शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे

By सुधीर महाजन | Updated: December 3, 2018 17:38 IST

मराठवाड्यात नफ्यात चालणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके. बाकीचे सगळे ओसाडगावची पाटीलकी.

- सुधीर महाजन

अभिजन वर्ग हा समाजाचा खऱ्या अर्थाने दिशादर्शक असतो. परंपरा, संस्काराची चौकट अबाधित ठेवत तो समाजाला नव्या क्षितिजाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अभिसरणात त्याची भूमिका निर्णायक असते. एका अर्थाने एखादा समाज ज्यावेळी प्रगती करतो ती द्रष्ट्या अभिजनांमुळे. एकदा का अभिजनांची सारासार विवेकबुद्धी लुप्त होत ते पायापुरते पाहायला लागतात त्यावेळी सामाजिक ऱ्हास अटळ असतो.

मराठवाड्याच्या बाबतीतही असेच काही म्हणता येईल. म्हणजे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी चार-चार वेळा मिळूनही आपण काही ठोस करू शकलो नाही. किमान विकासाचा अनुशेष भरून काढता आला नाही; पण महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची शेखी मिरवण्यात सद्दी केव्हा संपली हेच लक्षात आले नाही. कायम कमी पावसाचा प्रदेश, सततची पाणीटंचाई; पण पाण्याचे मोल आपल्याला उमजलेच नाही. कोरडी शेततळी, बंधारे आणि उकरून ठेवलेल्या नद्या, यापलीकडे काही करता आले नाही. पाण्यासाठी स्वावलंबी असलेले एक खेडे निर्माण करता आले नाही.

यावर्षी मराठवाडादुष्काळात होरपळत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा अशी आजची अवस्था आहे. येणारा प्रत्येक दिवस परीक्षा पाहणाराच ठरेल. ‘डोळ्याला लावायला पाणी नाही’ याची प्रचीती येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अशा परिस्थितीत मराठवाड्यात २८ नव्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव सरकारकडे गेले आहेत. याला कोणती दूरदृष्टी म्हणावी. अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील धरणांमधून केवळ ६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी विरोध झाला. राजकीय नेते व शेतकऱ्यांनी पार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. हा विरोध फक्त ६ टीएमसी पाण्यासाठी होता. मराठवाड्यातील ४७ साखर कारखान्यांत तयार होणाऱ्या साखरेसाठी १७0 टीएमसी पाणी लागते.

पाण्याचा आणि साखर कारखानदारीचा ताळेबंदच मांडायचा म्हटले, तर महाराष्ट्रातील १४४ साखर कारखान्यांपैकी केवळ २६ कारखाने फायद्यात असून, त्यापैकी १९ पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. प. महाराष्ट्र हा प्रदेश भरपूर पावसाचा आणि सुजलाम् सुफलाम् असल्याने ही कारखानदारी त्यांच्यासाठी फायद्याची; पण विकासाचे दुसरे मॉडेल शोधता येत नसल्याने मराठवाड्यातही साखर कारखाने उभे राहिले. ‘दुसऱ्याने सरी घातली की, आपण दोरी घालण्याचा हा प्रकार आणि हाच दोर आता फास बनला आहे.’ साखर कारखानदारी हा मराठवाड्याचा विषयच होऊ शकत नाही. यापेक्षा मका, कापूस, कडधान्ये यावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे; पण त्याचा विचार होत नाही.

गेल्या वर्षी लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आणि लगेचच उसाचे क्षेत्र वाढले. त्याच्या एक वर्ष अगोदरच लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता; पण पडलेल्या पावसात सर्वांचीच सारासार बुद्धी वाहून गेली आणि उसाची लागवड झाली. जुलै, आॅगस्टदरम्यान वसमतचे माजी आमदार आणि साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची भेट झाली. त्यावेळी मराठवाड्यात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण होणार, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. कारण एवढा ऊस गाळण्याची क्षमताच नाही, असे त्यांचे म्हणणे. त्यात येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका. त्यामुळे अडचणी वाढणार, हे निश्चित. पुढे पाऊस पडला नाही, पाणी कमी पडले आणि अनेक जिल्ह्यांत पाण्याअभावी ऊस वाळला, हे संकट असले तरी साखर कारखान्यांसाठी इष्टापत्तीच.

मराठवाड्यात नफ्यात चालणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके. बाकीचे सगळे ओसाडगावची पाटीलकी. तरीही तोट्यातील कारखाने वाचविण्यासाठी सरकारकडे मदतीची याचना. अशा परिस्थितीत २८ नव्या कारखान्यांचे प्रस्ताव कसे येतात. आतबट्ट्याचा व्यवहार करून  पाणी संपवण्याचे हे उद्योग कसे केले जातात, हाच कळीचा प्रश्न आहे. आपण पाण्याबाबत बेजबाबदार आहोत, हेच सत्य.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा