शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 9:37 AM

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते.

एसटी किंवा रेल्वेला प्रमाणापेक्षा उशीर झाला की प्रवासी जवळच्या सामानाच्या पिशव्या डोक्याखाली घेऊन फलाटावर अंग टाकतात, सोबत आणलेली शिदाेरी सोडून तिथेच चार घास पोटात ढकलतात. गाड्यांना उशीर करणाऱ्या व्यवस्थेला शिव्या घालत तासन् तास घालवले जातात. सगळे वातावरण कमालीचे आळसावलेले असते. एसटी किंवा रेल्वे ही गोरगरिबांची, सर्वसामान्यांची प्रवासाची साधने. तिथे हे असे चित्र दिसण्यात नवे काही नाही. परंतु, समाजातील उच्चभ्रूंच्या प्रतिष्ठेचे चिन्ह मानल्या जाणाऱ्या विमानतळांवर हेच चित्र दिसेल असे वाटले नव्हते. ते सोमवारी मुंबईच्या विमानतळावर दिसले. आजूबाजूला उभ्या विमानांच्या पृष्ठभूमीवर प्रवाशांनी जेवणासाठी जमिनीवरच आलकट-पालकट मारली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. कारण, धूर व धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिवसभर विमाने उडालीच नाहीत. पहाटे किंवा सकाळी विमानतळावर पोहोचलेल्यांचा पूर्ण दिवस धुरकट वातावरणात गेला.

विमान कंपन्यांचे कर्मचारी हतबल होते. विमानतळाच्या इमारतींमध्ये उभे राहायलाही जागा उरली नव्हती. गेले दोन-तीन दिवस संपूर्ण देशभर हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे. आधीच या ना त्या कारणाने तिकिटाचे दर आकाशाला भिडलेले असतात. एखाददुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळ्या विमान कंपन्यांनी वेळापत्रकापासून फारकत घेतल्याचा अनुभव येतो. ठरलेल्या वेळेस विमानाने आकाशात झेप घेतली तर पेढे वाटावेत, अशी स्थिती असते. या सगळ्यांचा प्रवाशांना जो मानसिक, शारीरिक त्रास होतो त्याचे वर्णन शब्दांत शक्य नाही. उत्तर भारतात हवेचे प्रदूषण, धुक्याचे संकट अधिक गडद असते. नंतर धुके हळूहळू विरळ होत जाते. सकाळच्या उड्डाणांवर याचा नेहमीच परिणाम होतो. परंतु, दक्षिण भारतात तुलनेने स्थिती बरी असते. तरीदेखील देशाची संपूर्ण प्रवासी विमानसेवा प्रभावित का होते, तर अमूक एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत एकच विमान जाते किंवा येते असे नाही.

मेट्रो विमानतळे आणि काही छोटी शहरे यांना जोडणाऱ्या विमानांच्या अशा एका विशिष्ट वेळापत्रकानुसार विमान कंपन्या ही प्रवासीसेवा चालवितात. त्यामुळे एका विमानतळावर विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत की ते संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. म्हणूनच मुंबई विमानतळावर पंचवीस विमाने रद्द करावी लागली आणि आणखी पन्नास विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला की देशभरातील रद्द व उशीर झालेल्या विमानांची संख्या चौपट किंवा पाचपट होते. जिथे दृश्यमानता खूप खराब नाही अशाही विमानतळावरील सेवा विस्कळीत होते. अर्थात, केवळ प्रतिकूल हवामान किंवा धुके यामुळेच हा सावळागोंधळ सुरू आहे असे मानण्याचे कारण नाही. काही प्रवाशांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या अनुभवानुसार वैमानिक उपलब्ध न होणे किंवा अन्य तांत्रिक कारणेही विमान कंपन्यांनी खुलेपणाने प्रवाशांना सांगितली नाहीत. त्याऐवजी केवळ प्रतिकूल हवामानाचे कारण पुढे करीत प्रवाशांची दिशाभूल करण्यात आली. हे प्रवासी दिल्लीवरून सकाळी बंगळुरूला निघाले होते आणि त्यांचा लहान मुलगा घरी त्यांची वाट पाहात होता. त्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत रात्री दहा-साडेदहाच्या आत घरी पोहोचणे गरजेचे होते.

अशावेळी दिवसभरात चार-पाच वेळा धुक्याचे कारण देत दोन किंवा तीन तासांच्या उशिराची नुसतीच घोषणा होत राहिली आणि प्रत्यक्षात पायलटच वेळेवर पोहोचला नव्हता. अशावेळी प्रवाशांची सहनशीलता संपणे अजिबात अनैसर्गिक नाही. गोव्याला निघालेल्या अशाच एका प्रवाशाचा अन्य एका विमानात संयम सुटला व त्याने पायलटवर हात उचलला. हवाई प्रवासाची सगळी व्यवस्था, सहप्रवासी, माध्यमे या सगळ्यांनी त्या प्रवाशाला दोषी ठरविले. तथापि, कित्येक तास विमानात बसून राहावे लागलेल्या प्रवाशांसमोर येऊन वैमानिकांनी कोणती भाषा वापरली, याचाही थोडा विचार करायला हवा. हे सर्व चित्र पाहता देशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय विमानसेवेने जोडण्याची, रेल्वेच्या वातानुकूलित प्रथमश्रेणी तिकिटापेक्षा विमानाचे तिकीट कमी ठेवण्याची आणि परिणामी, हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई प्रवास शक्य करण्याची जी स्वप्ने काही वर्षांपूर्वी दाखवली गेली त्यांचे काय, हा प्रश्न येतोच. घड्याळाच्या काट्यावर कसरत करणाऱ्या देशवासीयांना एक विश्वासार्ह, काटेकोर वेळापत्रकावर चालणारी, किफायतशीर प्रवासी विमानसेवा देण्यात व्यवस्थेला आलेले अपयश यात अधिक ठळकपणे दिसते. दाट धुके हे केवळ निमित्त आहे.

टॅग्स :airplaneविमान