शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे सावट; परतीचा पाऊस न पडण्याचा अंदाज खोटा ठरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:32 IST

राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस ८० टक्क्यांवर गेला नाही. सप्टेंबर मध्ये उष्मा एवढा वाढला होता की, आॅक्टोबर हिट म्हणावे की सप्टेंबर हिट असा प्रश्न पडला होता.

धर्मराज हल्लाळे

‘अच्छे दिन’ च्या स्वप्न रंजनात असलेल्या जनतेला इंधन भडक्याने जागे केले आहे. एकुणच शहरातील मध्यमवर्ग पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने हैराण झाला आहे. तर पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस अन् परतीच्या पावसाचीही हमी नसल्यामुळे खरिप पिके करपणार. या सर्व परिस्थितीत सरकारला मात्र बुरे दिन येण्याची शक्यता आहे.

राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस ८० टक्क्यांवर गेला नाही. सप्टेंबर मध्ये उष्मा एवढा वाढला होता की, आॅक्टोबर हिट म्हणावे की सप्टेंबर हिट असा प्रश्न पडला होता. मराठवाड्यात अधिक भीषण स्थिती असून, सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असलेला प्रदेश दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ८० टक्के क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असून, शेत शिवारात जमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. हलक्या प्रतिची माती असलेल्या शिवारातील पिके जवळ जवळ करपून गेली आहेत. मुगाच्या राशी मात्र झाल्या आहेत. परंतू, त्यांनाही बाजारपेठेत भाव नाही. हमीभाव केंद्रे सुरु झालेली नाहीत. सण उत्सवाचे दिवस उसणवारीवर करून शेतकऱ्यांनी आभाळाकडे डोळे लावले आहेत. किमान परतीचा पाऊस येईल आणि शेतातील सोयाबीन, खरिपाची पिके तग धरतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी शेतकऱ्यांची आशा मावळली असून, खरिप उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. काही भागात अधुन मधुन झालेल्या पावसामुळे तरलेल्या पिकांची अवस्थाही कुपोषित आहे. पाण्याअभावी सोयाबीनचे दाणे भरली नाहीत.

मराठवाड्यात विशेषत: लातूर जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ८० टक्के आहे. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. जिल्हा तूर उत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर आहे. एकट्या लातूर शहरात ९० पेक्षा अधिक डाळमिल आहेत. राज्यातला तुरीचा भाव लातूरमधून निघतो. इतकेच नव्हे बाजार समिती सुद्धा राज्यात अग्रणी आहे. परंतू, पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन बरोबर तूर उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. पिकाची वाढ खुंटलेली आहे.

एकीकडे मराठवाड्यातील मध्यम लघू प्रकल्पांमध्ये २९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा नाही. जो गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही अधिक होता. टंचाईची ही तीव्रता मराठवाड्यात अधिक जाणवणार अशी आजची स्थिती आहे. जलसाठे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच कोरडे पडतील. ज्यामुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या मदतीला येईल का? हा प्रश्न कायम आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले आणि गेले. त्यांनी कुठलीही घोषणा केली नाही. आश्चर्य म्हणजे आजच्या परिस्थितीवर आणि जलसाठ्याच्या आरक्षणाबाबतही प्रशासन स्तरावर हालचाली दिसत नाहीत. अशावेळी शेतकरी एकच प्रार्थना करू शकतो. ती म्हणजे हवामान खात्याचा परतीचा पाऊस न पडण्याचा अंदाज खोटा ठरो.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडा