शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

संपादकीय - सीमाप्रश्नाची खदखद, कर्नाटकनंतर आता तेलंगणाचाही वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:18 IST

महाराष्ट्रातील काही कानडीबहुल गावांनी विकासाची कामे करा, अन्यथा आमचा कर्नाटकात समावेश करा, अशी मागणी केली. वास्तविक भाषिक सीमावादाशी या मागणीचा काही संबंध नाही.

महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत निर्मितीपासून सीमेवरून वाद आहे. सुमारे ८६५ मराठीबहुल गावे कर्नाटकात घातली गेली. त्यांची मागणी आहे की, आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे. कारण आमची मातृभाषा आणि संस्कृती मराठी आहे. या प्रश्नावर अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. संसदेत जेव्हा या प्रश्नावर चर्चा झाली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्ट १९६७ रोजी नेमण्यात आलेल्या महाजन आयोगाने ८६५ गावांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत केवळ २६४ मराठी गावे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील २४७ कन्नड भाषिक गावे कर्नाटकला देण्याचा निर्णय दिला. बेळगाव शहराचा समावेश कर्नाटकातच असेल, असाही निर्णय देऊन टाकला. हा अहवाल महाराष्ट्राने नाकारल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पुढे चर्चाच झालेली नाही. महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानेच चर्चेचे काहूर माजले आहे. महाराष्ट्रातील काही कानडीबहुल गावांनी विकासाची कामे करा, अन्यथा आमचा कर्नाटकात समावेश करा, अशी मागणी केली. वास्तविक भाषिक सीमावादाशी या मागणीचा काही संबंध नाही.

सांगली जिल्ह्यातील जत तालुका पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी करतो आहे. नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा तेलंगणामध्ये समावेश करावा, कारण महाराष्ट्र सरकार आमच्या मूलभूत समस्या सोडविण्यास अग्रक्रम देत नाही, दूरवरचे तालुके दुर्गम असून, त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होते आहे, असा त्या-त्या तालुकावासीयांचा आक्षेप आहे. येथेही भाषिक वादाचा विषय नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील काही गावांची मागणी आहे की, आमचा तेलंगणामध्ये समावेश करण्यात यावा. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील चौदा मराठी भाषिक गावांवर तेलंगणाने हक्क सांगितलेला आहे. या गावांची मागणी नसताना तेलंगणाच्या मागणीचे आश्चर्य वाटते. या गावात तेलंगणा सरकारने अनेक सार्वजनिक कामेही केली आहेत. शाळा बांधल्या आहेत. नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर किंवा सांगली जिल्ह्यातील ४२ गावांची तक्रार हीच आहे की, दूरवर वसलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरील या गावांत विकासाची कोणतीही कामे होत नाहीत. कर्नाटकाने जत आणि अक्कलकोट तालुक्यातील काही गावे घेण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका मांडल्याने वादाला वेगळेच वळण लागले आहे. मूळ सीमा प्रश्न भाषिक वादाचा आहे. कर्नाटकाने सीमा भागात विकासाची कामे कोणताही भेदभाव न करता करण्याचे धोरण अलीकडे स्वीकारले आहे. उत्तम रस्ते, मोफत शिक्षण, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा, बेघरांसाठी घरकुल योजना, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, त्यासाठी अनुदान इत्यादी सोयी-सवलती दिल्या आहेत. सीमेवरील गावांतील मंडळींच्या हे लक्षात येते.

तेलंगणा आणि कर्नाटकात अनेक सामाजिक सुरक्षा देणाऱ्या योजना आहेत. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करीत नाही, सीमेवरील त्या दूरवरच्या गावांपर्यंत पोहोचत नाही. जतसारख्या तालुक्याला पाणी देण्याच्या घोषणा अनेकवेळा राज्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. अंदाजपत्रकात तरतूद होऊन काम सुरू होत नाही. महाराष्ट्रात युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते म्हैशाळ पाणी योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्याला चोवीस वर्षे झाली. आता पुन्हा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हैशाळ योजनेचे पाणी देण्याची घोषणा करावी लागली. या मध्यंतरीच्या काळातील चोवीस वर्षांत काय झाले? जत असो किंवा नांदेड, जिल्ह्यातील सोळापैकी तेलंगणा सीमेवरील सहा तालुके असोत, त्यांचे प्रश्न सोडविण्यात कोणती अडचण आहे? महाराष्ट्राचे विविध राज्यांच्या सीमेवरील तालुक्यांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रात असे किमान शंभर तालुके आहेत, ज्या ठिकाणी विकासाची कोणतीही मूलभूत कामे झालेली नाहीत. नांदेडमधून शेकडो शेतमजूर तेलंगणामध्ये स्थलांतर करून रोजीरोटी कमावत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या निमित्ताने सीमा भागातील इतरांनी विकासाचे प्रश्न उपस्थित करायला नको होते. त्यांची मागणी करायची वेळ चुकली, पण त्यांचाही नाइलाज झाला असावा. कर्नाटकाने अतिरेकी, टोकाची भूमिका घेतल्याने नांदेड किंवा सांगली तसेच चंद्रपूरचा वाद निघाला आहे. त्यांचे प्रश्न विकासाचे आहेत. भाषिक वादाचे किंवा भाषिक अन्यायाचे नाहीत. याकडे महाराष्ट्राने अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावTelanganaतेलंगणाSangliसांगलीNandedनांदेड