शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी पट्ट्यात भाजपची बल्ले; मोदी-शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ३ राज्ये जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 08:10 IST

गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती. त्यात मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांची ॲन्टीइन्कबसी महत्त्वाचा फॅक्टर होता.

लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. पाच राज्यांपैकी मिझोरामचे निकाल सोमवारी येतील. उरलेल्या चारपैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड भाजपने जिंकले तर तेलंगणमध्ये काँग्रेसने बाजी मारली. राजस्थानमध्ये भाजप व काँग्रेसला आलटून पालटून सत्ता देण्याचा तीस वर्षांचा रिवाज कायम राहिला. पंचवीस लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची चिरंजीवी योजना आणि पाचशे रुपयांत गॅस सिलिंडरच्या बळावर अशोक गेहलोत जादू दाखवतील, ही अटकळ फोल ठरली. ते लढले; परंतु, त्यांना रिवाज बदलता आला नाही.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी थेट २०१३ सारखा प्रचंड मोठा विजय मिळविला. दरमहा विशिष्ट रक्कम महिलांच्या खात्यात जमा करणारी त्यांची ‘लाडली बहना’ योजना गेमचेंजर ठरली. दीड महिन्यात तब्बल एकशे साठहून अधिक सभा घेत ते बहिणींना भेटले. ही मेहनत पदरात यश टाकून गेली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा व गृहमंत्री अमित शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ही तीन राज्ये जिंकली आहेत. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या फायनलचा विचार करता, मध्य प्रदेशात २९ पैकी २८, राजस्थानात सर्व २५, छत्तीसगडमध्ये अकरापैकी दहा जागा या गेल्यावेळच्या देदीप्यमान यशाच्या पुनरावृत्तीसाठी विधानसभा जिंकणे आवश्यक होतेच.

गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती. त्यात मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांची ॲन्टीइन्कबसी महत्त्वाचा फॅक्टर होता. ते ओळखून यंदा केवळ मोदींचा चेहरा, एकेका जागेचा सखोल अभ्यास, त्यानुसार उमेदवारांची निवड आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर बारीक लक्ष हे भाजपचे डावपेच फलद्रूप झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे पंतप्रधान व मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घेऊनच सामोरे जाण्याचा पायंडा पाडणारा भाजप अलीकडे उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता असा चेहरा न देता विधानसभा निवडणुका लढण्याचे धोरण राबवतो. यावेळी त्याहीपुढे केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्ष स्पर्धा लावण्याची खेळी खेळली गेली. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये प्रत्येकी सात, छत्तीसगडमध्ये चार व तेलंगणमध्ये तीन असे एकवीस खासदारांना काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जागांवर उतरविण्यात आले. अपवाद वगळता बहुतेकजण विजयी झाले. त्याचा परिणाम शेजारच्या मतदारसंघांवरही पडला आणि भाजपचे संख्याबळ वाढले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला विजयाने धक्कादायक हुलकावणी दिली. काल-परवापर्यंत, प्रचारादरम्यान, किंबहुना एक्झिट पोलमध्येही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा सहज सत्तेत येईल, असा अंदाज होता. भाजपचा विजय कुणाच्या खिसगणतीतही नव्हता; परंतु, गेल्यावेळी अपघाताने मुख्यमंत्रिपद मिळालेल्या बघेल यांनी जणू सत्ता तहहयात मिळाल्यासारखा कारभार केला. पक्षांतर्गत विरोधकांचे खच्चीकरण केले. कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. या आदिवासीबहुल राज्यात बस्तर, सरगुजा वगैरे भागातील आदिवासींच्या भावनांचा बघेल यांना विसर पडला. ऐन प्रचाराच्या काळात पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचे ‘महादेव ॲप’ अस्र चालविले आणि त्याने बघेल यांच्यासह काँग्रेसच्या सत्तेचा बळी घेतला. उत्तरेकडील हिंदी पट्ट्यात अपयश आले तरी तेलंगणच्या विजयाने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिणेत चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्या यात्रेनंतर कर्नाटक जिंकता आले. पाठोपाठ आता तेलंगण काँग्रेसने जिंकले आहे. तेलंगण राज्य निर्मितीसाठी संघर्ष करणारे के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने पहिली दहा वर्षे नव्या राज्याची सत्ता भोगली. त्यांना नंतर राष्ट्रीय नेतृत्वाची स्वप्ने पडू लागली. त्यासाठी भारत राष्ट्र समिती असे पक्षाचे नामांतर केले. शेजारच्या महाराष्ट्रात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, दिल्लीकडे निघालेला त्यांचा रथ काँग्रेसने रोखला आहे. चारही राज्यांत छोटे, प्रादेशिक पक्ष कमजोर झाले आहेत. अशावेळी भाजपऐवजी काँग्रेसने यश मिळविण्याचे तेलंगण हे अपवादात्मक उदाहरण आहे. आता मतदारांमधील राज्य निर्मितीचा उत्साह संपला आहे आणि राजकारणात टिकून राहण्याचे मोठे आव्हान केसीआर यांच्यापुढे आहे. बीआरएसच्या पराभवाने तेलंगणचे मैदान भाजपसाठी खुले झाले आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक