शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भीक नको, हवे पीक विम्याचे दाम

By किरण अग्रवाल | Updated: December 4, 2022 11:17 IST

Crop Insurance : कंपन्या हात वर करून शेतकऱ्यांची दमवणूक करतात तेव्हा विमा उतरवण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या यंत्रणा हात बांधून राहतात.

 - किरण अग्रवाल

खरिपाच्या पीक विम्याची अतिशय तुटपुंजी नुकसानभरपाई मिळत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बरे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भीक नको आहे; तर विमा उतरविलेल्या पिकाची योग्य भरपाई हवी आहे, परंतु विमा उतरवताना मागे पडणाऱ्या सरकारी यंत्रणा आता हस्तक्षेप करताना दिसत नाहीत त्यामुळे रोष वाढत आहे.

अपेक्षा ठेचकाळतात तेव्हा सहनशीलतेचा बांध फुटणे स्वाभाविक असते, त्यातही पूर्वानुमानाने निर्धारित अपेक्षांचीही पूर्तता होत नाही म्हटल्यावर त्याचे दुःख अधिकचेच असते. पीक विम्याच्या भरपाईबद्दल तेच होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने त्रासलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून जी बोळवणूक होत आहे ती असंतोषाला कारक ठरत असल्याने राज्य शासनाने यात हस्तक्षेप करणे गरजेचे बनले आहे.

यंदाचा खरीप हंगाम बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणाराच ठरला. अगोदर जास्तीच्या पावसाने पेरणी वाहून गेली म्हणून कशीतरी उधार उसनवारी करत दुबार पेरणी केली, तर हाता-तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने मातीमोल करून टाकले. आपल्याकडील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिके पाण्यात गेली. हे निसर्गाचे संकट होते, त्यातून बचावण्यासाठी पीक विमा काढला, परंतु तेथेही बळीराजाची थट्टाच होताना दिसत आहे.

नैसर्गिक आपत्ती किंवा काही रोगांमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आकारास आली आहे. यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून शासनातर्फे व कृषी विभागातर्फे मोठा पाठपुरावा केला जात असतो; मात्र दुर्दैव असे की जेव्हा पीक विमा देण्याची वेळ येते व संबंधित कंपन्या हात वर करून शेतकऱ्यांची दमवणूक करतात तेव्हा विमा उतरवण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या यंत्रणा हात बांधून राहतात. यात पंचनामे, कागदपत्रांची पूर्तता आदी मुद्दे अपरिहार्यपणे कारणीभूत ठरतात हेही खरेच, परंतु नुकसानीच्या दुःखापेक्षाही कागदी पूर्ततांच्या अभावाचे व त्यातून होणाऱ्या छळवणुकीचे दुःख अधिक बोचणारे ठरते हे विमा कंपन्यांनीही लक्षात घ्यायला हवे. लाभ किंवा कमाईपेक्षा सहानुभूती व सहवेदनेची भूमिका ठेवली गेली तर ते टाळता येऊ शकेल.

अकोला जिल्ह्याचे उदाहरण घ्या, सुमारे सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत हिस्सा घेऊन सुमारे सव्वा २४ कोटींपेक्षा अधिकची रक्कम विमा कंपन्यांकडे भरली. यात शासनाचा हिस्सा जोडला तर ती रक्कम ७८ कोटींपेक्षा अधिक होते, पण भरपाई देताना या कंपन्या दोन दोन एकरावरील नुकसानीसाठी अवघे ३00 ते ५00 रुपये भरपाई देत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर जेवढ्या रकमेचा विमा उतरवला आहे तेवढी रक्कमसुद्धा खात्यावर आलेली नाही. ही त्यांची थट्टा नव्हे तर काय? केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे, तर बुलढाणा, वाशिमसह अन्यही जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांची हीच अवस्था आहे.

महत्त्वाचे म्हणजे, पीक विमा कंपन्यांनी चालविलेल्या मनमानीबद्दल तक्रारी वाढल्या आहेत, काही शेतकऱ्यांनी तर त्यांना मिळालेली भरपाईची तुटपुंजी रक्कम संतापापोटी कंपन्यांना परतही पाठविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबद्दल आंदोलनाचा इशाराही दिला आहे; मात्र बळीराजाचा कैवार प्रदर्शणारे स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत चकार शब्द काढताना दिसत नाहीत. या विमा योजनेत शेतकऱ्यांसोबत राज्य शासनही आपला आर्थिक हिस्सा देत असते, त्यामुळे भरपाई देताना जशी शेतकऱ्यांची बोळवणूक होते तशी ती राज्य शासनाचीही होते. तेव्हा, राज्य शासन व प्रशासनानेही यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांमधील संतापाची ठिणगी मशालीचे रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.

सारांशात, पीक विम्याच्या विषयाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. नुकसानीचे पूर्वानुमान बांधून विम्याचा हप्ता भरला गेला असतानाही निर्धारित रक्कम मिळत नसल्याने एक प्रकारे जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना बळावली आहे. तेव्हा शासकीय यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक बनले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी