शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे, सत्तेची सूत्रं पवारांकडे... कोण ऐकणार काँग्रेसचे साकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:06 IST

विलासराव देशमुख नेहमी सांगायचे की, विरोधी पक्षाबरोबर आपल्याला पक्षातील विरोधकांशी दोन हात करावे लागतात. सत्तेचे माप पदरात न पडलेले काँग्रेसमधील काही नेते अस्वस्थ असून, तेच दिल्लीत विद्यमान सरकारमध्ये काँग्रेसच्या डावलले जाण्याच्या तक्रारी करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीला वर्ष-दोन वर्षे असताना भाजपने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात शिवसेनेसोबतची ही तीन पायांची शर्यत थांबविण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यानंतर युतीत शिवसेना सडली, येथवर टोकाची भाषा सेनेच्या नेत्यांनी केली. कडाक्याचे भांडण करून घटस्फोट घेतल्यानंतर शिवसेनेने (अगोदरच्या राजकीय विवाहाचे कटू अनुभव गाठीशी असतानाही) राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशी ‘निकाह’ कबूल करून ‘महाविकास’ आघाडीचे बिऱ्हाड मांडले. आता पुन्हा या संसारात कुरबुरी सुरूझाल्या आहेत. अर्थात त्याची एक नव्हे, तर अनेक कारणे आहेत. राज्यातील सरकारचे नेतृत्व शिवसेना करीत असली, तरी सत्तेची सूत्रे शरद पवार यांच्या हाती आहेत, असा सार्वत्रिक समज असून, त्याचे कारण अर्थातच सरकार स्थापन होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद खोलीत झालेल्या ‘त्या’ गुप्त बैठकीत दडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना आघाडीच्या संसाराचा प्रदीर्घ अनुभव असला तरी त्यांच्याही संसारात भांड्याला भांडे लागत होतेच. काँग्रेस या सरकारमध्ये सहभागी झाली नसती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आकाराला आले नसते. त्यामुळे काँग्रेस या सरकारमध्ये हवी आहे; पण या सरकारमध्ये काँग्रेसला न्हाऊमाखू घालून तिच्या पोटात चार सुग्रास घास पडावे, ही ना राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे ना शिवसेनेची. कारण काँग्रेसने बाळसे धरलेले राष्ट्रवादीला परवडणारे नाही. दुसरी या सरकारची सर्वांत मोठी समस्या ही संपर्क यंत्रणेची आहे. ‘मातोश्री’ हे जगाच्या पाठीवर असे एक ठिकाण आहे की, जेथून संपर्काची इच्छा असेल तर तो केला जातो, अन्यथा तिकडे संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करूनही होत नाही. काँग्रेसचे अनेक नेते संपर्क करून थकूनभागून गेले आहेत.
युतीच्या सरकारमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत अनेकांनी या केवळ ‘इनकमिंग’ कॉल सेवेचा अनेकदा अनुभव घेतला आहे. कदाचित दिल्लीत थेट अहमद पटेल यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’तून हॉटलाईनवर संपर्क होत असेल, तर राज्यातील नेत्यांशी विचारविनिमय करण्याची गरज भासत नसेल. (आघाडी सरकारमध्ये दोन पटेल अनेकदा बसून मोठे निर्णय घेत व ते राज्यातील नेत्यांना कळविले जात) राष्ट्रवादीने हे इंगित ‘मातोश्री’च्या कानी टाकले असू शकते. त्यामुळे मग महाविकास आघाडीतील या नावडतीचा जाच करण्याकरिता विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्यांच्या जागांमध्ये चारऐवजी तीन जागा हातावर टेकविणे, काही खाष्ट अधिकारी डोक्यावर आणून बसविणे, निधीच्या वाटपात चिंचोके हातावर टेकविणे, भाजप सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आग्रह करूनही तो न जुमानणे, सरकारमधील काही खात्यांचे विभाजन करताना काँग्रेसकडील खात्यांना कात्री लावणे व त्याबाबत विश्वासात न घेणे अशी एक ना अनेक खुसपटे काढली गेली आहेत.
काँग्रेसमध्ये ही अस्वस्थता असली तरी लागलीच ‘तलाक’ होईल, अशी शक्यता दिसत नाही. कारण लागलीच निवडणुका कुणालाही परवडणाऱ्या नाहीत. कोरोनावर मात करणे ही तूर्त साऱ्यांचीच प्राथमिकता आहे. सरकारची आणि उद्योग जगताची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होणे ही साऱ्यांची गरज आहे. बिहार, उत्तर प्रदेशचे निकाल पुढील राजकारणाची दिशा ठरविणार आहेत. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खासदारकीच्या आग्रहापुढेही काँग्रेस नेतृत्वाने मान तुकवलेली नाही. केंद्रातील सत्ता गमावलेल्या या पक्षाने सत्तेकरिता तडजोड न करण्याचे संकेत मध्य प्रदेशात दिले आहेत. त्यामुळे योग्य वेळ येताच काँग्रेस भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय आपण घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात सत्तेचा लोण्याचा गोळा आपल्या तोंडात पडावा याकरिता भलामोठा ‘आ’ वासून बसलेल्या भाजप नेत्यांना तृप्तीचा ढेकर देण्याची संधी मिळू नये, याची काळजी काँग्रेसला घ्यावी लागेल. कारण महाविकास आघाडीच्या या निकाहमुळे कुठलाही पक्ष कुणाही सोबत लग्नाचा पाट लावायला मोकळा झाला आहे. तसे झाल्यास भविष्यात निवडणुका टाळण्याकरिता राष्ट्रवादी-भाजपमध्ये तीन पायांच्या शर्यतीचा खेळ रंगू शकतो.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार