शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

...त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:04 AM

पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो.

‘देशातील लोकशाही सुरक्षित ठेवायला सदैव जागे राहा, सतर्क राहा आणि लोकशाहीच्या मूल्यांशी खेळ करीत असणाऱ्यांचा तत्काळ बंदोबस्त करा,’ असा महत्त्वाचा उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक ‘मन की बात’मधून परवा देशाला केला. पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो. त्यामुळे प्रत्येकच लोकशाहीप्रेमी व देशभक्त नागरिकाने तो केवळ ऐकून चालणार नाही. त्यांनी तो प्रत्यक्ष अंमलात आणला पाहिजे व आपली लोकशाही परंपरा अक्षुण्ण राखण्यासाठी झटले पाहिजे.

खरे तर आम्हीही पंतप्रधानांच्या त्या उपदेशाने पार भारावून गेलो आहोत. ते भारावणे जसजसे उतरले, तसतसे आम्हाला काही प्रश्न पडू लागले. ते इतरांनाही नक्कीच पडले व पडत असणार. आपल्या किंवा कोणत्याही लोकशाहीला धोका असतो वा संभवतो तो कुणाकडून? त्यात पहिला क्रमांक प्रत्यक्ष सरकारचा, दुसरा बंडखोरांचा, तिसरा दहशतवाद्यांचा, हिंसाचाऱ्यांचा किंवा देश लुटून खाणा-या लबाड धनवंतांचा. जरा विचार केला की लक्षात येते, आपला क्रमांक यात कुठेही नाही.

आपण सरकारात नाही, बंडखोरात नाही, हिंसाचारी दहशतवाद्यात किंवा लुटारू धनवंतातही नाही. तरीही पंतप्रधानांना तो उपदेश करावासा वाटतो, याचे खरे कारण ही सगळी माणसे जरा जास्तीची माजोरी झाली असली पाहिजेत आणि त्यांना आवरणे सरकारला झेपत नसल्याने, ते जनतेची म्हणजे आपली मदत मागत असले पाहिजेत. देशात सरकारनेच आणीबाणी लावून येथील लोकशाही १९७५ मध्ये घालविली, पण तेव्हाच्या सरकारने ती लगेच १९७७ मध्ये मागेही घेतली व लोकशाहीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली.

देशात बंडखोर आहेत, ते नक्षलवाद्यांच्या रूपाने पोलिसांवर व सरकारी यंत्रणांवर हल्ले करतात. देशात फुटीरवादी शक्ती आहेत, त्या काश्मिरात आहेत, मिझोरम आणि मणिपुरात आहेत (पंजाबातील त्यांचा उठाव इंदिरा गांधींनी स्वत:चे प्राण पणाला लावून मोडीत काढला.), देशात हिंसाचार आहे. तो बहुसंख्याकांमधील अतिरेकी व कर्मठांचा आहे. तो उत्तर प्रदेशात आहे, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील बहुसंख्याकवाद्यांनी अल्पसंख्याकांची सरळसरळ हत्या केली.

मध्य प्रदेश आणि ओरिसात त्यांनी त्यांची पूजास्थाने जाळून उद्ध्वस्त केली. गुजरातमध्ये त्यांनी दलितांना भररस्त्यात बांधून मरेस्तोवर मारहाण केली. शिवाय पंतप्रधानांच्या पक्षाने देशातील सगळी प्रसिद्धी माध्यमे ताब्यात घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच केला. बातमी द्यायची ती सरकारची, तारीफ करायची ती मोदींची आणि टीका करायची ती विरोधकांवर. सरकारवर टीका करणाºया माध्यमांच्या जाहिराती थांबवायच्या, त्यांच्या संपादकांना हाकलायला लावायचे आणि काही टीकाकारांची चक्क हत्याच करायची.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश हे लेखक व विचारवंत असेच मारले गेले. प्रणव रॉयसकट अनेक वृत्तपत्रांच्या व संपादकांच्या कार्यालयांवर धाडी पडल्या, वृत्तपत्रांवर नियंत्रणे आली आणि संपादकांवर खटले दाखल झाले. आपल्या चाहत्यांनी टाळ्या पिटल्या की, आपण केले ते बरोबरच आहे, असे पंतप्रधान मोदी समजत असतील, तर त्यांना स्वत:च लोकशाहीची मूल्ये समजून घ्यावी लागतील.

देशातले अनेक बडे धनवंत सरकारी बँका लुटून विदेशात पळून गेले. त्यांच्या तशा पळण्याला सरकारातील वरिष्ठांची मान्यता होती. त्यांनी बँका बुडविल्या. ते काम नक्षलवाद्यांचे नाही, अतिरेक्यांचे नाही किंवा दहशतखोरांचेही नाही. ते सरकारला ठाऊक असलेल्या व सरकारच्या जवळपास वावरणाºया लोकांनी केले. त्यांचा बंदोबस्त करणे ही खरी लोकशाही आहे. हिंसाचार माजविणारे, झुंडींनी खून करणारे, अल्पसंख्याकांची हत्या करणारे, दलितांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत, तेच खरे लोकशाहीचे मारेकरी आहेत. दुर्दैवाने ते पंतप्रधानांच्या पक्षाला जवळचे आहेत. त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी