शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मरणासन्न रामनदी पुन्हा जिवंत व्हावी, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 01:42 IST

आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. पुण्यातल्या नागरिकांनी पहिले पाऊल  उचलले आहे, त्याबद्दल...

- अनिल गायकवाड, संस्थापक सदस्य, ‘रामनदी पुनरुज्जीवन अभियान’ 

सर्वांना शुद्ध पाणी हवे असेल तर ते नदीच आपल्याला आजवर देत आली आहे. परंतु ४५० कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या आयुष्यात गेल्या पन्नास ते साठ वर्षांत फक्त मानवी कृतीने प्रगतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण केले आणि या जीवनदायिनी नद्या मरणासन्न केल्या. आपले अस्तित्व या पृथ्वीवर टिकवायचे असेल, तर या नद्यांना त्यांच्या पूर्वीच्या, नैसर्गिक अवस्थेमध्ये पुन्हा आणावे आणि ठेवावे लागेल.

किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून पुणे शहरात रामनदी पुनरुज्जीवन अभियानाचा जन्म झाला आहे. नागरिकांच्या प्रयत्नातूनच नदीचे अस्तित्व टिकू शकते आणि नदीचे प्रदूषण करणारे सर्व स्रोत थांबविले, तरच नदी शुद्ध होऊ शकते. त्यासाठी व्यापक जनजागृती, तसेच प्रत्यक्ष प्रयत्नातून नदी स्वच्छतेचे परिपूर्ण प्रारूप तयार करावे या उद्देशाने सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत. पर्यावरण संवर्धन या कामामध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या पुणे येथील बारा संस्था, तज्ज्ञ, सुमारे पस्तीस महाविद्यालयांमधील हजारो  ‘इको रेंजर्स’, पुण्यातील तीन किर्लोस्कर कंपन्यांचे कर्मचारी-त्यांचे कुटुंबीय, तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहयोगाने पहिल्या वर्षात मोठ्या प्रमाणात कृती कार्यक्रम राबविण्यात आले. 

पुण्यातून वाहणारी राम नदी १९ किमी लांब असून, या नदीच्या खोऱ्यामधे तीन ते साडेतीन लाख नागरिक राहतात. खाटपेवाडी परिसरात पडणारे पावसाचे पाणी घेऊन प्रत्यक्ष रामेश्वर मंदिर भुकूम या ठिकाणी रामनदी उगम पावते व तेथून गांव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी असा प्रवास करत, बाणेर येथे मुळा नदीमध्ये समाविष्ट होते.  जनजागृती अभियानाच्या दरम्यान नदी प्रदूषित करणाऱ्या गोष्टींची यादी करण्यात आली. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रदीर्घ विचारमंथन करून काम सुरू झाले. रामनदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत नऊ भाग पाडून संस्थापक सदस्य संस्थांनी एकेका भागाच्या कृती कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जबाबदारी घेतली. घरांघरांतून, संस्थांमधून, सार्वजनिक मंडळ, बचतगट, शाळा-कॉलेज, वेगवेगळ्या संस्था व उद्योग यांसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. यामध्ये नदीची ओळख, परिक्रमा, पर्यावरणपूरक घरगुती वस्तू प्लॅस्टिक प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धिकरण, भूजल व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, परसबाग, छत शेती, मधमाशी पालन, सुती कपडे, विषमुक्त अन्न अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. 

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पहिला  ‘रामनदी’ महोत्सव (ऑनलाइन)  दिनांक ८  ते १० जानेवारी, २०२१ दरम्यान संपन्न होणार आहे. पुण्यातील नदीचा शास्रीय अभ्यास करून, सादर होणारा हा पहिलाच ऑनलाइन महोत्सव असेल. सुमारे १९ कि.मी. लांबीची ही नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे.  ‘या नदीचा इतिहास, भूगोल, जैवविविधता इत्यादी बरोबरच वेगवेगळ्या समस्यांविषयी नदीप्रेमींना जागृत करावे, तसेच सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे,’  हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

पाच भागांच्या या महोत्सवात, अनेक मान्यवरांची दृक-श्राव्य व्याख्याने, गेल्या दीड वर्षांत झालेल्या प्रत्यक्ष कामांवर आधारित लघुपट, नागरिकांच्या आठवणी, सागर कुलकर्णी निर्मित रामनदीचे भारुड, रामनदी संगमाचा आभासी  ‘इको टेल’ इत्यादींचा समावेश आहे.सध्या सर्वच नद्यांची अवस्था रामनदीपेक्षा वेगळी नाही. ज्या त्या शहरातल्या-गावातल्या लोकांनीच आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. त्याचा प्रारंभ रामनदीच्या उदाहरणाने व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून हे जाहीर निमंत्रण. या, आपल्या नद्या आपणच वाचवू या!- सहभागी होण्यासाठी :  ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे फेसबुक पेज- Kirloskar vasundhara interanational film festival 

टॅग्स :Puneपुणेriverनदी