शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

श्रद्धेचा बाजार उठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM

आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला.

आसाराम बापू नामक साधूच्या वेषात वावरणाऱ्या नीच दानवाने देशभरातील लाखो भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रद्धेचा गेली तीन दशके मांडलेला बाजार अखेर उठला हे चांगले झाले. शिक्षणासाठी आश्रमात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीवर पाच वर्षांपूर्वी बलात्कार केल्याबद्दल जोधपूर येथील विशेष न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. याहून अधिक कडक शिक्षा देता येत नाही हे कायद्याचे अपयश आहे. जोधपूरजवळील मनाई आश्रमात ही षोडशा आसारामच्या राक्षसी वासनेची शिकार झाली होती. ही मुलगी आजारी होती व तिच्यावर फक्त बापूच उपचार करू शकतील, असे म्हणून आश्रमातील गुरुकुलची वॉर्डन शिल्पी गुप्ता आणि बापूंचा विश्वासू शरश्चंद्र या दोघांनी तिला १५ व १६ आॅगस्ट २०१३ दरम्यानच्या रात्री आसारामच्या शयनगृहात नेऊन सोडले होते. गुन्ह्यातील साथीदार म्हणून न्यायालयाने या दोन आरोपींना प्रत्येकी २० वर्षांचा कारावास ठोठावला. पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला असला तरी एका परीने हा अपुरा न्याय आहे. बलात्कार करणाºयाहून त्याला मदत करणाºयांना जास्त शिक्षा, असे होणार आहे. हा बलात्कार केला तेव्हा आसाराम ७३ वर्षांचा होता. म्हणजे सामान्य घरातील एखादा आजोबा ज्या वयात मंदिरात भजन-कीर्तनाला किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला जाऊन बसतो त्या वयात हा आसाराम कोवळ्या, निरागस मुलींचा उपभोग घेण्यासाठी आश्रम चालवित होता. आता आसाराम ७८ वर्षांचा आहे. शिक्षा होण्याआधी तो १,६६० दिवस म्हणजे सुमारे साडेचार वर्षे कैदेत होता. आता यानंतर तहहयात म्हणजे फार तर आठ-दहा वर्षे तो तुरुंगात राहील. आसाराम बापूची शिक्षा ही एका अर्थाने अशा कुप्रवत्तींना झालेली प्रातिनिधिक शिक्षा आहे. याआधी गेल्या काही वर्षांत हरियाणातील बाबा रामरहीमसह आणखी अशाच पाच-सहा वासनांध लांडग्यांना गजाआड जावे लागले आहे. गेल्या पाच वर्षात या प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयास दोन हजारांहून अधिक धमकीचे फोन व पत्रे आली. दोन साक्षीदारांचे खून झाले, आणखी तिघांवर हल्ले झाले. आसारामचे भक्त दंगल करतील म्हणून तीन राज्यांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त करावा लागला. बाबा रामरहीमला शिक्षा झाली तेव्हा त्याच्या भक्तांनी हैदोस घातला होता. लोकांना उल्लू बनविणारे हे दानवी बाबा किती उन्मत्त झाले आहेत, याचे हे द्योतक आहे. ज्या मुठभर पीडितांनी धीराने पुढे येऊन या भोंदूबाबांचे असली रूप जगापुढे आणले त्या कौतुकास पात्र आहेत. परंतु एवढ्याने भागणार नाही. आसारामला शिक्षा झाल्यावर त्याच्या आश्रमांमध्ये धाय मोकलून रडणाºया भक्तांची छायाचित्र वृत्तवाहिन्यांवर दाखविली गेली. बाबा गजाआड गेला तरी त्याने उभारलेली हजारो कोटी रुपयांची मायावी साम्राज्ये अबाधित असल्याचे हे भयसूचक संकेत आहेत. देवाच्या न्यायालयात आमचा बापू नक्की निर्दोष सुटेल, अशी या अंधश्रद्धाळूंना आशा आहे. याच बापूने पृथ्वीवर उभा केलेला नरक त्यांना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाºयांनी लगेच मोदी, वाजपेयी, अडवाणी, राजनाथसिंग, दिग्विजयसिंग यांची आसारामच्या पायी लोटांगण घेतानाची जुनी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. ही नेतेमंडळी अशा लबाडांना जवळ करतात आणि ते पाहून मग भोळेभाबडे लोकही त्यांच्या नादी लागतात. सर्वच पक्षांतील नेत्यांनी अशा बाबांची कुरणे पिकविली आहेत. लाखोंंच्या डोक्यावरून हात फिरवून झाल्यानंतर चार-दोन बाबांना तुरुंगात टाकून समाजास लागलेली ही कीड जाणार नाही. अशा प्रत्येक बाबाला होणारी शिक्षा हे आपल्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आहे या भावनेने लोकांनीच भाबडेपणाने त्यांच्या मागे धावणे बंद करणे गरजेचे आहे. परंतु हे होणे अशक्य आहे. निदान बाबा तुरुंगात गेला की त्याचे संपूर्ण साम्राज्य खालसा करून सरकारजमा करण्याचा कायदा केला तर अशा बाबांचे भावी पेव तरी कमी फुटेल!

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू