शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

...संयम सुटू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:22 IST

मिलिंद कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढताना प्राण तर वाचवायचेच आहे, पण त्यासोबतच अर्थचक्र पुन्हा सुरु करायचे आहे, ...

मिलिंद कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढताना प्राण तर वाचवायचेच आहे, पण त्यासोबतच अर्थचक्र पुन्हा सुरु करायचे आहे, या अर्थाने ‘जान भी, जहॉं भी’ असे आवाहन देशवासीयांना केले. पण ही घोषणा कृतीत उतरवताना सामान्य माणूस ते प्रशासन अशा सगळ्यांचीच तारेवरची कसरत सुरु आहे.लॉकडाऊनच्या चार पर्वातील ६९ दिवस आणि आता अनलॉक किंवा पुनश्च हरिओमचे १० दिवस म्हणजे संभ्रम आणि गोंधळाचे आहेत. खान्देशचा विचार केला तरी जळगाव आणि धुळे ही दोन्ही शहरे रेडझोनमध्ये मोडली जातात. त्यामुळे अनलॉकचा फायदा या शहरांना फारसा नाहीच. पुन्हा त्यात कंटनमेंट झोनमध्ये अनेक गोष्टींना प्रतिबंध आहे. व्यापारी संकुलामधील दुकानांना परवानगी नाही, मात्र एकल दुकाने सुरु आहेत. केंद्र सरकारने शॉपिंग मॉलला परवानगी दिली, तर राज्य सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली, पण महाराष्टÑात बंदी कायम आहे. कुठे दारु दुकानांना परवानगी आहे, तर कुठे नाही. केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी-व्यावसायिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.घरात कोंडून , व्यवसाय बंद राहून ८० दिवस लोटले. आता संयमाची परीक्षा अधिक पाहू नये, अशी भावना व्यक्त होत आहे. नाभिक समाजबांधवांनी तर आंदोलनाचे हत्यार उपसले. जमावबंदी आदेश मोडला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण, तरीही ते मागे हटले नाही. कुंभार समाजाच्या मंडळींनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वाजंत्रीवादक, टेन्टचालक या सगळ्यांची उपासमार सुरु आहे. ‘जान भी, जहाँ भी’ म्हणत असताना या मंडळींचा विचार करायला हवी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला हवी. त्यांच्यासारखे अनेक छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिकांची हीच अवस्था आहे. आता कोरोनाला सोबत घेऊन जगायला शिका, असे सगळे आवाहन करीत असताना बंदीचा आग्रह कशासाठी?प्रशासनदेखील हतबल आहे. अनलॉक करताच रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मृत्यूदरामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तिन्ही जिल्हे राज्यात सर्वोच्च स्थानी आहेत. देशाचा मृत्यूदर २.८ टक्के तर राज्याचा मृत्यूदर ३.५ आहे. जळगावचा १०.४, नंदुरबार : १०, तर धुळे ९ टक्के आहे. महाराष्टÑातील ३६ पैकी १३ जिल्ह्यातील मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. स्वाभाविकपणे या तिन्ही जिल्ह्यात अनलॉक करताना प्रशासनाला वाढती रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यूदराची चिंता करीत निर्णय घ्यावे लागणार आहे.कोरोनापूर्व आणि कोरोनापश्चात हा जो मुलभूत बदल होणे अपेक्षित होते, त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पूर्वीसारखे जसेच्या तसे आता काहीच नसेल, हे आम्ही स्विकारायला हवे. कोरोनापासून बचावासाठी नागरिक, व्यापारी यांनी पुरेशी काळजी घेऊन अर्थचक्राला गती द्यायला हवी. भावनिक न होता परिस्थितीचे भान ओळखून आम्ही मरण व तोरणदारी जाण्यासाठी पथ्य पाळायला हवे. कोरोनाचा मुकाबला आणि संसर्ग झाला, तर उपचारासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. ८० दिवस घरात कोंडून ठेवल्याने वेगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, बचावाची संधी देऊन लोकांना जगू द्या. उठसूठ लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूला आळा घाला. रुग्ण वाढणार आहेत, अशी तयारी ठेवून आता कामाला लागायला हवे, मात्र तेदेखील पुरेशी खबरदारी घेऊन, हे पक्के लक्षात ठेवायला हवे.अन्यथा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रशासन आणि जनतेवर पुरता विश्वास ठेवून धोरणे ठरवतील आणि आम्ही बेपर्वाईने वागून परिस्थिती गंभीर करीत असू तर ‘लॉकडाऊन’ पुन्हा आपल्या माथी राहील, हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वीसारखे दिवस पुन्हा कधी येतील, हे सांगता येत नाही. पण ते यावयाचे असतील, तर आम्ही सार्वजनिक शिस्त आणि नियम पाळू, असा निर्धार करायची आवश्यकता आहे. प्रशासन आणि जनतेने हातात हात घेऊन, सहकार्य व सामंजस्याची भावना मनी ठेवून पुढे चालत राहीले तर निश्चित या कठीण काळातून सगळे सुखरुप बाहेर पडतील. एकमेकांवर दोषारोप करुन हाती काही येणार नाही, हे लवकर आमच्या ध्यानात आले म्हणजे मिळवले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव