतील. हे बदल पुढच्या काही वर्षात दिसतील.

सिंगापूर, जपान, चीन हे देश शालेय शिक्षणामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये कसे आले, याचा विचार केला जात आहे. सिंगापूरच्या आश्चर्यकारक प्रगतीमागची प्रेरक शक्ती ही शिक्षणपद्धतीच आहे. जपानमध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही तिथे वर्गात तंत्रज्ञानाचा वापर कमी होतो. २०१८ च्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात जपान शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. शालेय शिक्षणातून प्रत्यक्ष होणारे संस्कार हे जपानी लोकांच्या वर्तनातून दिसतात. त्यामुळे शाळेत तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा, यावरही आपल्या देशात  चिंतन, मंथन करण्याची गरज आहे. परीक्षा आणि गुण इतकेच मूल्यमापन न करता शालेय शिक्षणात बदल घडविण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याला शिक्षकांनी, किंबहुना पालकांनी साथ दिली तरच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल